शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

जिल्ह्यातील १ हजार १४ ग्रामपंचायतींचे चित्र होणार स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:15 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या १ हजार १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील लढतींचे अंतिम चित्र सोमवार, ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता स्पष्ट ...

जिल्ह्यात सुरू असलेल्या १ हजार १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील लढतींचे अंतिम चित्र सोमवार, ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवारी संपणार आहे. जिल्ह्यात १ हजार १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक होता. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. आता ४ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. सोमवारी दुपारी तीन वाजता ग्रामपंचायत लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर उमेदवारांना चिन्हांचेही वाटप केले जाणार आहे.

जिल्ह्यात १ हजार १४ ग्रामपंचायतींमध्ये ३ हजार २३७ सदस्य निवडले जाणार आहेत. दिनांक १५ जानेवारी रोजी मतदान आणि १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेकडून मतदान प्रक्रियेची तयारी केली जात आहे. सोमवारी लढतींचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर गावागावात प्रचाराला वेग येणार आहे. यावेळी उमेदवारांना प्रचारासाठी करावयाच्या खर्चात काही प्रमाणात वाढही करण्यात आली आहे. यापूर्वी असलेली २५ हजार रूपये खर्चाची मर्यादा आता ५० हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे.