शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

मनाच्या दालनात प्रत्येकाला दिली एैसपैस जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:41 IST

मराठी गझलचे नाव निघाल्यानंतर सुरेश भटानंतर नाव निघते ते ईलाही जमादार यांचे. १९६४ पासून काव्यलेखन करणाऱ्या जमादार यांच्याकडे अक्षरश: शब्दसोन्याची खाण आहे. मराठी गझलेच्या तंत्र आणि शास्त्राचा विषय निघतो तेव्हाही त्यांचेच नाव पुढे येते. अशा प्रसिद्ध गझलकार ईलाही जमादार यांच्याशी साधलेला हा संवाद...

अत्यंत भावस्पर्शी कविता आणि गझल ही आपली ओळख आहे. या गझल लेखनाची सुरुवात कशी झाली?नोकरीमुळे कुटुंबापासून दूर राहत होतो. दिवस कामामध्ये निघून जायचा. मात्र कामावरुन घरी परतल्यानंतर एकटेपणा जाणवायचा. यातूनच वाचन-लिखाणाची आवड लागली. ज्या भावना मनामध्ये उमटतात, जे अनुभव आयुष्यामध्ये येतात तेच मी शब्दबद्ध करीत गेलो. एके दिवशी माझ्या एका मित्राने हे लिखाण पाहिले आणि कविता भावस्पर्शी असल्याचे सांगितले. तेव्हाच मला माझे लिखाण कविता आहे, हे समजले.आपणाला या लिखाणासाठी कोणाकडून मार्गदर्शन मिळाले?मनातील भाव-भावना कागदावर उमटवित मी गझललेखन करीत गेलो. एके दिवशी डॉ. नाडकर्णी यांचा उर्दू मुशायराचा कार्यक्रम होता. तेथे गेल्यानंतर मी माझ्या हातातील कविता त्यांना दाखवित कविता वाचनाची संधी मागितली. त्यांनी सदर कार्यक्रम मुशायºयाचा असल्याचे सांगून मला घरी येवून भेटण्यास सांगितले आणि गझल लेखनाबाबत मार्गदर्शन केले.आपले पुढील प्रकल्प काय आहेत?गझलची १५ तर उर्दूतील एका पुस्तकाचे लिखाण झाले आहे. नवोदित मराठी कवींसाठी गझल क्लिनिक ही कार्यशाळा मी घेत असतो. गझल लेखनाकडे तरुणाई वळावी, त्यांना नेमके मार्गदर्शन मिळावे यासाठी या कार्यशाळा अधिकाधिक व्हाव्यात, असा माझा प्रयत्न असतो. यापुढेही तो राहील. जो भेटेल त्याला मनापासून आपलासा करीत गेलो. यापुढेही अनेकांना तेथे जागा मिळेल.गझलमध्ये भावनेला महत्त्वगझलेच्या तंत्राचा आणि शास्त्राचा विषय निघतो तेव्हा मी गझलमध्ये सर्वाधिक महत्त्व भावनेला देतो. तुमच्या मनातील भावना किती तीव्र आहेत त्यावरच लिखाणाची खोली अवलंबून असते. मी कधीही ठरवून लिहिले नाही.निसर्ग देतो आणि त्याने सांगितल्याप्रमाणे मी कागदावर उतरवित जातो. यात माझे स्वत:चे काही आहे असे मला वाटत नाही. सुरुवातीच्या लिखाणानंतर अधिकाधिक प्रगल्भता येत गेली. शब्दावरही मेहनत घेतली. त्यामुळेच या शब्दांना नजाकत मिळाल्याच्या भावनाही ईलाही जमादार यांनी व्यक्त केल्या.

प्रत्येकाच्या आयुष्यात सुख असते तसेच त्याच्या आयुष्याला दु:खाचीही किनार असते. या सुख-दु:खाकडे तुम्ही कसे पाहता ते महत्त्वाचे आहे. माझ्या बाबतीत विचाराल तर माझे दु:खच मी लेखणद्वारे कागदावर उतरवितो. ही वेदना कविता बनते आणि याच कवितेची पुढे गझल होते. -इलाही जमादार

टॅग्स :Nandedनांदेडliteratureसाहित्य