शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाला केंद्राचा निधी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:17 IST

२०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षांत १ हजार ७३ प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५९९ घरकुलांना मंजुरी ...

२०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षांत १ हजार ७३ प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५९९ घरकुलांना मंजुरी मिळाली. एक लाख रुपये राज्य शासनाचा वाटा तर १ लाख ५० हजार केंद्र शासनाचा वाटा असे एकूण अडीच लाख रुपये घरकुलाची किंमत आहे. सर्वच वस्तूंचे भाव वाढल्याने अडीच लाख रुपयांत घरकुल होणे शक्य नाही. आशाही परिस्थितीत लाभार्थींना पदरमोड करावी लागत आहे. एकूण उद्दिष्टापैकी ३८२ लाभ देणे बाकीच आहे. स्वतःची मालकी असणाऱ्यालाच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात येत असल्याने मालकीअभावी लाभ देणे शक्य नसल्याने बरेच लाभार्थी पक्क्या घराच्या प्रतीक्षेत आहेत, तर ज्यांना ह्या योजनेचा लाभ मिळाला तशांचे अजूनही शेवटच्या हप्त्यापोटी पन्नास हजार रुपये देणे बाकी असल्याने छत लेव्हलला बांधकाम जाऊनही कोणाचा गिलावा थांबला आहे, तर अनेकांचे काम रखडले असल्याचे चित्र आहे.

केंद्र शासनाचा मोठा निधी येणे बाकी असल्याने घरकुल बांधकाम करूनही अंगणात कच्च्या घरात राहावे लागत आहे. केंद्र शासनाच्या ७ कोटी २१ लाख रुपयांच्या वाट्यापोटी असलेल्या रकमेपैकी २ कोटी ८८ लाख ६० हजार रुपये वाटा मिळाला असल्याची माहिती न.प.च्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सूत्रांनी दिली आहे.

प्रत्येक लाभार्थीचे शेवटच्या हप्त्यापोटी पन्नास हजार रुपये बाकी असल्याने शेवटच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत लाभार्थी आहेत व पक्क्या घरांच्या स्वप्नात आहेत.

रमाई आवास योजनेकडे फिरवली पाठ !

२०१२-१३ ते २०२०-२१ या आठ-दहा वर्षांत रमाई घरकुल योजनेचे १४४ उद्दिष्ट असताना ७८ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यातील ५४ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. बाकीच्या लाभार्थींना दोन दोन हप्ते देऊनही काम केले नसल्याने तशा लाभार्थींना काम करून घेण्यासाठी नोटीस दिली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी नीलेश सुंकेवार यांनी दिली आहे.

पूर्वी रमाई योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील यादीत असणे गरजेचे होते व त्यातच जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला व इतर कागदपत्रे सादर करण्याच्या अटी होत्या. आता एपीएलला ही लाभ देण्यात येत आहे. मात्र, अटी जास्त असल्याने व प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळू लागल्याने रमाई आवास योजनेकडे लाभार्थींनी पाठ फिरवली आहे, असेच सध्याचे चित्र आहे.