शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

वीज महापारेषणमधील मनुष्यबळ कमी होणार, सुधारित संरचनेला अखेर मुहूर्त सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 18:12 IST

ही सुधारित संरचना अंमलात आणताना संचालन-सुव्यवस्था आणि प्रकल्प, असे दोन भाग पाडण्यात आले आहेत.

ठळक मुद्देचार वर्षांनंतर आदेश जारी मनुष्यबळ कमी होणारकार्यप्रणालीवर परिणामाची चिंता

नांदेड : महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीमधील २०१७ पासून प्रलंबित असलेल्या मनुष्यबळाच्या संरचनेचा मार्ग अखेर सुकर झाला आहे. १५ जून रोजी ही संरचना अंमलात आणण्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला.

ही सुधारित संरचना अंमलात आणताना संचालन-सुव्यवस्था आणि प्रकल्प, असे दोन भाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक युनिटमध्ये सुधारित संरचना अंमलात आणण्याचा प्रयत्न झाला आहे. अभियंता आणि तांत्रिक संवर्ग याची संरचना केल्यामुळे आणि काही संवर्गांचे विलिनीकरण केल्यामुळे सध्या मंजूर असलेल्या पदांची संख्या कमी झाली आहे. मनुष्यबळाची संरचना करताना एचव्हीडीसी, तपासणी विभाग, उपकेंद्र आणि वीजवाहिनीचे संचालन व सुव्यवस्था, पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पातील मनुष्यबळ, दूरसंचार विभाग, १३२ केव्ही, २२० केव्ही, ४०० केव्ही, ७६५ केव्ही यातील उपकेंद्र, भांडार व्यवहार, वीजवाहिनी आणि उपकेंद्रांच्या जिवंत वाहिनीवर काम करण्यासाठी मनुष्यबळ, तपासणी विभाग, नोडल, उपकेंद्र अशा प्रकारे विविध विभागांतील संरचना करण्यात आली आहे. या नव्या संरचनेमुळे महापारेषणमधील संचालन, सुव्यवस्था, पायाभूत सुविधांसाठी कार्यान्वित संरचनेमुळे कार्यप्रणालीवर विपरीत परिणाम तर होणार नाही ना, अशी हुरहुर व्यक्त केली जात आहे. या सुधारित संरचनेमुळे महापारेषणमधील मनुष्यबळ बरेच कमी होणार आहे.

महापारेषण कंपनीमध्ये सुरुवातीला पीडब्ल्यूसी, नंतर हॅविट यांनी मनुष्यबळाच्या संरचनेबाबत शिफारशी केल्या. मात्र समाधान न झाल्याने बदलाबाबत १७ नोव्हेंबर २०१७ ला आदेश जारी करण्यात आला. मात्र, त्याच्या अंमलबजावणीचा मुहूर्त मिळाला नाही. त्या आदेशाला कार्यकारी संचालकांनी (मानव संसाधन) ७ जानेवारी २०१९ ला स्थगनादेश दिला. तो आतापर्यंत कायम होता. अखेर १५ जून २०२१ रोजी मनुष्यबळ संरचना अंमलबजावणीचे आदेश निर्गमित केले गेले.

टॅग्स :Nandedनांदेडelectricityवीज