शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

रेतीघाट लिलावाअभावी घरकुल लाभार्थ्यांच्या आशा धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:32 IST

बिलोली तालुका हा गौणखनिज संपदेने नटलेला असून, तालुक्यात जवळपास ३० रेतीघाट आहेत. या रेतीघाटांचे जिल्हा प्रशासनाकडून लिलाव होत असल्याने ...

बिलोली तालुका हा गौणखनिज संपदेने नटलेला असून, तालुक्यात जवळपास ३० रेतीघाट आहेत. या रेतीघाटांचे जिल्हा प्रशासनाकडून लिलाव होत असल्याने विविध बांधकामांसाठी रेतीचा पुरवठा केला जातो. परंतु गतवर्षी कोरोनामुळे तर यंदा घाटांच्या लिलावाची रक्कमही दुप्पट असल्याने रेतीघाट घेण्याकरिता ठेकेदार धजावले नसल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून, रेतीघाट लिलाव लवकर होईल, या अपेक्षेत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम पूर्णतः ठप्प झाले. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तालुक्यातील एका शासकीस रेतीघाटातून घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याची मागणी घरकुल लाभार्थ्यांनी केली आहे.

सद्यस्थितीत उन्हाळ्याची चाहूल लागली असून, येत्या काही दिवसांत बांधकामासाठी पाण्याची समस्या निर्माण होणार, अशी परिस्थिती दिसून येत आहे. तर ज्या नागरिकांना राहण्यासाठी घरे नाहीत, अशा नागरिकांचे पावसाळ्यापूर्वी घरकुलाचे बांधकाम पूर्ण होणे आवश्यक आहे. यंदा पाऊस भरपूर झाल्याने बिलोली तालुक्यात अनेक नदीपात्रात रेतीघाटांत मुबलक प्रमाणात रेती उपलब्ध झाली आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडून रेतीघाट लिलाव रखडल्याने घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी रेती उपलब्ध होत नाही. त्यामुळे रेतीअभावी बांधकाम कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बाबींकडे नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे लक्ष देऊन रेती घाट लिलाव करून घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देतील का? की यंदाही घरकुल लाभार्थ्यांचे बांधकामाच्या आशा धूसर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोट-

बिलोली तालुक्यातील २१ रेतीघाटांची स्थानिक महसूल व जिल्हा पथकांद्वारे पाहणी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असून, रेतीघाट लिलावाची प्रक्रिया वरिष्ठ स्तरावर सुरू आहे.

- कैलासचंद्र वाघमारे,

प्रभारी उपविभागीय अधिकारी, बिलोली