ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन दाखल करणे सुरू आहे.
मागील तीन दिवसांपासून अद्याप एक ही अर्ज दाखल झालेला नाही.
मालेगाव ग्रामपंचायत निवडणूक ही एकूण १५ प्रभाग व सदस्यांसाठी आहे. सरपंच पदाचे आरक्षण पूर्वी सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले होते. त्यावेळी अनेक सरपंच पदासाठी दावेदार व पॅनल करण्यासाठी तयार झाले होते. आरक्षणात बदल झाल्यामुळे अनेकांनी माघार ही घेतली.
मागील आठ महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या काळात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आगाऊ खर्चाला कात्री लावत ही निवडणूक बिनविरोध निघावी यासाठी प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक ही प्रयत्न करत आहेत.
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर आहे. अद्याप एकही अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल झाला नाही.
अनेक इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रे जमावाजमव करत आहेत.
येत्या दोन दिवसांत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी किती अर्ज दाखल होतील यावरून उमेदवार निश्चित होतील.
जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास त्यातून विविध प्रभागात उमेदवार व मतदारांशी चर्चा करून ती जागा बिनविरोध काढण्यासाठी सर्व पक्षांचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक पुढे आले आहेत.
अर्धापूर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या मालेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध निघेल की विविध पॅनल हाेऊन निवडणूक होईल याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. गावपुढारी मात्र यंदाची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी सरसावले आहेत.