शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

नामांतराचा संघर्ष जिंकला, राजकीय संघर्षाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:15 IST

नांदेड : औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी उभारलेला संघर्ष आंबेडकरी चळवळीने जिंकला, मात्र आंबेडकरी चळवळीला अद्यापही ...

नांदेड : औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी उभारलेला संघर्ष आंबेडकरी चळवळीने जिंकला, मात्र आंबेडकरी चळवळीला अद्यापही राजकीय संघर्ष जिंकता आला नाही त्याचे काय, असा सवाल प्रजासत्ताक पक्षाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी उपस्थित केला.

नामांतर दिनानिमित्त शहिदांना अभिवादन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी १६ वर्षे चाललेल्या संघर्षाला १९९४ मध्ये यश मिळाले. नामांतर लढ्यात नांदेड जिल्ह्यातील पोचीराम कांबळे, जनार्दन मवाडे, गौतम वाघमारे हे शहीद झाले. नामांतर लढ्यात शहीद झालेल्या भीमवीरांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी महात्मा फुले पुतळ्यासमोर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या वेळी प्रा. देवीदास मनोहरे, पी.एस. गवळे, जे.डी. कवडे, बबिताताई पोटफोडे, नंदकुमार बनसोड, रवी गायकवाड, राजेश रापते, विजय गोडबोले, ॲड. मधुकर टेळकीकर, ॲड. बादलगावकर, शीलरत्न चावरे, भगवान गायकवाड, बालाजी मोरे, दत्ताहरी धोत्रे, विकास इंगोले, कपिल वाबळे, प्रबुद्ध चित्ते, गब्बर सोनवणे, धम्मानंद गजभारे, व्यंकट इंगोले आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शहिदांना अभिवादन करण्यापूर्वी महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात सुरेश गायकवाड म्हणाले, आंबेडकरी चळवळीने नामांतराचा लढा अत्यंत प्रखरपणे लढला. अन्याय, अत्याचाराविरुद्ध बंड करून उठलेली चळवळ हा लढा जिंकला खरा, मात्र आंबेडकरी चळवळीला राजकीय संघर्ष आजपर्यंत स्वतंत्रपणे जिंकता आला नाही. आजही शैक्षणिक, सामाजिक, असंख्य प्रश्न आहेत. शैक्षणिक, सामाजिक, गायरान अशा विविध प्रश्नांवर आंबेडकरी आंदोलने उभारताना समाज एकत्र येतो, मात्र राजकारणात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी समाज एकत्र येत नाही, त्यामुळे आजचा युवक सैरभैर झाला आहे. ज्यांच्याकडे राजकीय नेतृत्व आहे, त्यांचा पक्ष हा मालकी पक्ष झाला आहे. सत्ता व्यक्तिकेंद्रित झाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना कुणीही अमलात आणत नाहीत. कोणत्याही पक्षात कार्यकर्त्यांची दुसरी सक्षम फळी तयार होऊ दिली नाही, त्यामुळे कौटुंबिक वारशाशिवाय चळवळीतील राजकीय पक्षांना अन्य नेतृत्व मिळाले नाही. परिणामी सैरभैर झालेला युवक शत्रूपक्षाच्या सापळ्यात अडकत असल्याची खंत गायकवाड यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शहीद पोचीराम कांबळे यांची सून जयश्री बाबू कांबळे आणि शहीद चंदर कांबळे यांची कन्या मीनाताई यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.