शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

अर्धापूर तालुक्यात करडई पीक नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST

इसापूर धरणाचे पाणी उपलब्ध होण्यापूर्वी या भागात रबी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू आणि करडई पिकाची लागवड केली जात असे. ...

इसापूर धरणाचे पाणी उपलब्ध होण्यापूर्वी या भागात रबी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू आणि करडई पिकाची लागवड केली जात असे. रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांच्या ६-१२ ओळींनंतर करडईचा एक-तीन ओळींत पेरा होत असे. रबी पिकांची निवड करताना कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या आणि अवर्षणाचा ताण सहन करणाऱ्या पिकांचा विचार केला जात असे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागात करडई पिकाची लागवड केली जात असे. तेव्हा सर्वात फायदेशीर पीक असायचे. मात्र, वर्तमानात करडई पिकाची लागवड होताना दिसत नाही. या पिकाचे क्षेत्र घटण्याची काही प्रमुख कारणे आहेत. पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव तसेच इतर स्पर्धात्मक पिके ज्वारी, सूर्यफूल व करडईचे बाजारभाव इतर पिकांच्या मानाने कमी असल्याने शेतकरी अधिक फायदा मिळणाऱ्या पिकांकडे वळला आहे.

करडई पीक अर्धापूर तालुक्यातून हद्दपार झाले आहे. आता रबी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा घेतला जात आहे. करडई पिकाच्या तुलनेत हरभरा जास्त उत्पन्न देणारे पीक ठरले आहे. कमी खर्चात आणि कमी वेळेत हरभरा जास्त उत्पन्न देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी करडई पिकाची लागवड थांबवली आहे आणि इसापूर धरणाचे पाणी अर्धापूर तालुक्याला मिळण्यास सुरुवात झाल्यावर शेतकरी बागायतदार झाला आहे. पाण्यामुळे मोठंमोठी पिके घेण्यास सुरुवात झाली. यामुळे करडई पीक अर्धापूर तालुक्यातून नामशेष झाले आहे.

इसापूर धरणातून १९८५ ते १९८६ या काळात कॅनाॅलद्वारे शेतीला पाणी मिळण्यास सुरुवात झाली तेव्हा पाणी पाळ्या वीस दिवसांच्या अंतराने मिळत असत. पाणी पाळ्या कमी वेळात मिळत असल्याने कोरडवाहू शेतीही बागायती झाली. रबी हंगामात गहू, हरभरा आणि ज्वारीचा पेरा वाढला. रबी हंगामात आठ ते दहा पाणी पाळ्या मिळू लागल्याने शेतकरी केळी, हळद आणि उसाची लागवड करू लागले होते. काही काळानंतर या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक केळी झाले. केळीपासून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास सुरुवात झाली. अनेक शेतकरी सधन झाले. शेतकऱ्यांनी अनेक पिकांत बदल घडवून आणला. भाजीपाल्यासह अन्य पिकांपासून उत्पादन काढण्यास सुरुवात केली. मात्र, करडई पीक या भागातून नामशेष झाले आहे.