शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

मनाच्या दालनात प्रत्येकाला दिली एैसपैस जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:41 IST

मराठी गझलचे नाव निघाल्यानंतर सुरेश भटानंतर नाव निघते ते ईलाही जमादार यांचे. १९६४ पासून काव्यलेखन करणाऱ्या जमादार यांच्याकडे अक्षरश: शब्दसोन्याची खाण आहे. मराठी गझलेच्या तंत्र आणि शास्त्राचा विषय निघतो तेव्हाही त्यांचेच नाव पुढे येते. अशा प्रसिद्ध गझलकार ईलाही जमादार यांच्याशी साधलेला हा संवाद...

अत्यंत भावस्पर्शी कविता आणि गझल ही आपली ओळख आहे. या गझल लेखनाची सुरुवात कशी झाली?नोकरीमुळे कुटुंबापासून दूर राहत होतो. दिवस कामामध्ये निघून जायचा. मात्र कामावरुन घरी परतल्यानंतर एकटेपणा जाणवायचा. यातूनच वाचन-लिखाणाची आवड लागली. ज्या भावना मनामध्ये उमटतात, जे अनुभव आयुष्यामध्ये येतात तेच मी शब्दबद्ध करीत गेलो. एके दिवशी माझ्या एका मित्राने हे लिखाण पाहिले आणि कविता भावस्पर्शी असल्याचे सांगितले. तेव्हाच मला माझे लिखाण कविता आहे, हे समजले.आपणाला या लिखाणासाठी कोणाकडून मार्गदर्शन मिळाले?मनातील भाव-भावना कागदावर उमटवित मी गझललेखन करीत गेलो. एके दिवशी डॉ. नाडकर्णी यांचा उर्दू मुशायराचा कार्यक्रम होता. तेथे गेल्यानंतर मी माझ्या हातातील कविता त्यांना दाखवित कविता वाचनाची संधी मागितली. त्यांनी सदर कार्यक्रम मुशायºयाचा असल्याचे सांगून मला घरी येवून भेटण्यास सांगितले आणि गझल लेखनाबाबत मार्गदर्शन केले.आपले पुढील प्रकल्प काय आहेत?गझलची १५ तर उर्दूतील एका पुस्तकाचे लिखाण झाले आहे. नवोदित मराठी कवींसाठी गझल क्लिनिक ही कार्यशाळा मी घेत असतो. गझल लेखनाकडे तरुणाई वळावी, त्यांना नेमके मार्गदर्शन मिळावे यासाठी या कार्यशाळा अधिकाधिक व्हाव्यात, असा माझा प्रयत्न असतो. यापुढेही तो राहील. जो भेटेल त्याला मनापासून आपलासा करीत गेलो. यापुढेही अनेकांना तेथे जागा मिळेल.गझलमध्ये भावनेला महत्त्वगझलेच्या तंत्राचा आणि शास्त्राचा विषय निघतो तेव्हा मी गझलमध्ये सर्वाधिक महत्त्व भावनेला देतो. तुमच्या मनातील भावना किती तीव्र आहेत त्यावरच लिखाणाची खोली अवलंबून असते. मी कधीही ठरवून लिहिले नाही.निसर्ग देतो आणि त्याने सांगितल्याप्रमाणे मी कागदावर उतरवित जातो. यात माझे स्वत:चे काही आहे असे मला वाटत नाही. सुरुवातीच्या लिखाणानंतर अधिकाधिक प्रगल्भता येत गेली. शब्दावरही मेहनत घेतली. त्यामुळेच या शब्दांना नजाकत मिळाल्याच्या भावनाही ईलाही जमादार यांनी व्यक्त केल्या.

प्रत्येकाच्या आयुष्यात सुख असते तसेच त्याच्या आयुष्याला दु:खाचीही किनार असते. या सुख-दु:खाकडे तुम्ही कसे पाहता ते महत्त्वाचे आहे. माझ्या बाबतीत विचाराल तर माझे दु:खच मी लेखणद्वारे कागदावर उतरवितो. ही वेदना कविता बनते आणि याच कवितेची पुढे गझल होते. -इलाही जमादार

टॅग्स :Nandedनांदेडliteratureसाहित्य