शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

असेल वशिला तरच जा लसीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:18 IST

दरवेळी पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये किती दिवसांचे अंतर असावे, यावरून गोंधळ घालण्यात येत आहे. पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षांवरील ...

दरवेळी पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये किती दिवसांचे अंतर असावे, यावरून गोंधळ घालण्यात येत आहे. पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांनाच आता डोस देण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाने प्रत्येक केंद्रावर शंभर जणांना लस देण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे २४ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी नांदेड शहरात पहाटे चार वाजेपासूनच नागरिक लसीकरणाच्या रांगेत उभे राहत आहेत. जुना कौठा, जिल्हा रुग्णालय, श्यामनगर या ठिकाणी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविवारी कौठा भागात तर धक्काबुक्की आणि शिवीगाळचा प्रकार घडला होता. त्यानंतर, सोमवारी पहाटेपासून रांगेत उभ्या असलेल्या ५० नागरिकांनाच टोकण वाटप करण्यात आले. इतर नागरिकांनी विचारणा केली असता, टोकण संपल्याचे कारण पुढे करण्यात आले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी केंद्राचा दरवाजा बाहेरून लावून घेतला. त्यानंतर, पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणखी २५ जणांना लस देण्यात आली, तर उर्वरित नागरिकांना दुसऱ्या दिवशी येण्याचा सल्ला देण्यात आला. प्रत्येक केंद्रावर अशा प्रकारे शंभरऐवजी कमी टोकणचे वाटप करण्यात येत आहे. त्यानंतर, वशिला असलेल्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. या प्रकारामुळे नागरिकांचा रोष वाढत चालला आहे. प्रशासनाने लसीकरणासाठी केलेल्या नियोजनाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे.

वशिला असेल, तर बिनबोभाट मिळते लस

एकीकडे नोंदणी करूनही लस मिळत नाही, तर दुसरीकडे दांडगा वशिला अथवा ओळख दाखविल्यानंतर बिनबोभाट लस दिली जात असल्याचा मागील काही दिवसांतला नागरिकांचा अनुभव असल्याने या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या एकूणच प्रकारामुळे शहरात ज्यांच्यावर लसीकरनाची जबाबदारी सोपविली आहे. ते अधिकारही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.