शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

राहेर ते लोहगाव फाटा राज्य महामार्गावर धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

रस्त्यानजीक गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात वाहनधारक व पादचारी यांचा प्रवास झाला कठीण राहेर : नायगाव तालुक्यातील राहेर ते बिलोली ...

रस्त्यानजीक गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात

वाहनधारक व पादचारी यांचा प्रवास झाला कठीण

राहेर : नायगाव तालुक्यातील राहेर ते बिलोली तालुक्यातील लोहगाव फाटा राज्य महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून, या कामामुळे रस्त्यावरील मातीचे, धुळीचे लोट हवेत पसरत असल्याने वाहनधारकांना व पादचारी यांना प्रवास करणे कठीण झाले असून, रस्त्यानजीक गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी या भागातील लोकांनी सकाळ, सायंकाळ रस्त्यावर पाणी शिंपडण्याची मागणी शासन व कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीकडे केली आहे.

उमरी ते लोहगाव फाटा या २५१ राज्य महामार्गावरील राहेर ते मुस्तापूर या महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून सदर काम कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी करत आहे. मोठ्या प्रमाणात मुरूम, गिट्टी, डांबरमिश्रित गिट्टीची वाहतूक सदरील कंपनीच्या हायवा, टिप्पर, ट्रक या जड वाहनाने रात्रंदिवस होत आहे. तद्वतच महामंडळाच्या बस, ऑटो, काळीपिवळी, दुचाकी, मालवाहू ट्रक आदी वाहनांचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने हवेत धुळीचे प्रचंड लोट पसरत आहेत. अतिशय संथगतीने काम चालू असल्याने वाहतूक खोळंबत आहे. मोठी वाहने साइड देण्याच्या नादात रस्ता सोडून जात असल्याने अपघात घडत आहेत. अलीकडे नुकतेच उसाने भरलेला एक ट्रक नालीत कोसळल्याने ट्रक मालकाचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. या महामार्गावरील दुगाव, कुंभारगाव, गागलेगाव, इकळीमोर, मुस्तापूर आदी गावांतील लोकांना व तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना या धुळीस सामोरे जावे लागत आहे. त्यातच या कंपनीच्या बेजबाबदार कामाने शेतकऱ्यांचे रबी मोसमातील पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. संबंधिताचे यांच्यावर नियंत्रण नसल्याची खंत या भागातील जनतेने व्यक्त केली आहे. शासनाने लक्ष घालून सदर कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी चेअरमन प्रकाश पाटील हिवराळे, शिवराज पोलीस पाटील, गणपती मालीपाटील, माधव हिवराळे, पाटील पहिलवान, सुरेश हिवराळे, व्यंकटराव जाधव, माधव नरवाडे, सखाराम गुरुजी नरवाडे, मधुकर हिवराळे, गोविंद शिंदे, गजानन दावरशेटीवार आदींसह या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. धुळीमुळे प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने रस्त्यावर सकाळ व सायंकाळ पाणी शिंपडण्याची मागणी होत आहे.