शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:17 IST

शाळाबाह्य विद्यार्थी राहू नयेत, यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र, विद्यार्थी गळतीचे प्रमाण विविध कारणांमुळे सुरूच ...

शाळाबाह्य विद्यार्थी राहू नयेत, यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र, विद्यार्थी गळतीचे प्रमाण विविध कारणांमुळे सुरूच आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी यामध्ये सर्वाधिक आहेत. गावात काम मिळत नसल्याने अनेक नागरिक दरवर्षी मोठ्या शहरात कामासाठी स्थलांतरित होतात. अशा वेळी मुलांनाही सोबत घेऊन जातात. जर मुलगा १५, १६ वर्षांचा असेल तर त्यालाही एखादे काम मिळवून देतात. त्यामुळे शिक्षणापासून या विद्यार्थ्यांची नाळ तुटत आहे. अनेक कारणांपैकी स्थलांतर हे प्रमुख कारण असून, दरवर्षी जवळपास २ ते अडीच हजार विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवली आहे.

जिल्ह्यात प्राथमिक विद्यार्थ्यांच्या तुलनेत माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण अधिक असून हिमायतनगर व मुदखेड तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांची गळती आहे. विद्यार्थ्यांच्या या गळतीचे कारण स्थलांतर आहे. ग्रामीण भागातील पालक पोटासाठी मुंबई, पुणे, हैदराबाद आदी शहरांत जातात. त्यामुळे विद्यार्थीही पालकांसोबत स्थलांतरित होतात. जिल्ह्यात जवळपास अडीच हजार विद्यार्थी ड्राॅप झाले.