शहरं
Join us  
Trending Stories
1
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
2
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
3
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
4
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
5
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
6
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
7
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
8
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
9
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
10
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
11
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
12
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
13
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
14
Video: विराट - गंभीरमधील वाद ताणला गेला का? एअरपोर्टवर सिलेक्टरशी किंग कोहलीशी गंभीर चर्चा
15
कर्जमुक्त असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, २०% चं अपर सर्किट; ₹३३ वर आली किंमत
16
"प्रत्येक नागरिकाच्या फोनमध्ये प्रवेश कशाला?"; 'संचार साथी' ॲपवरुन प्रियांका गांधींचा केंद्राला थेट सवाल
17
कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? 
18
१५ डिसेंबरपूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
19
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
20
अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेत लाखोंचा अपहार

By admin | Updated: December 1, 2014 15:04 IST

पाणीपुरवठा योजनेच्या कामात लाखोंचा अपहार झाल्याची बाब जि. प. च्या उप कार्यकारी अभियंता यांनी केलेल्या चौकशी अहवालात समोर आली आहे.

 

नांदेड: राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातंर्गत नांदेड तालुक्यातील मौजे वानेगाव, वरखेड, भानपूर येथे सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात लाखोंचा अपहार झाल्याची बाब जि. प. च्या उप कार्यकारी अभियंता यांनी केलेल्या चौकशी अहवालात समोर आली आहे. 
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. या योजनेंतर्गत मौजे वानेगाव-वरखेड-भानपूर ता. नांदेड ही पाणी पुरवठा योजना वर्षे २0१२-१३ मध्ये मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये विहीर, स्वीचरूम, पंपीग मशीनरी, उद्धरण नलिका, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था आदी कामांचा समावेश आहे. निविदेनुसार सर्व कामे १८ महिन्यात पुर्ण करण्याचे बंधनकारक आहे. परंतु, २0 महिन्यांचा कालावधीत केवळ ३0 टक्के काम पुर्ण झाले आहे. 
सद्यस्थितीत काम बंद असल्याने गावकर्‍यांच्या तक्रारीवरून उप कार्यकारी अभियंता (पापु) जिल्हा परिषद यांच्या मार्फत सदरील कामाची चौकशी केली असता नियमबाह्य आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे. उप कार्यकारी अभियंता यांच्या अहवालानुसार ठेकेदारामार्फत झालेल्या कामांचे मुल्यांकन करून पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या मागणीनुसार दोन टप्प्यात दहा लाख रूपये देण्यात आले आहेत. दरम्यान, १ लाख ३१ हजार ९५५ अद्याप ग्रामपंचायतीने समितीच्या खात्यावर वर्ग केलेले नाहीत तसेच समितीने लोकवर्गणीची रक्कम २ लाख रूपये सदर खात्यावर भरणा केली नसल्याचे अहवालात म्हटले आहे. 
बँकेतील आर्थिक व्यवहार धनादेशाद्वारे करणे बंधनकारक असतानाही समितीने विनापरवानगी शिफारस पत्र न घेता नगदी स्वरूपात व्यवहार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. समितीने गुत्तेदाराला धनादेशानूसार ६ लाख रूपये दिलेले आहेत. मोजमाप पुस्तीकेच्या नोंदीप्रमाणे आजपर्यंत झालेल्या कामांचे मुल्यांकन १३ लाख ८४४ रूपये होत आहे. 
पाणीपुरवठा समितीने खात्यावरील रक्कम उचलून ती गुत्तेदारास न दिल्यामुळे गत सहा महिन्यापासून काम बंद असल्याची तक्रार गावकर्‍यांनी केली आहे. तसेच १0 टक्के लोकवाटा न भरता भरला असल्याचे हमीपत्र देवून समितीने शासनाची फसवणूक केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
 
गावकर्‍यांची कारवाईची मागणी...
 
■ वानेगाव, वरखेड, भानपूर येथील गावकर्‍यांना सदरील योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर सुटेल अशी आशा होती. परंतु, पाणी पुरवठा समितीने केलेल्या नियमबाह्य आर्थिक व्यवहार आणि अपहारामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम बंद पडले आहे. अपहार करणार्‍यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे.