शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
3
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
4
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
5
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
6
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
7
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
8
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
9
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
10
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
11
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
12
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
13
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
14
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
15
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
16
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
17
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
18
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
19
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
20
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

आता उमेदवारांचे अवतण ताई, अक्का, वहिनी गावाकडे कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:15 IST

लोहा- ग्रामपंचायत निवडणूक लागल्याबरोबर गाव पुढाऱ्यांना व गावकऱ्यांना आता मात्र त्यांची आठवण आली असून, ‘ताई, अक्का, वहिनी, दादा, ...

लोहा- ग्रामपंचायत निवडणूक लागल्याबरोबर गाव पुढाऱ्यांना व गावकऱ्यांना आता मात्र त्यांची आठवण आली असून, ‘ताई, अक्का, वहिनी, दादा, भाऊ, अण्णा, मामा, मामी गावाकडे कधी येणार? यावेळेस तरी गावी यावंच लागेल, जाण्या-येण्याच्या खर्चाबरोबरच इतरही बंदोबस्त केला जाईल’, असेही सांगितले जात आहे.

लोहा तालुक्‍यासह जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुकांचा चांगलाच धुरळा उडत असून, ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी पार पडली, अर्ज माघारीची मुदत ४ जानेवारी असून, त्यानंतर उमेदवारांना लगेच चिन्हांचे वाटप होणार आहे. तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या ७७४ जागांची निवडणूक रणधुमाळी सुरु झाली आहे. या जागांसाठी १५ जानेवारीला मतदान आहे. निवडणूक निकालानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असले, तरी मीच सरपंच होणार! अशा अविर्भावात सर्वजण वावरू लागले आहेत. त्यातच या निवडणुकीकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीची पूर्वतयारी म्हणून पाहिले जाऊ लागल्याने तालुका पातळीवरील नेत्यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घातले आहे.

तालुक्‍यातील बहुतांश नागरिक पुणे, मुंबई व इतर शहरांकडे रोजगार किंवा नोकरीच्या निमित्ताने गेलेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झाल्यानंतर हे गावाकडे आलेले ग्रामस्थ पुन्हा शहरात गेले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक उमेदवार असल्याने निवडणूक अटीतटीची होते. त्यामुळे प्रत्येक मतदाराला महत्त्व प्राप्त होते. शहराकडे गेलेले मतदार मतदानासाठी गावाकडे यावेत, यासाठी त्यांना आता गळ घातली जात आहे. मध्यंतरी झालेल्या मन:स्तापाचा फटका या मतदारांकडून बसण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे असे मतदार मतदानासाठी येणार का? हे ही पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.