शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कंधार तालुक्यात अपु-या निधीमुळे पाणंदमुक्तीला खीळ; प्रशासन शौचालयांसाठी ग्रामपंचायतीचा निधी वापरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:58 IST

ग्रामपंचायती वित्त आयोगाच्या निधीतून विविध कामे करतात़ हा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात गावांना मिळतो़ मोठ्या गावात निधी मोठा असतो़ परंतु कामाची संख्या व निधीचा ताळमेळ बसत नाही़ त्यातच लहान गावाचीही अशीच गत आहे़ निधी अल्प व कामे यात तफावत असते़

कंधार (नांदेड) : तालुका पाणंदमुक्तीसाठी शौचालय बांधकामे करण्याला निधीची आडकाठी आली़ त्यामुळे कामांना खीळ बसली़ अपुर्‍या निधीची कोंडी फोडण्यासाठी पाणंदमुक्तीला ग्रामपंचायत स्तरावरील निधीची मात्रा देऊन बांधकामातील अडथळा दूर करण्याचे सांगण्यात आले़ त्यातून १२ हजार ६२१ शौचालयाचे बांधकाम करून तालुका मार्च २०१८ अखेर पाणंदमुक्त होणार का? याची उत्सुकता लागली आहे़

तालुक्यात ११६ ग्रामपंचायती असून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी पंचायत समितीने विविध टप्पे तयार केले़ स्वच्छतेची मोठी चळवळ निर्माण करण्यात यश आले़ ऐन दुष्काळ, सुगीच्या हंगामात शेतकरी-शेतमजुरांनी चळवळ गतिमान करण्यात सक्रिय योगदान दिले़ परंतु शौचालय बांधकाम करूनही निधीचा तुटवडा निर्माण झाला़ ५१ गावे पाणंदमुक्त झाली़ परंतु निधीअभावी उद्दिष्ट पूर्ण करण्यात मोठा गतिरोध निर्माण झाला़ दीड हजारांपेक्षा अधिक प्रस्ताव निधीची वाणवा झाल्याने रखडले़ त्यामुळे पाणंदमुक्तीचे भवितव्य अधांतरी झाले़ आणि ही चळवळ थंडावते की काय, असे चित्र निर्माण झाले़ तालुका स्तरावरून निधीची मागणी होवूनही पुरवठा मात्र होत नव्हता़ वरिष्ठ पातळीवरूनही प्रयत्नांची पराकाष्ठा होत होती़.मात्र आता निधीची कोंडी फोडण्यासाठी मार्ग काढण्यात आला आहे़ 

तालुक्यात ४० हजार ७९८ पैकी २८ हजार १७७ शौचालये बांधकाम पूर्ण झाली़ त्यात ५१ गावे पाणंदमुक्त झाली़ अद्याप ६५ गावे ही पाणंदमुक्ते करण्यासाठी १२ हजार ६२१ शौचालयाची कामे पूर्ण करावी लागतील़ त्यात आता तळ्याचीवाडी ३२, बोरी खु़ ५५, शिरसी बु़ ५९, बोळका ६०, मानसिंगवाडी ६०, संगुचीवाडी ६५, दाताळा ६७, रामानाईकतांडा ७९, उमरगा खो़-८०, पोखर्णी ८४, धर्मापुरी मजरे ८५, दैठणा-९२, आलेगाव ९८, नारनाळी ९९, काटकळंबा १०१, औराळ १०३, शिरूर १०३, रुई १०६, पांगरा ११०, बोरी बु़ ११७, कंधारेवाडी ११७, हाडोळी ब्ऱ-११८, सावरगाव (नि़)-१२८, हटक्याळ १२९, शेकापूर १३१, शेल्लाळी १३१, बिजेवाडी १३६, उमरज १४३, येलूर १४५, तेलूर १५१, बामणी १५३, पानशेवडी १५६, कोटबाजार १५८, कळका १६२, लाडका १६४, हिप्परगा (श़)-१७०, गऊळ-२४३, दिग्रस खु़-१८७, नंदनवन १८७, शिराढोण १९१, दहीकळंबा १९२, मंगलसांगवी-२१८, कौठा-२२१, बाचोटी-२२३, घागरदरा-२२८, कल्हाळी २३२, खंडगाव (ह)-२५२, गुंटूर-२६३, फुलवळ-२६९, हाळदा २८२, वहाद-२८२, आंबुलगा-२८३, चिखली-२८७, मंगनाळी ३८२, पानभोसी-३९६, कुरुळा ५३६, उस्माननगर ५९७ व पेठवडज ९३२ अशी शौचालये बांधकामे आहेत़

१४ वा वित्त आयोग, सीएसआर, नरेगा निधीचा वापर होणारग्रामपंचायती वित्त आयोगाच्या निधीतून विविध कामे करतात़ हा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात गावांना मिळतो़ मोठ्या गावात निधी मोठा असतो़ परंतु कामाची संख्या व निधीचा ताळमेळ बसत नाही़ त्यातच लहान गावाचीही अशीच गत आहे़ निधी अल्प व कामे यात तफावत असते़. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे़ १४ वा वित्त आयोग, सीएसआर, नरेगा, स्थानिक निधी आदींचा वापर कसा केला जाणार आहे आणि तालुक्यातील ६५ ग्रामपंचायती कशा पाणंदमुक्त होणार आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़ गावपातळीवरील लोकप्रतिनिधी यांचा प्रतिसाद, पं़स़चे नियोजन व पाठपुरावा यावरच तालुका पाणंदमुक्तीचे भवितव्य अवलंबून आहे़ 

स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या निधीचा उपयोग शौचालय बांधकामासाठी करण्याचे निर्देश दिले आहेत़ नरेगा, चौदावा वित्त आयोग, सीएसआर, स्थानिक निधी, लोकसहभाग आदी निधीचा वापर करण्याच्या सूचना जि़प़  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिका-यांना दिल्या आहेत.

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNandedनांदेड