शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेत लाखोंचा अपहार

By admin | Updated: December 1, 2014 15:04 IST

पाणीपुरवठा योजनेच्या कामात लाखोंचा अपहार झाल्याची बाब जि. प. च्या उप कार्यकारी अभियंता यांनी केलेल्या चौकशी अहवालात समोर आली आहे.

 

नांदेड: राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातंर्गत नांदेड तालुक्यातील मौजे वानेगाव, वरखेड, भानपूर येथे सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात लाखोंचा अपहार झाल्याची बाब जि. प. च्या उप कार्यकारी अभियंता यांनी केलेल्या चौकशी अहवालात समोर आली आहे. 
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. या योजनेंतर्गत मौजे वानेगाव-वरखेड-भानपूर ता. नांदेड ही पाणी पुरवठा योजना वर्षे २0१२-१३ मध्ये मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये विहीर, स्वीचरूम, पंपीग मशीनरी, उद्धरण नलिका, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था आदी कामांचा समावेश आहे. निविदेनुसार सर्व कामे १८ महिन्यात पुर्ण करण्याचे बंधनकारक आहे. परंतु, २0 महिन्यांचा कालावधीत केवळ ३0 टक्के काम पुर्ण झाले आहे. 
सद्यस्थितीत काम बंद असल्याने गावकर्‍यांच्या तक्रारीवरून उप कार्यकारी अभियंता (पापु) जिल्हा परिषद यांच्या मार्फत सदरील कामाची चौकशी केली असता नियमबाह्य आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे. उप कार्यकारी अभियंता यांच्या अहवालानुसार ठेकेदारामार्फत झालेल्या कामांचे मुल्यांकन करून पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या मागणीनुसार दोन टप्प्यात दहा लाख रूपये देण्यात आले आहेत. दरम्यान, १ लाख ३१ हजार ९५५ अद्याप ग्रामपंचायतीने समितीच्या खात्यावर वर्ग केलेले नाहीत तसेच समितीने लोकवर्गणीची रक्कम २ लाख रूपये सदर खात्यावर भरणा केली नसल्याचे अहवालात म्हटले आहे. 
बँकेतील आर्थिक व्यवहार धनादेशाद्वारे करणे बंधनकारक असतानाही समितीने विनापरवानगी शिफारस पत्र न घेता नगदी स्वरूपात व्यवहार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. समितीने गुत्तेदाराला धनादेशानूसार ६ लाख रूपये दिलेले आहेत. मोजमाप पुस्तीकेच्या नोंदीप्रमाणे आजपर्यंत झालेल्या कामांचे मुल्यांकन १३ लाख ८४४ रूपये होत आहे. 
पाणीपुरवठा समितीने खात्यावरील रक्कम उचलून ती गुत्तेदारास न दिल्यामुळे गत सहा महिन्यापासून काम बंद असल्याची तक्रार गावकर्‍यांनी केली आहे. तसेच १0 टक्के लोकवाटा न भरता भरला असल्याचे हमीपत्र देवून समितीने शासनाची फसवणूक केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
 
गावकर्‍यांची कारवाईची मागणी...
 
■ वानेगाव, वरखेड, भानपूर येथील गावकर्‍यांना सदरील योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर सुटेल अशी आशा होती. परंतु, पाणी पुरवठा समितीने केलेल्या नियमबाह्य आर्थिक व्यवहार आणि अपहारामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम बंद पडले आहे. अपहार करणार्‍यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे.