शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
4
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
5
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
6
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
7
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
10
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
11
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
12
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
13
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
14
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
15
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
16
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
17
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
18
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
19
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
20
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!

तेलाच्या मागणीत वाढ, पेरणी क्षेत्रात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:15 IST

नांदेड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र साडेसात लाख हेक्टर असून त्यापैकी ३ लाख ८१ हजार ३७३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला ...

नांदेड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र साडेसात लाख हेक्टर असून त्यापैकी ३ लाख ८१ हजार ३७३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या निम्म्याहून अधिक सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु, यंदा बोगस बियाणे आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनसह इतरही तेलपिके घेतली जातात. परंतु, ती अत्यल्प प्रमाणात आहे. यामध्ये खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात काही पिके घेतली जातात जसे भुईमुग,करडी. यंदाच्या खरिपात ४५५ हेक्टर तीळाचा पेरा झाला होता. त्याचबरोबर इतर गळीत धान्य ७४ हेक्टरवर होते.

रब्बीमध्ये भुईमुगाची पेरणी सुरू असून जवळपास १५ ते १८ हजार हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृृषी विभागाने व्यक्त केला आहे. तर करडीचा २ हजार ६३६ हेक्टरवर पेरा झाला आहे. त्याचबरोबर जवस ९ हेक्टर आणि इतर गळीत धान्य ९७ हेक्टवर पेरण्यात आले आहे.

चौकट.......

करडी, सूर्यफूल हद्दपार होण्याच्या मार्गावर

जिल्ह्यात सोयाबीनसह करडी, मोहरी, तीळ, भूईमुग, सूर्यफूल या पिकांचे उत्पादन घेतले जाते. मागील काही वर्षापासून सोयाबीनच्या पेऱ्यात विक्रमी वाढ हाेत आहे. यंदा सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ९ हजार असताना ३ लाख ८१ हजार ३८३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. त्यापाठोपाठ रब्बीमध्ये भुईमुगाचा जवळपास १८ हजार हेक्टरवर पेरा होईल. खरिपात भुईमुगाचे पीक कोणीही शेतकऱ्यांनी घेतले नाही. रब्बीमध्ये जवस, तीळ, करडी या पिकांचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये करडी जवळपास २६३६ हेक्टरवर पेरण्यात आली आहे.

कोट.....

जिल्ह्यात तेल पीक जास्त प्रमाणात घेतल्या जात नाही. परंतु, सोयाबीनचे उत्पादन सर्वाधिक घेतले जात असून त्यात लक्षणीय वाढ होत आहे. यंदा खरिपात ३ लाख ८० हजार हेक्टरवर साेयाबीनचा पेरा झाला आहे. त्यानंतर तेलपिकामध्ये भुईमुगाचा पेरा असतो तो पंधरा ते वीस हजारांच्या घरात असतो. काही करडी, जवस, सूर्यफूल हे नगण्य असून १०० ते २०० हेक्टरमध्ये असते.

-रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

नांदेड जिल्ह्यात केवळ सोयाबीनच्या माध्यमातून तेल उत्पादित करणाऱ्या कंपन्या आहेत. परंतु, इतर तेल पीक घेऊनही त्यास योग्य बाजारपेठ मिळणार नाही. त्या भितीने आम्ही इतर पिके घेत नाही. मागील अनेक वर्षापासून सोयाबीनचे पीक घेतो. यंदा सोयाबीनचे बियाणेच बोगस निघाल्याने अडचणींचा सामना करावा लागला. दुबार पेरणी करूनही अतिवृष्टीने काहीच हाती आले नाही.

- त्र्यंबक सूर्यवंशी, शेतकरी