शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना कुठे धक्का तर कुठे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:20 IST

भोकर : तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात मतदारांनी अनेक प्रस्थापितांना बळ दिले तर काही प्रस्थापितांना धक्का देत नव्या ...

भोकर : तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात मतदारांनी अनेक प्रस्थापितांना बळ दिले तर काही प्रस्थापितांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. गावपुढाऱ्यांच्या चुरशीच्या निवडणुकीत राजकीय पक्षांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी काँग्रेस समर्थकांनी आपले वर्चस्व राखले आहे.

भोकर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या ३३३ सदस्य पदाकरिता झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी घोषित करण्यात आला. गावपुढाऱ्यांच्या निवडणुकीत राजकीय प्रस्थापितांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तरीही मतदारांनी त्यांना अनेक ठिकाणी डावलून नवीन राजकीय समीकरण तयार केले आहे. काँग्रेस तालुकाध्यक्ष जगदीश पाटील व माजी सभापती तथा जि.प. सदस्य प्रकाश भोसीकर यांचे भोसी आणि जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी रावणगाव या आपल्या ग्रामपंचायतीवर कायम वर्चस्व ठेवले. तालुक्यातील किनी येथे भाजपाचे जि. प. सदस्य दिवाकररेड्डी सुरकुंठवाड आणि काँग्रेस समर्थकांच्या दोन गटात चुरशीची लढत झाली. येथील मतदारांनी एकाही गटाला बहुमत दिले नसून सत्यमरेड्डी यांच्या गटाला ५ तर त्रिपतरेड्डी यांच्या गटाला २ आणि सुरकुंठवाड यांच्या पॅनलला ४ जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेसाठी याठिकाणी अभद्र युती होणार की निवडणुकीत एकमेकांविरुद्ध सामना केलेले भाऊ एकत्र येणार हे पुढील काळात समजेल. मतदानाच्या दिवशी दोन गटात हाणामारी झाल्याने गुन्हा दाखल झालेल्या चिदगिरी ग्रामपंचायतीत पं.स.चे माजी सभापती यांचे पती गुलाबराव नाईक यांना पराभवाचा सामना करावा लागला तरी त्यांचे पॅनल बहुमतात आले. जामदरी येथे बाजार समितीचे उपसभापती गणेश राठोड, रायखोड येथे पं.स.चे माजी सभापती सुरेश बिल्लेवाड यांच्या पॅनलला मतदारांनी नाकारला. तसेच दिवशी येथे सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष राजू पाटील दिवशीकर यांनाही बहुमत मिळविता आले नाही. हळदा येथे निवडणुकीतील तिन्ही पॅनलचे प्रत्येकी ३ उमेदवार निवडून आल्याने येथे परस्पर विरोधात लढलेले काका - पुतणे सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील का? याची उत्सुकता लागली. निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागलेल्या मतदारांनी सकाळपासूनच तहसील परिसरात मोठी गर्दी केली होती. विजयाच्या निकालाने आनंदित झालेल्यांनी घोषणाबाजी करीत गुलाल उधळला.

चौकटीसाठी

मतमोजणी दरम्यान समसमान मते मिळाल्याने दिवशी खु, (वार्ड क्र१), लामकाणी (वार्ड क्र. १ व २), आणि जाकापूर (वार्ड क्र. १) आदी ४ उमेदवारांचा विजय ईश्वर चिठ्ठीने घोषित करण्यात आला.

चौकटीसाठी

तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ५० पेक्षा अधिक ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या समर्थकांना मिळालेले यश हे माजी मुख्यमंत्री तथा सा.बां.मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारांनी दाखविलेला विश्वास आहे. :- जगदीश पाटील भोसीकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष भोकर.