शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

पाणीपुरवठा योजनेत लाखोंचा अपहार

By admin | Updated: December 1, 2014 15:04 IST

पाणीपुरवठा योजनेच्या कामात लाखोंचा अपहार झाल्याची बाब जि. प. च्या उप कार्यकारी अभियंता यांनी केलेल्या चौकशी अहवालात समोर आली आहे.

 

नांदेड: राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातंर्गत नांदेड तालुक्यातील मौजे वानेगाव, वरखेड, भानपूर येथे सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात लाखोंचा अपहार झाल्याची बाब जि. प. च्या उप कार्यकारी अभियंता यांनी केलेल्या चौकशी अहवालात समोर आली आहे. 
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. या योजनेंतर्गत मौजे वानेगाव-वरखेड-भानपूर ता. नांदेड ही पाणी पुरवठा योजना वर्षे २0१२-१३ मध्ये मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये विहीर, स्वीचरूम, पंपीग मशीनरी, उद्धरण नलिका, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था आदी कामांचा समावेश आहे. निविदेनुसार सर्व कामे १८ महिन्यात पुर्ण करण्याचे बंधनकारक आहे. परंतु, २0 महिन्यांचा कालावधीत केवळ ३0 टक्के काम पुर्ण झाले आहे. 
सद्यस्थितीत काम बंद असल्याने गावकर्‍यांच्या तक्रारीवरून उप कार्यकारी अभियंता (पापु) जिल्हा परिषद यांच्या मार्फत सदरील कामाची चौकशी केली असता नियमबाह्य आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे. उप कार्यकारी अभियंता यांच्या अहवालानुसार ठेकेदारामार्फत झालेल्या कामांचे मुल्यांकन करून पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या मागणीनुसार दोन टप्प्यात दहा लाख रूपये देण्यात आले आहेत. दरम्यान, १ लाख ३१ हजार ९५५ अद्याप ग्रामपंचायतीने समितीच्या खात्यावर वर्ग केलेले नाहीत तसेच समितीने लोकवर्गणीची रक्कम २ लाख रूपये सदर खात्यावर भरणा केली नसल्याचे अहवालात म्हटले आहे. 
बँकेतील आर्थिक व्यवहार धनादेशाद्वारे करणे बंधनकारक असतानाही समितीने विनापरवानगी शिफारस पत्र न घेता नगदी स्वरूपात व्यवहार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. समितीने गुत्तेदाराला धनादेशानूसार ६ लाख रूपये दिलेले आहेत. मोजमाप पुस्तीकेच्या नोंदीप्रमाणे आजपर्यंत झालेल्या कामांचे मुल्यांकन १३ लाख ८४४ रूपये होत आहे. 
पाणीपुरवठा समितीने खात्यावरील रक्कम उचलून ती गुत्तेदारास न दिल्यामुळे गत सहा महिन्यापासून काम बंद असल्याची तक्रार गावकर्‍यांनी केली आहे. तसेच १0 टक्के लोकवाटा न भरता भरला असल्याचे हमीपत्र देवून समितीने शासनाची फसवणूक केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
 
गावकर्‍यांची कारवाईची मागणी...
 
■ वानेगाव, वरखेड, भानपूर येथील गावकर्‍यांना सदरील योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर सुटेल अशी आशा होती. परंतु, पाणी पुरवठा समितीने केलेल्या नियमबाह्य आर्थिक व्यवहार आणि अपहारामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम बंद पडले आहे. अपहार करणार्‍यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे.