शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

विज्ञानामुळे परिस्थितीत तर अध्यात्मामुळे मनस्थितीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:53 IST

नांदेड : धर्म व अध्यात्मात फरक असून अध्यात्म म्हणजे सत्कार्य करणे व प्रेमाने, आनंदाने जीवन जगणे होय ...

नांदेड : धर्म व अध्यात्मात फरक असून अध्यात्म म्हणजे सत्कार्य करणे व प्रेमाने, आनंदाने जीवन जगणे होय मनःशांतीसाठी अध्यात्माची आवश्यकता आहे. विज्ञानामुळे परिस्थितीत तर अध्यात्मामुळे मन:स्थितीत बदल होत असतो. अध्यात्म व विज्ञान हे दोन्ही सत्याचा शोध घेतात, निसर्गाची जोडतात, मानवास मानवतेशी जोडतात. समाजाच्या कल्याणासाठी झटतात. या दोन्हीचा उद्देश सुख, शांती व संपन्नता आहे, असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील महाविद्यालय विकास समिती सदस्य रसायनशास्त्र विभागातील प्रा.डॉ. विजय भोसले यांनी केले.

ते श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात कै.डॉ. शंकररावजी चव्हाण व्याख्यानमालेअंतर्गत प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार झूम ऑनलाइन व्याख्यानात ‘अध्यात्म व विज्ञान’ या विषयावर बोलत होते. ते म्हणाले की, विज्ञान हे निरीक्षण, परीक्षण व चिकित्सेतून तर्कसंगत माहिती गोळा करते तर अध्यात्म स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेते. विज्ञानामुळे क्रांती होऊन भौतिकता वाढली; मात्र अध्यात्म मन:शांती, समाधान व आराम देते. विज्ञान शक्ती असून अध्यात्म भक्ती आहे. विज्ञान पुरुषार्थ असून अध्यात्म परमार्थ आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे म्हणाले की, आधुनिक काळात अध्यात्म व विज्ञानाला परस्परांपासून वेगळे करता येणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार अध्यात्म आहे. आज जीवन जगत असताना अध्यात्म व विज्ञानाचा आधार घेऊनच यशस्वी जीवन जगता येते. अध्यात्म व विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

सूत्रसंचालन प्रा.डॉ. विश्वाधार देशमुख यांनी केले तर आभार प्रा. डॉ. विजयसिह ठाकूर यांनी मानले. व्याख्यानाच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य डॉ. उत्तम सावंत, प्रा.डॉ. अजय गव्हाणे, प्रा.डॉ. शबाना दुर्रानी, प्रा. डॉ. शिवराज शिरसाट आणि कार्यालयीन प्रबंधक श्री. संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.