शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजारात जाताय मोबाईल सांभाळा; दररोज १० तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:13 IST

नांदेड : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यात आता कुठे बाजारपेठ निर्बंधासह उघडण्यात आली आहे. परंतु अनेकजण गुन्हेगारीकडे ...

नांदेड : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यात आता कुठे बाजारपेठ निर्बंधासह उघडण्यात आली आहे. परंतु अनेकजण गुन्हेगारीकडे वळले आहेत. त्यातही भुरट्या चोरट्यांचा अधिक समावेश आहे. नांदेड शहरात भरत असलेल्या बाजारात हे चोरटे अतिशय सफाईने मोबाईल लंपास करीत आहेत. दररोज साधारणत: दहाहून अधिक तक्रारी मोबाईल चोरीच्या येत आहेत.

परंतु पोलिसांकडून मात्र मोबाईल चोरीच्या प्रकरणात गहाळ झाल्याची नोंद करण्यात येते. त्यामुळे मोबाईल शोधाची जबाबदारी पोलिसांवर येत नाही अन् ठाण्यातील गुन्ह्यांचा आकडाही वाढत नाही. परंतु यामध्ये तक्रारदाराचा मोबाईल मात्र परत मिळत नाही.

मोबाईल फोन हरविला किंवा चोरीला गेल्यानंतर १४४२२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर डायल केल्यानंतर तुमची तक्रार नोंदविण्यात येईल. तसेच तुमच्या फोनचे नेटवर्क बंद होईल. आयएमईआय क्रमांकावरुन ऑपरेटर्स नेटवर्क ब्लॉक करु शकतील. जेणेकरुन त्या मोबाईलचा दुरुपयोग होणार नाही. नांदेडात यापूर्वी आयएमईआय क्रमांक बदलण्याचे मोठे रॅकेट सक्रिय झाले होते. या ठिकाणी हा क्रमांक बदलल्यानंतर चोरीतील सर्व मोबाईल रेल्वेने हैद्राबाद येथे पाठविण्यात येत होते. त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती करुन परत हे मोबाईल विक्रीसाठी बाजारात आणले जातात. अशी मोठी साखळीच मोबाईल चोरट्यांची असल्याचे दिसून येते.

मोबाईल बाजारातून किंवा प्रवासादरम्यान चोरीला गेल्यानंतर नागरिक ठाण्यात तक्रार देण्यासाठी जातात. या ठिकाणी मात्र ठाण्यासमोरील झेरॉक्स सेंटरवरुन एक अर्ज आणण्यास सांगण्यात येतो. या अर्जामध्ये मोबाईल हा अमूक-अमूक ठिकाणी गहाळ झाल्याचा छापी मजकूर असतो. तक्रारकर्त्याने इतर माहिती भरुन हा अर्ज पोलिसांना द्यायचा अन् पोलिसांनी त्यावर शिक्का मारुन एक प्रत तक्रारकर्त्याला द्यायची. एवढेच सोपस्कार मोबाईल चोरी प्रकरणात केले जातात. त्यामुळे एकवेळेस मोबाईल चोरीला गेल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे. नागरिकांनीही आता तशी अपेक्षा करणे सोडून दिले आहे. त्यामुळे पोलीसही मोबाईल चोरीचे गुन्हे गंभीरपणे घेत नाहीत.

मोबाईल चोरीत अल्पवयीन मुले

शहरात गुंडांच्या काही टोळ्या आहेत. या टोळीकडे अनेक अल्पवयीन मुले आहेत. या मुलांचा वापर ते चोरीसाठी करतात. बाजारात दोघे ते तिघे मिळून एखाद्या नागरिकाला घेरतात. लहान असल्यामुळे त्यांच्यावर सहसा कुणाचा संशय जात नाही. याचा फायदा घेऊन ते गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या खिशातील मोबाईल लंपास करतात अन् काम फत्ते झाल्यावर काही सेकंदात नजरेआड होतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.