अर्धापूर तालुक्यातील भाजप युवा मोर्चाचे सक्रिय कार्यकर्ते जठन पाटील मुळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची भाजयुमोच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून यावेळी जठन पाटील मुळे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळी माझ्यावर विश्वास टाकला त्यो सार्थ ठरविण्यासाठी पार्टीने जो कार्यक्रम दिला तो प्रभावीपणे राबविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार असल्याचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष जठन पाटील मुळे यांनी अशी प्रतिक्रिया आमच्याशी बोलताना दिली आहे.
भाजयुमोचे तालुकाध्यक्ष जठन मुळे पाटील यांच्या निवडीचे भाजप जिल्हा चिटणीस डॉ. लक्ष्मण इंगोले, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुधाकर कदम, युवा नेते विराज देशमुख, शहराध्यक्ष विलास साबळे, माजी जि.प. सदस्य रामराव भालेराव, सरचिटणीस अवधूत कदम, उद्धव कदम, बाबूराव लंगडे, ॲड. बालाजी कदम, जगन कल्याणकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. वर्षाताई बंडाळे, आनंद वैद्ये, पंतप्रधान प्रसार प्रचार तालुकाध्यक्ष तुळशीराम बंडाळे, आत्माराम राजेगोरे, बाबूराव क्षीरसागर, योगेश हळदे, नगरसेवक शिवराज जाधव, तुकाराम साखरे, ज्ञानेश्वर नवले, परमेश्वर लालमे, गोविंद माटे, अंबादास आंबेगावकर, तुकाराम माटे, वैभव माटे यांनी या निवडीचे स्वागत केले.