शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सोयाबीनला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 17:31 IST

Rain Hits Nanded महसूल व कृषी विभागाचे पंचनामे जिल्हाभरात अंतिम टप्यात

ठळक मुद्दे जिल्ह्यातील ११२ प्रकल्पांमध्ये ८१ टक्के पाणीसाठाहातातोंडाशी आलेला घास हिरावला

नांदेड :  अतिवृष्ष्टी आणि पुरामुळे ३ लाख ६१ हजार १२८ हेक्टर क्षेत्रातील पीकांना फटका बसला असून, जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत  ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या पिकांमध्ये सर्वाधिक फटका हा सोयाबीनला बसला आहे. 

जिल्ह्यात २ लाख ७३ हजार ३१२ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे नुकसान ३३ टक्क्यांहून अधिक आहे. त्याखालोखाल अतिवृष्टीचा फटका कापूस या दुसरर्या गदी पिकाला बसला आहे. जिल्ह्यात ५७ हजार १९० हेक्टर कापसाचे क्षेत्र बाधित झाले आहे. नायगाव, मुदखेड, किनवट आणि माहूर या तालुक्यात मात्र कापसाचे नुकसान निरंक आहे. ज्वारीचे १४ हजार ३६४.२५ हेक्टर क्षेत्र तर तुरीचे ७ हजार १७६.१५ हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबरच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असले तरी परतीच्या पावसानेही मोठ्या प्रमाणात झोडपले आहे.

याचा फटका काढणीस आलेल्या पिकांना बसला आहे. शेतातील पीक आता पाण्यात उभी आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करून  एकत्रित अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनाने महसूल विभागाला दिले आहेत. त्यामुळे पंचनाम्यांचे काम सुरूच राहिल असेही निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी  यांनी सष्ट केले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात ७ लाख ६२ हजार १५८ हेक्टर क्षेत्रात एकूण पेरणी झाली होती. त्यातील साडेतीन लाखाहून हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका बसला आहे. या नुकसानी पोटी जिल्हा प्रशासनाने २४६ कोटी ३७ लाख २९ हजार २५६ रुपयांची मागणी केली आहे. 

हातातोंडाशी आलेला घास हिरावलाहदगाव तालुक्यातील चाभरा येथे साडेतीन एकर शेतात सोयाबीन पेरले होते. या सोयाबीनमधून अंदाजे सव्वा लाख रुपये उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती. सोयाबीनसाठी बियाणे, खते, औषधीसाठी पोटाला चिमटा घेवून २५ ते ३० खर्च करण्यात आला होता. यासाठी पीक कर्जही घेतले होते. आता कर्ज कसे फेडावे ही चिंता आहे. - सुदर्शन कल्याणकरशेतकरी, चाभरा, ता.हदगाव

काढणीचा खर्च अधिकनगदी पीक म्हणून सोयाबीनची चार एकरमध्ये पेरणी केली. यासाठी जवळपास ४० ते ५० हजार रुपये खचर्च झाला. बी-बियाणे, औषधीचा खर्च  उत्पन्नातून भागेल अशी अपेक्षा हेाती. मात्र शेंगा वाळल्यानंतर पाऊस झाला अन् शेतातील उभ्या पीकांना मोड फुटले. आता रब्बीची पेरणी कशी करावी याची चिंता आहे.   - दिगांबर टिपरसे, शेतकरी, बारड, ता.मुदखेड

महसूल व कृषी विभागाचे पंचनामे जिल्हाभरात अंतिम टप्यातकृषी व महसूल विभाग तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत पंचनामे केले जात आहेत. सप्टेंबर अखेरपर्यतचे पंचनामे पूर्ण झाले असून, अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाने खरीप पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरुच आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशा प्रमाणे ऑक्टोबरमधील नुकसानीचेही पंचनामे केले जात असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक आर.बी.चलवदे यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडagricultureशेतीRainपाऊस