शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोकवाट्यालाच फाटा

By admin | Updated: November 20, 2014 14:55 IST

बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात २0 हजार घरकुलांचे उद्दिष्ट गाठण्यात येत असले तरी लाभार्थ्यांच्या असहकारामुळे लोकवाटा वसुलीत मनपाला अपयश आले आहे.

 

नांदेड: बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात २0 हजार घरकुलांचे उद्दिष्ट गाठण्यात येत असले तरी लाभार्थ्यांच्या असहकारामुळे लोकवाटा वसुलीत मनपाला अपयश आले आहे. एकूण ७९ कोटी ८५ लाख रूपयांपैकी आतापर्यंत फक्त १२ कोटीच लोकवाटा वसूल करण्यात आला आहे.
बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात १४ हजार घरकुले बांधून पूर्ण झाले असून २ हजार ८00 घरांचे कामे प्रगतीपथावर आहेत. २0 हजार घरे बांधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मनपाने नवीन भागातही घरकुलांचे कामे सुरू केले आहेत. ही योजना मार्च २0१५ मध्ये संपत आहे. 
दरम्यान, लाभार्थ्यांचा वाटा मात्र मनपाच्या तिजोरीत जमा होताना दिसत नाही. एकूण ७९ कोटी ८५ लाख रूपये लोकवाट्याचे वसूल होणे गरजेचे आहे. मात्र मागील तीन, चार वर्षांत केवळ १२ कोटीच जमा झाले आहेत. 
प्रारंभी अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना २३ हजार ५00 तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना २८ हजार २00 रूपये लोकवाटा भरावा लागला. मात्र त्यानंतर मंजूर झालेल्या घरकुलांची किंमत वाढल्याने लोकवाट्यातही वाढ झाली. 
तरोडा भागातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना २८ हजार २00 तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ३४ हजार ५00 रूपये लोकवाटा होता. तर तिसर्‍या टप्यात सुरू झालेल्या ब्रह्मपुरी भागातील घरकुलांसाठी पुन्हा लोकवाट्यात वाढ झाली. याठिकाणी अनुसूचित जातीसाठी ३४ हजार ५00 तर सर्वसाधारण लाभार्थ्यांना ४१ हजार ४00 रूपये लोकवाटा होता. 
मात्र लाभार्थ्यांकडून वसुलीला प्रतिसाद मिळत नसल्याने अपेक्षित लोकवाटा मिळू शकला नाही. हा निधी मनपाच्या तिजोरीत न आल्यामुळे संबंधित भागाच्या मूलभूत सुविधांच्या देखरेखीचे कामेही थंडावले आहेत.
मनपाकडून लोकवाटा वसुलीसाठी पथके तयार केली असून दररोज २0 ते २५ हजार रूपये वसुलीचे प्रमाण आहे. त्यामुळे एकूण लोकवाट्याचे उद्दिष्ट गाठण्याचा पल्ला बराच दूर आहे. (प्रतिनिधी) 
लाभार्थ्यांनी लोकवाटा भरावा 
■ शहरात बीएसयुपी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या १४ हजार घरकुलात लाभार्थी राहण्यास गेले आहेत. मात्र बहुतांशी लाभार्थ्यांनी महापालिकेकडे लोकवाटा भरला नाही. यासंदर्भात वेळोवेळी मनपाचे कर्मचारी लोकवाटा वसुलीसाठी फिरत आहेत. मात्र लाभार्थी त्यांना प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव येत आहे. आतापर्यंत ३0 कोटी वसूल होणे अपेक्षित होते. केवळ १२ कोटीच मनपाच्या तिजोरीत जमा आहेत. असून ज्या लाभार्थ्यांकडे लोकवाटा बाकी आहे, अशांनी तातडीने लोकवाटा मनपाकडे जमा करावा, असे आवाहन आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी केले आहे.