शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

रेतीघाट लिलावाअभावी घरकुल लाभार्थ्यांच्या आशा धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:32 IST

बिलोली तालुका हा गौणखनिज संपदेने नटलेला असून, तालुक्यात जवळपास ३० रेतीघाट आहेत. या रेतीघाटांचे जिल्हा प्रशासनाकडून लिलाव होत असल्याने ...

बिलोली तालुका हा गौणखनिज संपदेने नटलेला असून, तालुक्यात जवळपास ३० रेतीघाट आहेत. या रेतीघाटांचे जिल्हा प्रशासनाकडून लिलाव होत असल्याने विविध बांधकामांसाठी रेतीचा पुरवठा केला जातो. परंतु गतवर्षी कोरोनामुळे तर यंदा घाटांच्या लिलावाची रक्कमही दुप्पट असल्याने रेतीघाट घेण्याकरिता ठेकेदार धजावले नसल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून, रेतीघाट लिलाव लवकर होईल, या अपेक्षेत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम पूर्णतः ठप्प झाले. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तालुक्यातील एका शासकीस रेतीघाटातून घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याची मागणी घरकुल लाभार्थ्यांनी केली आहे.

सद्यस्थितीत उन्हाळ्याची चाहूल लागली असून, येत्या काही दिवसांत बांधकामासाठी पाण्याची समस्या निर्माण होणार, अशी परिस्थिती दिसून येत आहे. तर ज्या नागरिकांना राहण्यासाठी घरे नाहीत, अशा नागरिकांचे पावसाळ्यापूर्वी घरकुलाचे बांधकाम पूर्ण होणे आवश्यक आहे. यंदा पाऊस भरपूर झाल्याने बिलोली तालुक्यात अनेक नदीपात्रात रेतीघाटांत मुबलक प्रमाणात रेती उपलब्ध झाली आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडून रेतीघाट लिलाव रखडल्याने घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी रेती उपलब्ध होत नाही. त्यामुळे रेतीअभावी बांधकाम कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बाबींकडे नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे लक्ष देऊन रेती घाट लिलाव करून घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देतील का? की यंदाही घरकुल लाभार्थ्यांचे बांधकामाच्या आशा धूसर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोट-

बिलोली तालुक्यातील २१ रेतीघाटांची स्थानिक महसूल व जिल्हा पथकांद्वारे पाहणी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असून, रेतीघाट लिलावाची प्रक्रिया वरिष्ठ स्तरावर सुरू आहे.

- कैलासचंद्र वाघमारे,

प्रभारी उपविभागीय अधिकारी, बिलोली