शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत कंधार तालुक्यातील ३० गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:17 IST

तालुक्यात दोन टप्प्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत ३० गावांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आलेगाव, औराळ, बामणी ...

तालुक्यात दोन टप्प्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत ३० गावांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आलेगाव, औराळ, बामणी प.क., बिंडा, चौकी महाकाया, चौकी धर्मापुरी, चिखली, चिंचोली प.क., दहिकळंबा, दाताळा, गुंडा, हळदा, हिस्से औराळ, मजरे वरवंट, मजरे सांगवी, नंदनवन, सावळेश्वर, आदी गावांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात बाचोटी, देवयाचीवाडी, गोगदरी, गोणार, जाकापूर, कल्लाळी, पेठवडज, रुई, सावरगाव नि., शिरसी बु., शिरशी खू., येलूर, आदी गावांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत विविध घटकांचा समावेश आहे.

या योजनेअंतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, फळबाग लागवड, रेशीम शेती, मधुमक्षिका पालन, शेततळे, नाडेप कंपोस्ट, गांडूळखत, आदी वैयक्तिक लाभाच्या घटकांकरिता ग्रामसंजीवनी समितीच्या मंजुरीसह अर्ज करता येतात. गावातील संबंधित समूह संघटक व कृषी साहाय्यक यांच्याशी संपर्क साधून शेतकरी बांधवांनी वैयक्तिक लाभाची मागणी नोंदवायची आहे. प्रकल्पांतर्गत गावातील शेतकरी गटांनी कृषी अवजारे बँक यात ट्रॅक्टर, बीबीएफ यंत्रांसह इतर ट्रॅक्टरचलित अवजारे व त्यासाठी शेडची उभारणी या सामुदायिक घटकांसाठी २० लाख रुपयांपर्यंत प्रस्ताव सादर करता येतो. त्यासाठी ६० टक्के अनुदान उपलब्ध आहे.

शेतीमालावर आधारित प्रक्रिया केंद्र, गोदाम यांसारखे सामूहिक घटकांसाठी प्रस्ताव दाखल करता येतात. योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी ६० टक्क्यांपासून ते ८० टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. तालुक्यातील इतर गावांतील शेतकऱ्यांना प्रकल्पांतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे सामूहिक घटकांचा लाभ घेता येईल. त्यात अवजारे बँक, शेतमाल प्रक्रिया केंद्र, गोदाम अशा घटकांचा लाभ घेता येईल. त्यासाठी अनुदानाची मर्यादा ६० टक्के आहे.

.................................

चौकट

तालुक्यातील ८ हजार १५९ शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केले असून ३ हजार ४८४ जणांनी मागणी नोंदविली आहे. समूह साहाय्यक, कृषी साहाय्यक स्तरावरून २ हजार ९६७ लाभार्थींची पडताळणी करण्यात आली आहे.२ हजार ९२० जणांना विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांनी ऑनलाईन पूर्वसंमती दिली; तसेच १ हजार १६३ शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली. ६२८ शेतकऱ्यांना योजनेतून डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभ खात्यात हस्तांतरित करण्यात आला असल्याचे तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी सांगितले.

जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे,नांदेडचे उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव, कंधार तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, मंडल कृषी अधिकारी, कंधार बारूळ, पेठवडज, कृषी पर्यवेक्षक, कृषी साहाय्यक, समूह संघटक यांच्या मदतीने तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.