शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोरोना प्रादुर्भावातही नांदेडकरांचा विमानप्रवास सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:18 IST

नांदेड : कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षी राज्यातील देशांतर्गत विमान सेवा मोठ्या प्रमाणात खंडित झाली होती. त्यामुळेच राज्यातील हवाई प्रवासी ...

नांदेड : कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षी राज्यातील देशांतर्गत विमान सेवा मोठ्या प्रमाणात खंडित झाली होती. त्यामुळेच राज्यातील हवाई प्रवासी संख्येतही २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये घट झाली आहे. मात्र त्यानंतरही शिर्डी, कोल्हापूरसह नांदेड येथील प्रवासी संख्या वाढल्याचे चित्र आहे. नांदेडमध्ये २०१९ मध्ये १ लाख १८ हजार प्रवाशांनी हवाई सेवेचा लाभ घेतला होता. २०२० मध्ये हीच संख्या १ लाख ३७ हजारांवर पोहोचली आहे.

कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे मागील वर्षी अनेक ठिकाणची देशांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळेच हवाई प्रवाशांच्या संख्येवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये राज्यात १ कोटी ४६ लाख ३३ हजार प्रवाशांनी देशांतर्गत विमान सेवेचा लाभ घेतला होता. २०२० मध्ये या प्रवासी संख्येत घट झाली असून ती संख्या १ कोटी २५ लाखांवर आली आहे. मात्र अशा विपरीत परिस्थितीतही नांदेडमधील हवाई प्रवाशांची संख्या वाढल्याचे सकारात्मक चित्र आहे.

नांदेड विमानतळावरून सध्या एअर इंडियाची नांदेड-अमृतसर, नांदेड-दिल्ली आणि नांदेड-चंदीगड ही प्रवासी सेवा सुरू आहे. याबरोबरच नांदेड-हैद्राबाद आणि नांदेड-मुंबई अशी टू जेटच्या माध्यमातून दररोज सेवा देण्यात येते. नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा असल्याने दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक नांदेडला येत असतात. याबरोबरच नांदेड शेजारील हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि लातूर या जिल्ह्यातील नागरिकही नांदेड येथूनच विमान प्रवास करण्यास पसंत देत असल्याने नांदेडमधील हवाई प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. कोरोना प्रादुर्भावामुळे देशांतर्गत सेवा बंद केल्यानंतर नांदेड-अमृतसरसह इतर उड्डाणेही थांबली होती. मात्र मध्यंतरी प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यातील बहुतांश सेवा पूर्ववत झाल्या आहेत.

चौकट.............

औरंगाबादेतील प्रवासी संख्येतही किंचित घट

२०१९ मध्ये शिर्डी विमानतळावरून २ लाख २९ हजार प्रवाशांनी उड्डाण घेतले होते. यात २०२० मध्ये मोठी वाढ झाली असून ५ लाख ६९ हजार प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. कोल्हापूरमध्येही २०१९ मध्ये १८ हजार प्रवाशांनी विमानसेवेला प्राधान्य दिले होते. यामध्ये वाढ होत २०२० मध्ये १ लाख ३१ हजारावर प्रवासी संख्या पोहोचली. तीच बाब नाशिकच्या बाबतीत नाशिक ओझर येथून २०१९ मध्ये ४४ हजार प्रवाशांनी उड्डाण घेतले होते. २०२० मध्ये ही संख्या १ लाख २ हजारांवर पोहोचली. दुसरीकडे मुंबई, पुण्यासह औरंगाबादेतील देशाअंतर्गत प्रवासी संख्येत २०१९ च्या तुलनेत घट झाली आहे. २०१९ मध्ये औरंगाबाद येथील ३ लाख ४७ हजार प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. २०२० मध्ये ही संख्या ३ लाख ४६ हजार झाली आहे.