शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

राहेर ते लोहगाव फाटा राज्य महामार्गावर धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

रस्त्यानजीक गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात वाहनधारक व पादचारी यांचा प्रवास झाला कठीण राहेर : नायगाव तालुक्यातील राहेर ते बिलोली ...

रस्त्यानजीक गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात

वाहनधारक व पादचारी यांचा प्रवास झाला कठीण

राहेर : नायगाव तालुक्यातील राहेर ते बिलोली तालुक्यातील लोहगाव फाटा राज्य महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून, या कामामुळे रस्त्यावरील मातीचे, धुळीचे लोट हवेत पसरत असल्याने वाहनधारकांना व पादचारी यांना प्रवास करणे कठीण झाले असून, रस्त्यानजीक गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी या भागातील लोकांनी सकाळ, सायंकाळ रस्त्यावर पाणी शिंपडण्याची मागणी शासन व कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीकडे केली आहे.

उमरी ते लोहगाव फाटा या २५१ राज्य महामार्गावरील राहेर ते मुस्तापूर या महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून सदर काम कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी करत आहे. मोठ्या प्रमाणात मुरूम, गिट्टी, डांबरमिश्रित गिट्टीची वाहतूक सदरील कंपनीच्या हायवा, टिप्पर, ट्रक या जड वाहनाने रात्रंदिवस होत आहे. तद्वतच महामंडळाच्या बस, ऑटो, काळीपिवळी, दुचाकी, मालवाहू ट्रक आदी वाहनांचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने हवेत धुळीचे प्रचंड लोट पसरत आहेत. अतिशय संथगतीने काम चालू असल्याने वाहतूक खोळंबत आहे. मोठी वाहने साइड देण्याच्या नादात रस्ता सोडून जात असल्याने अपघात घडत आहेत. अलीकडे नुकतेच उसाने भरलेला एक ट्रक नालीत कोसळल्याने ट्रक मालकाचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. या महामार्गावरील दुगाव, कुंभारगाव, गागलेगाव, इकळीमोर, मुस्तापूर आदी गावांतील लोकांना व तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना या धुळीस सामोरे जावे लागत आहे. त्यातच या कंपनीच्या बेजबाबदार कामाने शेतकऱ्यांचे रबी मोसमातील पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. संबंधिताचे यांच्यावर नियंत्रण नसल्याची खंत या भागातील जनतेने व्यक्त केली आहे. शासनाने लक्ष घालून सदर कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी चेअरमन प्रकाश पाटील हिवराळे, शिवराज पोलीस पाटील, गणपती मालीपाटील, माधव हिवराळे, पाटील पहिलवान, सुरेश हिवराळे, व्यंकटराव जाधव, माधव नरवाडे, सखाराम गुरुजी नरवाडे, मधुकर हिवराळे, गोविंद शिंदे, गजानन दावरशेटीवार आदींसह या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. धुळीमुळे प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने रस्त्यावर सकाळ व सायंकाळ पाणी शिंपडण्याची मागणी होत आहे.