शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

समन्वय आणि संगोपन यातूनच मराठी भाषेचे खरे संवर्धन घडू शकेल : डॉ. विठ्ठल जंबाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:17 IST

यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’च्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत ...

यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’च्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

''भाषा संवर्धित करायची म्हणजे प्रत्यक्षात काय करायचे, तर पहिली गोष्ट म्हणजे आपली भाषा हिरिरीने बोलायची. जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त ठिकाणी ती भाषा बोलणे, हा कुठल्याही भाषेच्या संवर्धनाचा पहिला टप्पा आहे. भाषेच्या संवर्धनासाठी संख्यात्मक वाढ आणि वर्चस्व आवश्यक आहे. त्यामुळे सर्वत्र आपण हिरिरीने मराठी बोलले पाहिजे. ती बोलायला लाजायचे कारण नाही. आपण आपल्या भूमीत भक्कम उभे आहोत, आपली भाषा ही जगातल्या प्रमुख भाषांपैकी एक आहे, आपण तिच्यात सर्व व्यवहार करू शकतो, या आत्मविश्वासाने ती बोलण्याची आवश्यकता आहे. भाषेच्या विविध बोली जोपासणे आणि वाढविणेही तितकेच गरजेचे आहे. बोली म्हणजे प्रमाणभाषेला सततची रसद पुरविणारे सैनिक असतात; मराठीच्या तर अनेक बोली आहेत. वऱ्हाडी, कोकणी, अहिराणी असे काही ठळक भेद आपल्याला माहीत आहेत; पण त्या बोलींमध्येही पोटबोली आहेत. उदाहरणार्थ - कोकणात वारली, ठाकरी, कातकरी, आगरी, कुणबी, मालवणी असे अनेक भेद आहेत. मराठीचे संवर्धन व्हायचे असेल तर या प्रत्येक बोलीभाषेचा विकास झाला पाहिजे. सुशिक्षितांनी आपल्या बोलीभाषांची लाज न बाळगता आपापल्या समूहात आणि प्रदेशात दैनंदिन व्यवहारांत बोलीभाषेचा वापर केला पाहिजे. कारण मराठीचे संवर्धित भवितव्य हे बोलींच्या विविधतेत आणि त्यांच्या समृद्धीतही सामावलेले आहे,'' असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी मराठीच्या देदीप्यमान इतिहासाचा आढावा घेत राजाश्रयासोबत लोकाश्रय असल्याशिवाय भाषिक समृद्धी घडत नाही, हे सांगून भाषेचे संवर्धन व्हायचे, तर सामाजिक व्यवहाराच्या सर्व क्षेत्रांत तिचा प्रवेश व्हायला हवा. इंग्रजीतील ज्ञानसंपदा मराठीत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवे, असे आवाहन केले.

विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता घुगे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. विश्वाधार देशमुख यांनी केले. ऑनलाईन स्वरूपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी डॉ. अजय गव्हाणे, प्रा. मंजुश्री भटकर यांच्यासह अनेक प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.