शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:17 IST

शाळाबाह्य विद्यार्थी राहू नयेत, यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र, विद्यार्थी गळतीचे प्रमाण विविध कारणांमुळे सुरूच ...

शाळाबाह्य विद्यार्थी राहू नयेत, यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र, विद्यार्थी गळतीचे प्रमाण विविध कारणांमुळे सुरूच आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी यामध्ये सर्वाधिक आहेत. गावात काम मिळत नसल्याने अनेक नागरिक दरवर्षी मोठ्या शहरात कामासाठी स्थलांतरित होतात. अशा वेळी मुलांनाही सोबत घेऊन जातात. जर मुलगा १५, १६ वर्षांचा असेल तर त्यालाही एखादे काम मिळवून देतात. त्यामुळे शिक्षणापासून या विद्यार्थ्यांची नाळ तुटत आहे. अनेक कारणांपैकी स्थलांतर हे प्रमुख कारण असून, दरवर्षी जवळपास २ ते अडीच हजार विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवली आहे.

जिल्ह्यात प्राथमिक विद्यार्थ्यांच्या तुलनेत माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण अधिक असून हिमायतनगर व मुदखेड तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांची गळती आहे. विद्यार्थ्यांच्या या गळतीचे कारण स्थलांतर आहे. ग्रामीण भागातील पालक पोटासाठी मुंबई, पुणे, हैदराबाद आदी शहरांत जातात. त्यामुळे विद्यार्थीही पालकांसोबत स्थलांतरित होतात. जिल्ह्यात जवळपास अडीच हजार विद्यार्थी ड्राॅप झाले.