शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

आठवडी बाजारात जाताय मोबाईल सांभाळा; दररोज १० तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:13 IST

नांदेड : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यात आता कुठे बाजारपेठ निर्बंधासह उघडण्यात आली आहे. परंतु अनेकजण गुन्हेगारीकडे ...

नांदेड : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यात आता कुठे बाजारपेठ निर्बंधासह उघडण्यात आली आहे. परंतु अनेकजण गुन्हेगारीकडे वळले आहेत. त्यातही भुरट्या चोरट्यांचा अधिक समावेश आहे. नांदेड शहरात भरत असलेल्या बाजारात हे चोरटे अतिशय सफाईने मोबाईल लंपास करीत आहेत. दररोज साधारणत: दहाहून अधिक तक्रारी मोबाईल चोरीच्या येत आहेत.

परंतु पोलिसांकडून मात्र मोबाईल चोरीच्या प्रकरणात गहाळ झाल्याची नोंद करण्यात येते. त्यामुळे मोबाईल शोधाची जबाबदारी पोलिसांवर येत नाही अन् ठाण्यातील गुन्ह्यांचा आकडाही वाढत नाही. परंतु यामध्ये तक्रारदाराचा मोबाईल मात्र परत मिळत नाही.

मोबाईल फोन हरविला किंवा चोरीला गेल्यानंतर १४४२२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर डायल केल्यानंतर तुमची तक्रार नोंदविण्यात येईल. तसेच तुमच्या फोनचे नेटवर्क बंद होईल. आयएमईआय क्रमांकावरुन ऑपरेटर्स नेटवर्क ब्लॉक करु शकतील. जेणेकरुन त्या मोबाईलचा दुरुपयोग होणार नाही. नांदेडात यापूर्वी आयएमईआय क्रमांक बदलण्याचे मोठे रॅकेट सक्रिय झाले होते. या ठिकाणी हा क्रमांक बदलल्यानंतर चोरीतील सर्व मोबाईल रेल्वेने हैद्राबाद येथे पाठविण्यात येत होते. त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती करुन परत हे मोबाईल विक्रीसाठी बाजारात आणले जातात. अशी मोठी साखळीच मोबाईल चोरट्यांची असल्याचे दिसून येते.

मोबाईल बाजारातून किंवा प्रवासादरम्यान चोरीला गेल्यानंतर नागरिक ठाण्यात तक्रार देण्यासाठी जातात. या ठिकाणी मात्र ठाण्यासमोरील झेरॉक्स सेंटरवरुन एक अर्ज आणण्यास सांगण्यात येतो. या अर्जामध्ये मोबाईल हा अमूक-अमूक ठिकाणी गहाळ झाल्याचा छापी मजकूर असतो. तक्रारकर्त्याने इतर माहिती भरुन हा अर्ज पोलिसांना द्यायचा अन् पोलिसांनी त्यावर शिक्का मारुन एक प्रत तक्रारकर्त्याला द्यायची. एवढेच सोपस्कार मोबाईल चोरी प्रकरणात केले जातात. त्यामुळे एकवेळेस मोबाईल चोरीला गेल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे. नागरिकांनीही आता तशी अपेक्षा करणे सोडून दिले आहे. त्यामुळे पोलीसही मोबाईल चोरीचे गुन्हे गंभीरपणे घेत नाहीत.

मोबाईल चोरीत अल्पवयीन मुले

शहरात गुंडांच्या काही टोळ्या आहेत. या टोळीकडे अनेक अल्पवयीन मुले आहेत. या मुलांचा वापर ते चोरीसाठी करतात. बाजारात दोघे ते तिघे मिळून एखाद्या नागरिकाला घेरतात. लहान असल्यामुळे त्यांच्यावर सहसा कुणाचा संशय जात नाही. याचा फायदा घेऊन ते गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या खिशातील मोबाईल लंपास करतात अन् काम फत्ते झाल्यावर काही सेकंदात नजरेआड होतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.