शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार मोहीम यशस्वीतेसाठी लोकसहभागाची गरज - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात “गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार” यासाठी बैठक झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती ...

जिल्हाधिकारी कार्यालयात “गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार” यासाठी बैठक झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर, किनवटचे सहायक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार, सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेय एस, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, मग्रारोहयोचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड व जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होते.

जिल्हा परिषदेअंतर्गत ३५० तलाव आहेत. त्यापैकी गाळ काढण्यायोग्य ९४ आहेत. या तलावात एकूण १० लाख ४४ हजार क्युबिक मीटर इतका गाळ उपलब्ध आहे. हा गाळ येत्या २० दिवसात काढून शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यासाठी याद्या तयार कराव्यात. पाझर तलाव, गाव तलावात साठवण क्षमतेपेक्षा जास्त पाणी जमा झाल्यास पाझर तलाव, धरण, गाव तलाव फुटण्याची शक्यता असते. जिल्ह्यातील संबंधित सर्व यंत्रणांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिले.

जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयांनी संयुक्तरित्या गाळ काढण्‍यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तीन जेसीबी मशीन उपलब्‍ध आहेत. याचा वापर हदगाव, हिमायतनगर तालुक्यासाठी करावा. जिल्‍ह्यात गाळमुक्‍त तलाव, धरण, पाझर तलावाचे लोकसहभाग, स्‍वयंसेवी संस्‍था, दानशूर व्‍यक्‍ती, तलाठी, ग्रामसेवक संघटनेच्या मदतीने, लोकसहभागाने गाळ काढण्याची कार्यवाही करावी. शासनाकडून निधी उपलब्‍ध होणार नसल्‍याने व जिल्‍ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागासाठी नांदेड येथील स्‍टील इंडस्‍ट्रीज व इतर इंडस्‍ट्रीजची मदत घ्यावी.

जिल्हा परिषद, पंचायत समिती गणातून लोकसहभाग वाढवून प्रकल्‍प क्षमतेने भरण्‍यासाठी प्रयत्न करावेत, असेही निर्देश डॉ. इटनकर यांनी सर्व यंत्रणांना दिले.

तालुकास्‍तरावर गाळ काढण्‍यासाठी उपलब्‍ध असलेले गाव तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव यांची संख्‍या निश्चित करुन काढण्‍यात येणाऱ्या गाळाची क्‍युबिक मीटर, घनमीटर गाळ उपलब्‍ध होणार याबाबतचे सूक्ष्‍म नियोजन सर्व उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी बैठकीत दिल्या.

कोरोनामुळे विहीर पुनर्भरणाबाबत टंचाई कालावधीत काही बाबी मागे पडलेल्‍या आहेत. विहीर पुनर्भरणामध्‍ये कृषी विभागांनी विशेष लक्ष द्यावे. यासाठी नोडल ऑफिसर म्‍हणून तालुका कृषी अधिकारी यांनी कामे पाहावीत. उद्दिष्‍ट निश्चित करुन तांत्रिक बाबींची जबाबदारी त्‍यांची असेल. जिल्‍ह्यात १ हजार ५०० विहिरी असून येत्या १५ दिवसात सर्व विहिरी पुनर्भरणासाठी नियोजन करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.