शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

आरळीत ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:17 IST

मागील आरक्षण सोडत राज्य सरकारने रद्द केल्याने अनेकांचा हिरमोड आरळी : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरळीत युवकांचे व गावपुढाऱ्यांचे राजकारण ...

मागील आरक्षण सोडत राज्य सरकारने रद्द केल्याने अनेकांचा हिरमोड

आरळी : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरळीत युवकांचे व गावपुढाऱ्यांचे राजकारण तापले असून, भावी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या उमेदवारी निवडीबाबत चाचपणीला सुरुवात झाली आहे.

बिलोली तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर रणधुमाळीस सुरुवात झाली होती. त्यातच राज्य सरकारने सरपंच पदाचे आरक्षण रद्द केल्याने अनेकांचा हिरमोड झाला असला तरी ग्रामपंचायत सदस्यांसाठी रस्सीखेच चालूच आहे. तालुक्यातील आरळीचे सरपंच पद आरक्षण सोडतीत ओबीसी महिलेला सुटले होते. पण शासनाच्या नवीन निर्णयानुसार ते रद्द झाले. सदर आरक्षण लागू राहिले असते तर अनेकांना सरपंच पदाचे डोहाळे लागले होते. गावातील एकमेकांचे संबंध व जातीय समीकरण यावर बऱ्याच गोष्टी गावपातळीवर अवलंबून असतात. त्यादृष्टीने पॅनल उभे केले जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत एकमेकांच्या विरोधी प्रचार करणारे आपआपले गटतट बाजूला ठेवून पॅनल तयार करत असल्याचे पहावयास मिळत आहे. भर थंडीत प्रचार गरमावत आहे, अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत. पण आरळीकर नेमके आपले अमूल्य मत कोणाच्या पारड्यात टाकतील हे सांगणे पण तेवढेच कठीण असले तरी एकंदरीत या वेळेसची ग्रामपंचायत तरुणांच्या ताब्यात देण्याकडे आरळीकरांचा कल दिसत आहे. परंतु आजपर्य॔ंत येथील सत्तेचा डौलारा येथील मातब्बर राजकारण्यांच्याच बाजूने राहिला आहे. सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर सुटत असले तरी येथील गावपुढाऱ्यांत व नव तरुणात निवडणुकीचा रंग चांगलाच भरलाय, गावपातळीवर उमेदवार व मतदार जुळवणीच्या कामात पॅनल प्रमुख व उमेदवार यांचे युद्धपातळीवर काम चालू असून ज्येष्ठ राजकारणी, मागील सत्ताधारी व नवतरुण अशी तिरंगी लढत लागण्याची दाट शक्यता आहे. येथील ग्रामपंचायत चांगलीच चुरशीची व रंगतदार ठरण्याची शक्यता दिसत आहे. ज्येष्ठ राजकारणी पुढाऱ्यांच्या, यापूर्वी सत्तेत असणाऱ्यांच्या की नव तरुणांच्या गळ्यात विजयाची माळ पडेल हा येणारा काळ ठरविणार आहे.