शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:32 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी १२ मार्चच्या मध्यरात्रीपासून २१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत जाहीर केलेल्या निर्बंधांबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी ...

जिल्हाधिकाऱ्यांनी १२ मार्चच्या मध्यरात्रीपासून २१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत जाहीर केलेल्या निर्बंधांबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी माझ्याकडे आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवस दररोज २०० रुग्ण सापडले आहेत. परिस्थिती भयभीत होण्यासारखी नाही; मात्र इशारा देणारी व काळजी घेण्याची गरज अधोरेखित करणारी आहे. जिल्हा प्रशासनाने लागू केलेले निर्बंध नागरिकांच्या सुरक्षेसाठीच आहेत. परिस्थिती चिघळली तर किती गंभीर वेळ येते, हे आपण यापूर्वी अनुभवले आहे. त्यामुळे पुन्हा तशी वेळ येऊ नये, हीच प्रत्येकाची इच्छा असून, त्यासाठी निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे.

जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांमुळे नागरिकांच्या दिनचर्येवर विशेष परिणाम होणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, दुकाने सुरळीतच राहणार आहेत. केवळ वेळेची मर्यादा घालून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली तर मग कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा देतानाच मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ हा मुख्यमंत्र्यांनी दिलेला संदेश ध्यानात ठेवून सर्वांनी आपली काळजी घ्यावी आणि सुरक्षित रहावे, असेही पालकमंत्री चव्हाण यांनी म्हटले आहे.