शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाला केंद्राचा निधी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:17 IST

२०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षांत १ हजार ७३ प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५९९ घरकुलांना मंजुरी ...

२०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षांत १ हजार ७३ प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५९९ घरकुलांना मंजुरी मिळाली. एक लाख रुपये राज्य शासनाचा वाटा तर १ लाख ५० हजार केंद्र शासनाचा वाटा असे एकूण अडीच लाख रुपये घरकुलाची किंमत आहे. सर्वच वस्तूंचे भाव वाढल्याने अडीच लाख रुपयांत घरकुल होणे शक्य नाही. आशाही परिस्थितीत लाभार्थींना पदरमोड करावी लागत आहे. एकूण उद्दिष्टापैकी ३८२ लाभ देणे बाकीच आहे. स्वतःची मालकी असणाऱ्यालाच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात येत असल्याने मालकीअभावी लाभ देणे शक्य नसल्याने बरेच लाभार्थी पक्क्या घराच्या प्रतीक्षेत आहेत, तर ज्यांना ह्या योजनेचा लाभ मिळाला तशांचे अजूनही शेवटच्या हप्त्यापोटी पन्नास हजार रुपये देणे बाकी असल्याने छत लेव्हलला बांधकाम जाऊनही कोणाचा गिलावा थांबला आहे, तर अनेकांचे काम रखडले असल्याचे चित्र आहे.

केंद्र शासनाचा मोठा निधी येणे बाकी असल्याने घरकुल बांधकाम करूनही अंगणात कच्च्या घरात राहावे लागत आहे. केंद्र शासनाच्या ७ कोटी २१ लाख रुपयांच्या वाट्यापोटी असलेल्या रकमेपैकी २ कोटी ८८ लाख ६० हजार रुपये वाटा मिळाला असल्याची माहिती न.प.च्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सूत्रांनी दिली आहे.

प्रत्येक लाभार्थीचे शेवटच्या हप्त्यापोटी पन्नास हजार रुपये बाकी असल्याने शेवटच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत लाभार्थी आहेत व पक्क्या घरांच्या स्वप्नात आहेत.

रमाई आवास योजनेकडे फिरवली पाठ !

२०१२-१३ ते २०२०-२१ या आठ-दहा वर्षांत रमाई घरकुल योजनेचे १४४ उद्दिष्ट असताना ७८ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यातील ५४ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. बाकीच्या लाभार्थींना दोन दोन हप्ते देऊनही काम केले नसल्याने तशा लाभार्थींना काम करून घेण्यासाठी नोटीस दिली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी नीलेश सुंकेवार यांनी दिली आहे.

पूर्वी रमाई योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील यादीत असणे गरजेचे होते व त्यातच जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला व इतर कागदपत्रे सादर करण्याच्या अटी होत्या. आता एपीएलला ही लाभ देण्यात येत आहे. मात्र, अटी जास्त असल्याने व प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळू लागल्याने रमाई आवास योजनेकडे लाभार्थींनी पाठ फिरवली आहे, असेच सध्याचे चित्र आहे.