शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
2
भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
3
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
6
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
7
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
8
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
9
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
10
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
11
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
12
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
13
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
14
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
15
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
16
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
17
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
18
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
19
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
20
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक

कोरोना प्रादुर्भावातही नांदेडकरांचा विमानप्रवास सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:18 IST

नांदेड : कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षी राज्यातील देशांतर्गत विमान सेवा मोठ्या प्रमाणात खंडित झाली होती. त्यामुळेच राज्यातील हवाई प्रवासी ...

नांदेड : कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षी राज्यातील देशांतर्गत विमान सेवा मोठ्या प्रमाणात खंडित झाली होती. त्यामुळेच राज्यातील हवाई प्रवासी संख्येतही २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये घट झाली आहे. मात्र त्यानंतरही शिर्डी, कोल्हापूरसह नांदेड येथील प्रवासी संख्या वाढल्याचे चित्र आहे. नांदेडमध्ये २०१९ मध्ये १ लाख १८ हजार प्रवाशांनी हवाई सेवेचा लाभ घेतला होता. २०२० मध्ये हीच संख्या १ लाख ३७ हजारांवर पोहोचली आहे.

कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे मागील वर्षी अनेक ठिकाणची देशांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळेच हवाई प्रवाशांच्या संख्येवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये राज्यात १ कोटी ४६ लाख ३३ हजार प्रवाशांनी देशांतर्गत विमान सेवेचा लाभ घेतला होता. २०२० मध्ये या प्रवासी संख्येत घट झाली असून ती संख्या १ कोटी २५ लाखांवर आली आहे. मात्र अशा विपरीत परिस्थितीतही नांदेडमधील हवाई प्रवाशांची संख्या वाढल्याचे सकारात्मक चित्र आहे.

नांदेड विमानतळावरून सध्या एअर इंडियाची नांदेड-अमृतसर, नांदेड-दिल्ली आणि नांदेड-चंदीगड ही प्रवासी सेवा सुरू आहे. याबरोबरच नांदेड-हैद्राबाद आणि नांदेड-मुंबई अशी टू जेटच्या माध्यमातून दररोज सेवा देण्यात येते. नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा असल्याने दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक नांदेडला येत असतात. याबरोबरच नांदेड शेजारील हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि लातूर या जिल्ह्यातील नागरिकही नांदेड येथूनच विमान प्रवास करण्यास पसंत देत असल्याने नांदेडमधील हवाई प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. कोरोना प्रादुर्भावामुळे देशांतर्गत सेवा बंद केल्यानंतर नांदेड-अमृतसरसह इतर उड्डाणेही थांबली होती. मात्र मध्यंतरी प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यातील बहुतांश सेवा पूर्ववत झाल्या आहेत.

चौकट.............

औरंगाबादेतील प्रवासी संख्येतही किंचित घट

२०१९ मध्ये शिर्डी विमानतळावरून २ लाख २९ हजार प्रवाशांनी उड्डाण घेतले होते. यात २०२० मध्ये मोठी वाढ झाली असून ५ लाख ६९ हजार प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. कोल्हापूरमध्येही २०१९ मध्ये १८ हजार प्रवाशांनी विमानसेवेला प्राधान्य दिले होते. यामध्ये वाढ होत २०२० मध्ये १ लाख ३१ हजारावर प्रवासी संख्या पोहोचली. तीच बाब नाशिकच्या बाबतीत नाशिक ओझर येथून २०१९ मध्ये ४४ हजार प्रवाशांनी उड्डाण घेतले होते. २०२० मध्ये ही संख्या १ लाख २ हजारांवर पोहोचली. दुसरीकडे मुंबई, पुण्यासह औरंगाबादेतील देशाअंतर्गत प्रवासी संख्येत २०१९ च्या तुलनेत घट झाली आहे. २०१९ मध्ये औरंगाबाद येथील ३ लाख ४७ हजार प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. २०२० मध्ये ही संख्या ३ लाख ४६ हजार झाली आहे.