शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

तेलाच्या मागणीत वाढ, पेरणी क्षेत्रात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:15 IST

नांदेड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र साडेसात लाख हेक्टर असून त्यापैकी ३ लाख ८१ हजार ३७३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला ...

नांदेड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र साडेसात लाख हेक्टर असून त्यापैकी ३ लाख ८१ हजार ३७३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या निम्म्याहून अधिक सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु, यंदा बोगस बियाणे आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनसह इतरही तेलपिके घेतली जातात. परंतु, ती अत्यल्प प्रमाणात आहे. यामध्ये खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात काही पिके घेतली जातात जसे भुईमुग,करडी. यंदाच्या खरिपात ४५५ हेक्टर तीळाचा पेरा झाला होता. त्याचबरोबर इतर गळीत धान्य ७४ हेक्टरवर होते.

रब्बीमध्ये भुईमुगाची पेरणी सुरू असून जवळपास १५ ते १८ हजार हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृृषी विभागाने व्यक्त केला आहे. तर करडीचा २ हजार ६३६ हेक्टरवर पेरा झाला आहे. त्याचबरोबर जवस ९ हेक्टर आणि इतर गळीत धान्य ९७ हेक्टवर पेरण्यात आले आहे.

चौकट.......

करडी, सूर्यफूल हद्दपार होण्याच्या मार्गावर

जिल्ह्यात सोयाबीनसह करडी, मोहरी, तीळ, भूईमुग, सूर्यफूल या पिकांचे उत्पादन घेतले जाते. मागील काही वर्षापासून सोयाबीनच्या पेऱ्यात विक्रमी वाढ हाेत आहे. यंदा सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ९ हजार असताना ३ लाख ८१ हजार ३८३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. त्यापाठोपाठ रब्बीमध्ये भुईमुगाचा जवळपास १८ हजार हेक्टरवर पेरा होईल. खरिपात भुईमुगाचे पीक कोणीही शेतकऱ्यांनी घेतले नाही. रब्बीमध्ये जवस, तीळ, करडी या पिकांचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये करडी जवळपास २६३६ हेक्टरवर पेरण्यात आली आहे.

कोट.....

जिल्ह्यात तेल पीक जास्त प्रमाणात घेतल्या जात नाही. परंतु, सोयाबीनचे उत्पादन सर्वाधिक घेतले जात असून त्यात लक्षणीय वाढ होत आहे. यंदा खरिपात ३ लाख ८० हजार हेक्टरवर साेयाबीनचा पेरा झाला आहे. त्यानंतर तेलपिकामध्ये भुईमुगाचा पेरा असतो तो पंधरा ते वीस हजारांच्या घरात असतो. काही करडी, जवस, सूर्यफूल हे नगण्य असून १०० ते २०० हेक्टरमध्ये असते.

-रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

नांदेड जिल्ह्यात केवळ सोयाबीनच्या माध्यमातून तेल उत्पादित करणाऱ्या कंपन्या आहेत. परंतु, इतर तेल पीक घेऊनही त्यास योग्य बाजारपेठ मिळणार नाही. त्या भितीने आम्ही इतर पिके घेत नाही. मागील अनेक वर्षापासून सोयाबीनचे पीक घेतो. यंदा सोयाबीनचे बियाणेच बोगस निघाल्याने अडचणींचा सामना करावा लागला. दुबार पेरणी करूनही अतिवृष्टीने काहीच हाती आले नाही.

- त्र्यंबक सूर्यवंशी, शेतकरी