शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

१३ लाख हेक्टरवरील कपाशीची पेरणी खाेळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST

नांदेड : यावर्षी पावसामुळे राज्यातील पेरण्या लांबल्या आहेत. अनेक ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. नगदी पीक म्हणून ...

नांदेड : यावर्षी पावसामुळे राज्यातील पेरण्या लांबल्या आहेत. अनेक ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केवळ कपाशीचा विचार केल्यास आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ लाख हेक्टर क्षेत्रातील कपाशीची पेरणी खाेळंबली आहे. ते पाहता यावर्षी कपाशीचा पेरा घटण्याचा अंदाज काॅटन काॅर्पाेरेशन ऑफ इंडियाने (सीसीआय) वर्तविला आहे. गेल्या वर्षी राज्यात ४३ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली हाेती. परंतु, या वर्षी पावसाने उघडीप दिल्याने आतापर्यंत केवळ ३० लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाली आहे. साेयाबीनला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा कल कपाशीऐवजी साेयाबीन लागवडीकडे अधिक दिसताे आहे. कपाशीची लागवड कमी हाेऊन टंचाई निर्माण झाल्यास यंदाच्या हंगामात कपाशीला बाजारात चांगला भाव मिळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कपाशीला बाजारात ६ हजार ७५० रुपये भाव मिळताे आहे. हमीभावातही २०० रुपयांनी वाढ झाली आहे. कपाशीच्या पेऱ्यात नेमकी किती घट हाेईल हे पुढील दाेन आठवड्यांत स्पष्ट हाेणार आहे. शिवाय बाजारावर काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचे सावटही पाहायला मिळत आहे.

गेल्या वर्षी काेराेना व लाॅकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा कापूस घरातच राहिला हाेता. परंतु, यावर्षी खबरदारी म्हणून सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी घराबाहेर काढला.

चाैकट......

सीसीआयची खरेदीही घटली......

सीसीआयने गेल्या वर्षी राज्यात खरेदी केलेल्या कापसातून २७ लाख गाठी तयार केल्या हाेत्या. या वर्षीच्या हंगामात ही संख्या घटून १७ लाख गाठी एवढी झाली आहे. यावरून सीसीआयला कमी कापूस विकला गेल्याचे स्पष्ट हाेते. या सर्व १७ लाख गाठी विकल्या गेल्या आहेत.

काेट.....

या खरीप हंगामात कापसाचा पेरा कमी हाेण्याचा अंदाज आहे. लांबलेला पाऊस व साेयाबीनला मिळणारा अधिक भाव ही प्रमुख कारणे त्यामागे आहेत. कमी लागवड झाल्यास बाजारात कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

- एस. के. पाणीग्रही,

मुख्य महाव्यवस्थापक,

सीसीआय, मुंबई