शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

कलिंगड लागवडीला शेतकरी धजावेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:14 IST

टरबूज आणि कासराळी असे जणू समीकरणच बनलेल्या कासराळीत गेल्या पाच वर्षांत टरबूज लागवडीचा उच्चांक वर्षागणिक वाढला. पाच महिन्यांत २ ...

टरबूज आणि कासराळी असे जणू समीकरणच बनलेल्या कासराळीत गेल्या पाच वर्षांत टरबूज लागवडीचा उच्चांक वर्षागणिक वाढला. पाच महिन्यांत २ तोडे आणि हमखास दुहेरी लाभ अशी उत्पनाची हमी असलेल्या टरबुजाची लागवड कासराळीत पहिल्यांदा भागवत लोकमनवार यांनी करून इतर शेतकऱ्यांना लागवडीस

प्रवृत्त केले. तद्नंतर उत्पादनाने शेतकऱ्यांचा कल अधिकच वाढला. एकापेक्षा एक अशा सरस उत्पादन वृद्धीने शेतकऱ्यांना या पिकाची गोडी लागली.

पहिल्यांदा ९० दिवसांचे हे पाणीदार फळ दुसऱ्यांदा ७० ते ७५ दिवसांतच तोडणीला येत असे. उन्हाळा आणि रमजान डोळ्यासमोर ठेवून शेतकरी पिकाची लागवड व तोडणी करीत असत. ४ ते ७ किलो वजनाच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाने या फळाला प्रचंड मागणी वाढली. बसवंत कासराळीकर या शेतकऱ्याचे टरबूज दोन वर्षांपूर्वी नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू, जम्मूपर्यंत पोहोचले होते. प्रचंड उत्पादन आणि अपेक्षेहून अधिक झालेल्या लाभाने गतवर्षीही हजाराहून अधिक क्षेत्रात टरबूज लागवड झाली. मात्र, मार्च महिन्याअखेर टरबूज ऐन तोडणीवर असताना कोरोना संसर्गामुळे लाॅकडाऊन पडले. बाजारपेठाच बंद झाल्याने कासराळीतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. खर्च केलेली रक्कमही निघणे मुश्कील झाले होते. अनेकांनी तर टरबूज फळाच्या शेतीत जनावरे सोडली होती, तर काहींनी मोफत वाटले.