शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

अर्धापूर तालुक्यात थंडीच्या लाटेमुळे रबी हंगाम जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:14 IST

तालुक्याला इसापूर धरणातून पाणी मिळत असल्याने बागायती क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात आहे. इसापूर धरणाच्या लाभक्षेत्रात येत असल्याने तालुक्यात बागायतदार शेतकऱ्यांची ...

तालुक्याला इसापूर धरणातून पाणी मिळत असल्याने बागायती क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात आहे. इसापूर धरणाच्या लाभक्षेत्रात येत असल्याने तालुक्यात बागायतदार शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे. नगदी पिके म्हणून ओळखले जाणारे केळी, हळद, ऊस या पिकांसहित सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका, गहू, हरभरा आदींची लागवड केली जाते. मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे रबी हंगामातील पिकाच्या उत्पादनात घट होत चालली आहे. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण होते की काय? अशी शंका उपस्थित होत होती. मात्र, मागील आठवड्यापासून थंडीत वाढ झाल्याने रबी हंगामातील पिके जोमात दिसत आहेत. आणखी अशीच थंडीची लाट कायम राहिली, तर गहू आणि हरभरा पिकांतून भरपूर उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यंदा अर्धापूर तालुका आणि इसापूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने इसापूर धरणात १०० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे, तर तालुका परिसरात नदी, नाले, विहीर आणि बोअरवेल पाण्याने तुडुंब भरली आहेत. यंदा तरी पाण्याची कमतरता भासणार नाही. इसापूर धरणातून पाणी पाळ्या मिळण्यास सुरुवात झाली आहे पहिली पाणी पाळी पिकांना मिळाली आहे पाणी भरपूर आहे; परंतु निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही. शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिके निसर्गाने हिरावून घेतली. रबी हंगामातील पिके शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढतील, अशी अपेक्षा आहे; परंतु ढगाळ वातावरणामुळे रबी पिकांना फटका बसतो की काय? असे असताना मागील काही दिवसांपासून थंडीच्या लाटेमुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.