शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

अर्धापूर तालुक्यात करडई पीक नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST

इसापूर धरणाचे पाणी उपलब्ध होण्यापूर्वी या भागात रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू आणि करडई पिकाची लागवड केली जात असे. ...

इसापूर धरणाचे पाणी उपलब्ध होण्यापूर्वी या भागात रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू आणि करडई पिकाची लागवड केली जात असे. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांच्या ६-१२ ओळीनंतर करडईचा एक-तीन ओळीत पेरा होत असे. रब्बी पिकांची निवड करताना कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या आणि अवर्षणाचा ताण सहन करणाऱ्या पिकांचा विचार केला जात असे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागात करडई पिकाची लागवड केली जात असे. तेव्हा सर्वात फायदेशीर पीक असायचे. मात्र, वर्तमानात करडई पिकाची लागवड होताना दिसत नाही. या पिकाचे क्षेत्र घटण्याची काही प्रमुख कारणे आहेत. पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव तसेच इतर स्पर्धात्मक पिके ज्वारी, सूर्यफूल व करडईचे बाजारभाव इतर पिकांच्या मानाने कमी असल्याने शेतकरी अधिक फायदा मिळणाऱ्या पिकांकडे वळला आहे.

करडई पीक अर्धापूर तालुक्यातून हद्दपार झाले आहे. आता रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा घेतला जात आहे. करडई पिकाच्या तुलनेत हरभरा जास्त उत्पन्न देणारे पीक ठरले आहे. कमी खर्चात आणि कमी वेळेत हरभरा जास्त उत्पन्न देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी करडई पिकाची लागवड थांबवली आहे आणि इसापूर धरणाचे पाणी अर्धापूर तालुक्याला मिळण्यास सुरुवात झाल्यावर शेतकरी बागायतदार झाला आहे. पाण्यामुळे मोठमोठी पिके घेण्यास सुरुवात झाली. यामुळे करडई पीक अर्धापूर तालुक्यातून नामशेष झाले आहे.

इसापूर धरणातून १९८५ ते १९८६ या काळात कॅनाॅलद्वारे शेतीला पाणी मिळण्यास सुरुवात झाली तेव्हा पाणी पाळ्या वीस दिवसांच्या अंतराने मिळत असत. पाणी पाळ्या कमी वेळात मिळत असल्याने कोरडवाहू शेतीही बागायती झाली. रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि ज्वारीचा पेरा वाढला. रब्बी हंगामात आठ ते दहा पाणी पाळ्या मिळू लागल्याने शेतकरी केळी, हळद आणि उसाची लागवड करू लागले होते. काही काळानंतर या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक केळी झाले. केळीपासून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास सुरुवात झाली. अनेक शेतकरी सधन झाले. शेतकऱ्यांनी अनेक पिकांत बदल घडवून आणला. भाजीपाल्यासह अन्य पिकांपासून उत्पादन काढण्यास सुरुवात केली. मात्र, करडई पीक या भागातून नामशेष झाले आहे.