शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लोकवाट्यालाच फाटा

By admin | Updated: November 20, 2014 14:55 IST

बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात २0 हजार घरकुलांचे उद्दिष्ट गाठण्यात येत असले तरी लाभार्थ्यांच्या असहकारामुळे लोकवाटा वसुलीत मनपाला अपयश आले आहे.

 

नांदेड: बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात २0 हजार घरकुलांचे उद्दिष्ट गाठण्यात येत असले तरी लाभार्थ्यांच्या असहकारामुळे लोकवाटा वसुलीत मनपाला अपयश आले आहे. एकूण ७९ कोटी ८५ लाख रूपयांपैकी आतापर्यंत फक्त १२ कोटीच लोकवाटा वसूल करण्यात आला आहे.
बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात १४ हजार घरकुले बांधून पूर्ण झाले असून २ हजार ८00 घरांचे कामे प्रगतीपथावर आहेत. २0 हजार घरे बांधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मनपाने नवीन भागातही घरकुलांचे कामे सुरू केले आहेत. ही योजना मार्च २0१५ मध्ये संपत आहे. 
दरम्यान, लाभार्थ्यांचा वाटा मात्र मनपाच्या तिजोरीत जमा होताना दिसत नाही. एकूण ७९ कोटी ८५ लाख रूपये लोकवाट्याचे वसूल होणे गरजेचे आहे. मात्र मागील तीन, चार वर्षांत केवळ १२ कोटीच जमा झाले आहेत. 
प्रारंभी अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना २३ हजार ५00 तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना २८ हजार २00 रूपये लोकवाटा भरावा लागला. मात्र त्यानंतर मंजूर झालेल्या घरकुलांची किंमत वाढल्याने लोकवाट्यातही वाढ झाली. 
तरोडा भागातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना २८ हजार २00 तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ३४ हजार ५00 रूपये लोकवाटा होता. तर तिसर्‍या टप्यात सुरू झालेल्या ब्रह्मपुरी भागातील घरकुलांसाठी पुन्हा लोकवाट्यात वाढ झाली. याठिकाणी अनुसूचित जातीसाठी ३४ हजार ५00 तर सर्वसाधारण लाभार्थ्यांना ४१ हजार ४00 रूपये लोकवाटा होता. 
मात्र लाभार्थ्यांकडून वसुलीला प्रतिसाद मिळत नसल्याने अपेक्षित लोकवाटा मिळू शकला नाही. हा निधी मनपाच्या तिजोरीत न आल्यामुळे संबंधित भागाच्या मूलभूत सुविधांच्या देखरेखीचे कामेही थंडावले आहेत.
मनपाकडून लोकवाटा वसुलीसाठी पथके तयार केली असून दररोज २0 ते २५ हजार रूपये वसुलीचे प्रमाण आहे. त्यामुळे एकूण लोकवाट्याचे उद्दिष्ट गाठण्याचा पल्ला बराच दूर आहे. (प्रतिनिधी) 
लाभार्थ्यांनी लोकवाटा भरावा 
■ शहरात बीएसयुपी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या १४ हजार घरकुलात लाभार्थी राहण्यास गेले आहेत. मात्र बहुतांशी लाभार्थ्यांनी महापालिकेकडे लोकवाटा भरला नाही. यासंदर्भात वेळोवेळी मनपाचे कर्मचारी लोकवाटा वसुलीसाठी फिरत आहेत. मात्र लाभार्थी त्यांना प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव येत आहे. आतापर्यंत ३0 कोटी वसूल होणे अपेक्षित होते. केवळ १२ कोटीच मनपाच्या तिजोरीत जमा आहेत. असून ज्या लाभार्थ्यांकडे लोकवाटा बाकी आहे, अशांनी तातडीने लोकवाटा मनपाकडे जमा करावा, असे आवाहन आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी केले आहे.