शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

वानरांचा धुमाकुळ, नुकसान आणि भीतीने कासराळीकर वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST

कासराळी : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कासराळीत सातत्याने वानर व माकडांनी उच्छाद मांडला असून, गच्चीवरील वाळवण आणि शेतातील उभे ...

कासराळी : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कासराळीत सातत्याने वानर व माकडांनी उच्छाद मांडला असून, गच्चीवरील वाळवण आणि शेतातील उभे पीक माकडे फस्त करत आहेत. यावेळी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास या वानरांची सामूहिक टोळी नागरिकांवर प्रतिहल्ला करत असून, यामुळे शेतकरी व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कासराळी परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वानरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून, एकाहून अधिक संख्येने या टोळ्यांनी गावालगत असलेल्या शेतात, झाडांवर आपले बस्तान बसवले आहे. शेतीतील निर्मनुष्यतेचा फायदा उठवत वानरांकडून हरभरा, ज्वारी, तूर, टरबूज आदी पिके फस्त केली जात आहेत. वानरांच्या उभ्या पिकात बागडण्यानेही तेवढेच नुकसान होत आहे तर घरासमोरील मोकळ्या जागेत, गच्चीवर वाळवणासाठी ठेवलेल्या धान्याचीही विल्हेवाट लावत आहेत. वानर महिला, लहान बालकांच्या अंगावर खेकसतात. शेतातील वानरांच्या या धुमाकुळाचा शेतकऱ्यांना मोठा त्रास होत असून, नुकसानही होत आहे. तसेच हुसकावून लावणाऱ्या शेतकऱ्यांवर वानर सामूहिकपणे हल्ला चढविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, प्रतिकार केला तरीही अनेकदा वानरांकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. वानर व माकडांच्या या उपद्रवाने कासराळीकर कमालीचे वैतागले असून, वन विभागाने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील रहिवासी गजानन कोटपलवाड यांनी नांदेड येथील सहाय्यक वनसंरक्षक डी. एस. पवार यांच्याकडे केली होती. मात्र, यासाठी कसलेही बजेट वन विभागाकडे नाही. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून या वानरांचा बंदोबस्त करावा, असे सुचवल्याने कासराळीत वानरांच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थांनी सामाजिक माध्यमातून मदतीचे आवाहन केले आहे. सध्या तरी येथील महिला, बालकांसह शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास होत असून, वानरांनी कासराळीकरांना पुरते हैराण केले आहे.