शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

समन्वय आणि संगोपन यातूनच मराठी भाषेचे खरे संवर्धन घडू शकेल : डॉ. विठ्ठल जंबाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:17 IST

यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’च्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत ...

यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’च्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

''भाषा संवर्धित करायची म्हणजे प्रत्यक्षात काय करायचे, तर पहिली गोष्ट म्हणजे आपली भाषा हिरिरीने बोलायची. जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त ठिकाणी ती भाषा बोलणे, हा कुठल्याही भाषेच्या संवर्धनाचा पहिला टप्पा आहे. भाषेच्या संवर्धनासाठी संख्यात्मक वाढ आणि वर्चस्व आवश्यक आहे. त्यामुळे सर्वत्र आपण हिरिरीने मराठी बोलले पाहिजे. ती बोलायला लाजायचे कारण नाही. आपण आपल्या भूमीत भक्कम उभे आहोत, आपली भाषा ही जगातल्या प्रमुख भाषांपैकी एक आहे, आपण तिच्यात सर्व व्यवहार करू शकतो, या आत्मविश्वासाने ती बोलण्याची आवश्यकता आहे. भाषेच्या विविध बोली जोपासणे आणि वाढविणेही तितकेच गरजेचे आहे. बोली म्हणजे प्रमाणभाषेला सततची रसद पुरविणारे सैनिक असतात; मराठीच्या तर अनेक बोली आहेत. वऱ्हाडी, कोकणी, अहिराणी असे काही ठळक भेद आपल्याला माहीत आहेत; पण त्या बोलींमध्येही पोटबोली आहेत. उदाहरणार्थ - कोकणात वारली, ठाकरी, कातकरी, आगरी, कुणबी, मालवणी असे अनेक भेद आहेत. मराठीचे संवर्धन व्हायचे असेल तर या प्रत्येक बोलीभाषेचा विकास झाला पाहिजे. सुशिक्षितांनी आपल्या बोलीभाषांची लाज न बाळगता आपापल्या समूहात आणि प्रदेशात दैनंदिन व्यवहारांत बोलीभाषेचा वापर केला पाहिजे. कारण मराठीचे संवर्धित भवितव्य हे बोलींच्या विविधतेत आणि त्यांच्या समृद्धीतही सामावलेले आहे,'' असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी मराठीच्या देदीप्यमान इतिहासाचा आढावा घेत राजाश्रयासोबत लोकाश्रय असल्याशिवाय भाषिक समृद्धी घडत नाही, हे सांगून भाषेचे संवर्धन व्हायचे, तर सामाजिक व्यवहाराच्या सर्व क्षेत्रांत तिचा प्रवेश व्हायला हवा. इंग्रजीतील ज्ञानसंपदा मराठीत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवे, असे आवाहन केले.

विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता घुगे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. विश्वाधार देशमुख यांनी केले. ऑनलाईन स्वरूपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी डॉ. अजय गव्हाणे, प्रा. मंजुश्री भटकर यांच्यासह अनेक प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.