शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

चांगल्या कार्याची ऊर्जा सज्जनांच्या संगतीत मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST

मालेगाव: मानवी जीवनात सज्जनांच्या सहवासाचे महत्त्व खूप आहे. सज्जनांचा सहवास प्राप्त झाला की, मानवाच्या जीवनाचे सोने होऊन मनातील ...

मालेगाव: मानवी जीवनात सज्जनांच्या सहवासाचे महत्त्व खूप आहे. सज्जनांचा सहवास प्राप्त झाला की, मानवाच्या जीवनाचे सोने होऊन मनातील षडविकारही नाहीसे होतात. मानवाला सज्जनांची संगत सहवास मिळाला तर उत्तम कार्य करण्याची ऊर्जा प्राप्त होते असे प्रतिपादन शिवकीर्तनकार प्रा.धाराशिव शिराळे यांनी मालेगाव येथे अपरंपार स्वामी भक्त मंडळच्या वतीने अंखड शिवनाम सप्ताहात केले.

हे सप्ताहाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. पुढे बोलतांना शिराळे म्हणाले की, संस्कारांमुळे आपण घडतो आपल्यातील षडविकार नष्ट होतात व आपले कल्याण होते ते केवळ संतांच्या सहवासाने मानवी जीवनात संकटे आली तर त्या संकटांवर आपण धैर्याने मात करू शकतो, ते धैर्य सज्जन व्यक्ती आपणास त्यांच्या ज्ञानदानातून देत असतात. सज्जनांचा सहवास आपणास घडावयाचा असेल तर अंतकरणातून परमेश्वराची प्रार्थना करणे अपेक्षित आहे असे ते प्रवचनात म्हणाले. परमेश्वराची प्रार्थना करणे म्हणजे कर्मकांड नाही तर अंतकरणातून नामस्मरण करणे होय. नामस्मरणाने जीवनातील संकटे नष्ट पावतात तसेच सुंदर विचारांचे बीजारोपण आपल्या मनात होत असते इतरांविषयीचा क्रोध मावळतो व सर्वाभूती समभाव आपल्यामध्ये निर्माण होतो तेव्हा सज्जनांचा सहवास व परमेश्वराचे नामस्मरण आपण जर केले तर या दुःखरुपी जीवनातून आपण तरुन जाऊन सुख ज्ञान धन व उत्तम आरोग्य प्राप्त होते असे ते म्हणाले.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य स्वामी, गुरुवर्य१०८ ‌ करबसव शिवाचार्य स्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणेने मालेगाव ता. अर्धापूर येथे परमरहस्य पारायण सोहळा तसेच कीर्तन, प्रवचन, भजन आदी समारंभाचे आयोजन मागील २४ वर्षांपासून केले जात आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार गायक-वादक आपली सेवा देत आहेत. कोरोना काळातील सर्व नियम पाळून पारायण सोहळा संपन्न होत आहे. सकाळी रुद्राभिषेक, शिवपाठ, नंतर परमरहस्य पारायण, भजन रात्री शिवकीर्तन या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.