शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मर्जी राखा अन्यथा अविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:28 IST

विशाल सोनटक्के। लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : घटनादुरूस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला व मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व मिळू लागले असले तरी ...

ठळक मुद्देमहिला,मागासवर्गीय कारभारी लक्ष्य : पाच वर्षांत ४९ सरपंचांची अविश्वास ठरावामुळे गेली खुर्ची

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : घटनादुरूस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला व मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व मिळू लागले असले तरी सत्तापद कायम आपल्याकडेच ठेवण्याकडे प्रस्थापितांचा कल असल्याचे दिसते. नांदेड जिल्ह्यात मागील पाच वर्षांत तब्बल ४९ सरपंचांना अविश्वास ठरावामुळे आपले पद गमवावे लागले आहे. विशेष म्हणजे, यात २१ महिला सरपंचांचा समावेश असून त्यातही मागासवर्गीय सरपंचांची संख्या लक्षणीय आहे.‘एक व्यक्ती, एक पद,एक मूल्य’ यास केंद्रबिंदू समजून संविधान निर्मिती झाली आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतराज अस्तित्वात आल्यानंतर ग्रामसभांना एकप्रकारे संसदेचे स्वरूप आले आहे. सध्या ७३ व ७४ व्या घटनादुरूस्तीचे रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरे करीत आहोत. ७३ व्या घटना दुरूस्तीमुळे पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला तर ७४ व्या दुरूस्तीमुळे नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका या संस्थांमध्ये महिला व मागासवर्गीयांना राखीव जागा ठेवण्यात आल्या. महिलांना ३३ तर मागासवर्गीयांना याद्वारे २७ टक्के आरक्षण देण्यात येते. पंचायतराज मधील आरक्षण हे महिला सक्षमीकरणातील महत्त्वाचे पाऊल म्हणूनही पाहिले जाते. मात्र, घटना दुरूस्तीनंतरही खरेच या घटकांना विकासाची समान संधी मिळते का? की, पंचायतराज व्यवस्थेमधील हे आरक्षणही केवळ मलमपट्टी ठरते, असा प्रश्नही आकडेवारी पाहिल्यानंतर उपस्थित होतो.वर्ष २०१२ ते २०१७ या पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात ४९ सरपंचांविरूद्ध अविश्वास ठराव पारित झाला. २०१२ मध्ये ११, २०१३- १३, २०१४ मध्ये ९, २०१५- ०४ तर २०१७ या आर्थिक वर्षात सहा सरपंचांना अविश्वास ठरावामुळे आपली खुर्ची सोडावी लागली. पायउतार झालेल्या या ४९ सरपंचांमध्ये २१ महिला सरपंच आहेत, हे येथे विशेष. अविश्वास ठरावाची कारणे पाहिली असता ग्रामसभा, मासिकसभा न घेणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामे करणे ही कारणे प्रामुख्याने असल्याचे दिसून येत असले तरी अविश्वास ठरावाच्या कारणांचा खोलात जावून अभ्यास केला असता बहुतांश प्रकरणात सत्तेची सूत्रे आपल्याकडेच रहावीत ही प्रस्थापित वर्गाची मानसिकताच यामागे असल्याचे दिसून आले.ठराव फेटाळल्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा अविश्वासमुखेड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत २०१० मध्ये महिला सरपंचाविरूद्ध सदस्यांनी अविश्वास ठराव आणला. मात्र, या महिलेने हा डाव विरोधकावरच उधळत विरोधी गटाचे दोन सदस्य फोडून आपले सरपंचपद अबाधित ठेवले. मात्र, हा रणसंग्राम इथेच थांबला नाही. वर्ष २०१२ मध्ये विरोधकांनी पुन्हा अविश्वास ठराव आणून या महिलेला पायउतार केले. काहीसा असाच प्रकार उमरी तालुक्यातही याच कालावधीत घडला. महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर मागासप्रवर्गातील महिला सरपंच झाली. मात्र ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रित येवून या महिला सरपंचावर अविश्वास ठराव आणून सदर सरपंचाला पायउतार केले. त्यानंतर ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंच महिलेकडे सोपविला गेला.