शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पाणीपुरवठा योजनेत लाखोंचा अपहार

By admin | Updated: December 1, 2014 15:04 IST

पाणीपुरवठा योजनेच्या कामात लाखोंचा अपहार झाल्याची बाब जि. प. च्या उप कार्यकारी अभियंता यांनी केलेल्या चौकशी अहवालात समोर आली आहे.

 

नांदेड: राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातंर्गत नांदेड तालुक्यातील मौजे वानेगाव, वरखेड, भानपूर येथे सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात लाखोंचा अपहार झाल्याची बाब जि. प. च्या उप कार्यकारी अभियंता यांनी केलेल्या चौकशी अहवालात समोर आली आहे. 
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. या योजनेंतर्गत मौजे वानेगाव-वरखेड-भानपूर ता. नांदेड ही पाणी पुरवठा योजना वर्षे २0१२-१३ मध्ये मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये विहीर, स्वीचरूम, पंपीग मशीनरी, उद्धरण नलिका, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था आदी कामांचा समावेश आहे. निविदेनुसार सर्व कामे १८ महिन्यात पुर्ण करण्याचे बंधनकारक आहे. परंतु, २0 महिन्यांचा कालावधीत केवळ ३0 टक्के काम पुर्ण झाले आहे. 
सद्यस्थितीत काम बंद असल्याने गावकर्‍यांच्या तक्रारीवरून उप कार्यकारी अभियंता (पापु) जिल्हा परिषद यांच्या मार्फत सदरील कामाची चौकशी केली असता नियमबाह्य आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे. उप कार्यकारी अभियंता यांच्या अहवालानुसार ठेकेदारामार्फत झालेल्या कामांचे मुल्यांकन करून पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या मागणीनुसार दोन टप्प्यात दहा लाख रूपये देण्यात आले आहेत. दरम्यान, १ लाख ३१ हजार ९५५ अद्याप ग्रामपंचायतीने समितीच्या खात्यावर वर्ग केलेले नाहीत तसेच समितीने लोकवर्गणीची रक्कम २ लाख रूपये सदर खात्यावर भरणा केली नसल्याचे अहवालात म्हटले आहे. 
बँकेतील आर्थिक व्यवहार धनादेशाद्वारे करणे बंधनकारक असतानाही समितीने विनापरवानगी शिफारस पत्र न घेता नगदी स्वरूपात व्यवहार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. समितीने गुत्तेदाराला धनादेशानूसार ६ लाख रूपये दिलेले आहेत. मोजमाप पुस्तीकेच्या नोंदीप्रमाणे आजपर्यंत झालेल्या कामांचे मुल्यांकन १३ लाख ८४४ रूपये होत आहे. 
पाणीपुरवठा समितीने खात्यावरील रक्कम उचलून ती गुत्तेदारास न दिल्यामुळे गत सहा महिन्यापासून काम बंद असल्याची तक्रार गावकर्‍यांनी केली आहे. तसेच १0 टक्के लोकवाटा न भरता भरला असल्याचे हमीपत्र देवून समितीने शासनाची फसवणूक केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
 
गावकर्‍यांची कारवाईची मागणी...
 
■ वानेगाव, वरखेड, भानपूर येथील गावकर्‍यांना सदरील योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर सुटेल अशी आशा होती. परंतु, पाणी पुरवठा समितीने केलेल्या नियमबाह्य आर्थिक व्यवहार आणि अपहारामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम बंद पडले आहे. अपहार करणार्‍यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे.