शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सोयाबीनला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 17:31 IST

Rain Hits Nanded महसूल व कृषी विभागाचे पंचनामे जिल्हाभरात अंतिम टप्यात

ठळक मुद्दे जिल्ह्यातील ११२ प्रकल्पांमध्ये ८१ टक्के पाणीसाठाहातातोंडाशी आलेला घास हिरावला

नांदेड :  अतिवृष्ष्टी आणि पुरामुळे ३ लाख ६१ हजार १२८ हेक्टर क्षेत्रातील पीकांना फटका बसला असून, जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत  ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या पिकांमध्ये सर्वाधिक फटका हा सोयाबीनला बसला आहे. 

जिल्ह्यात २ लाख ७३ हजार ३१२ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे नुकसान ३३ टक्क्यांहून अधिक आहे. त्याखालोखाल अतिवृष्टीचा फटका कापूस या दुसरर्या गदी पिकाला बसला आहे. जिल्ह्यात ५७ हजार १९० हेक्टर कापसाचे क्षेत्र बाधित झाले आहे. नायगाव, मुदखेड, किनवट आणि माहूर या तालुक्यात मात्र कापसाचे नुकसान निरंक आहे. ज्वारीचे १४ हजार ३६४.२५ हेक्टर क्षेत्र तर तुरीचे ७ हजार १७६.१५ हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबरच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असले तरी परतीच्या पावसानेही मोठ्या प्रमाणात झोडपले आहे.

याचा फटका काढणीस आलेल्या पिकांना बसला आहे. शेतातील पीक आता पाण्यात उभी आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करून  एकत्रित अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनाने महसूल विभागाला दिले आहेत. त्यामुळे पंचनाम्यांचे काम सुरूच राहिल असेही निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी  यांनी सष्ट केले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात ७ लाख ६२ हजार १५८ हेक्टर क्षेत्रात एकूण पेरणी झाली होती. त्यातील साडेतीन लाखाहून हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका बसला आहे. या नुकसानी पोटी जिल्हा प्रशासनाने २४६ कोटी ३७ लाख २९ हजार २५६ रुपयांची मागणी केली आहे. 

हातातोंडाशी आलेला घास हिरावलाहदगाव तालुक्यातील चाभरा येथे साडेतीन एकर शेतात सोयाबीन पेरले होते. या सोयाबीनमधून अंदाजे सव्वा लाख रुपये उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती. सोयाबीनसाठी बियाणे, खते, औषधीसाठी पोटाला चिमटा घेवून २५ ते ३० खर्च करण्यात आला होता. यासाठी पीक कर्जही घेतले होते. आता कर्ज कसे फेडावे ही चिंता आहे. - सुदर्शन कल्याणकरशेतकरी, चाभरा, ता.हदगाव

काढणीचा खर्च अधिकनगदी पीक म्हणून सोयाबीनची चार एकरमध्ये पेरणी केली. यासाठी जवळपास ४० ते ५० हजार रुपये खचर्च झाला. बी-बियाणे, औषधीचा खर्च  उत्पन्नातून भागेल अशी अपेक्षा हेाती. मात्र शेंगा वाळल्यानंतर पाऊस झाला अन् शेतातील उभ्या पीकांना मोड फुटले. आता रब्बीची पेरणी कशी करावी याची चिंता आहे.   - दिगांबर टिपरसे, शेतकरी, बारड, ता.मुदखेड

महसूल व कृषी विभागाचे पंचनामे जिल्हाभरात अंतिम टप्यातकृषी व महसूल विभाग तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत पंचनामे केले जात आहेत. सप्टेंबर अखेरपर्यतचे पंचनामे पूर्ण झाले असून, अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाने खरीप पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरुच आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशा प्रमाणे ऑक्टोबरमधील नुकसानीचेही पंचनामे केले जात असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक आर.बी.चलवदे यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडagricultureशेतीRainपाऊस