शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

राहेर ते लोहगाव फाटा राज्य महामार्गावर धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

रस्त्यानजीक गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात वाहनधारक व पादचारी यांचा प्रवास झाला कठीण राहेर : नायगाव तालुक्यातील राहेर ते बिलोली ...

रस्त्यानजीक गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात

वाहनधारक व पादचारी यांचा प्रवास झाला कठीण

राहेर : नायगाव तालुक्यातील राहेर ते बिलोली तालुक्यातील लोहगाव फाटा राज्य महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून, या कामामुळे रस्त्यावरील मातीचे, धुळीचे लोट हवेत पसरत असल्याने वाहनधारकांना व पादचारी यांना प्रवास करणे कठीण झाले असून, रस्त्यानजीक गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी या भागातील लोकांनी सकाळ, सायंकाळ रस्त्यावर पाणी शिंपडण्याची मागणी शासन व कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीकडे केली आहे.

उमरी ते लोहगाव फाटा या २५१ राज्य महामार्गावरील राहेर ते मुस्तापूर या महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून सदर काम कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी करत आहे. मोठ्या प्रमाणात मुरूम, गिट्टी, डांबरमिश्रित गिट्टीची वाहतूक सदरील कंपनीच्या हायवा, टिप्पर, ट्रक या जड वाहनाने रात्रंदिवस होत आहे. तद्वतच महामंडळाच्या बस, ऑटो, काळीपिवळी, दुचाकी, मालवाहू ट्रक आदी वाहनांचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने हवेत धुळीचे प्रचंड लोट पसरत आहेत. अतिशय संथगतीने काम चालू असल्याने वाहतूक खोळंबत आहे. मोठी वाहने साइड देण्याच्या नादात रस्ता सोडून जात असल्याने अपघात घडत आहेत. अलीकडे नुकतेच उसाने भरलेला एक ट्रक नालीत कोसळल्याने ट्रक मालकाचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. या महामार्गावरील दुगाव, कुंभारगाव, गागलेगाव, इकळीमोर, मुस्तापूर आदी गावांतील लोकांना व तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना या धुळीस सामोरे जावे लागत आहे. त्यातच या कंपनीच्या बेजबाबदार कामाने शेतकऱ्यांचे रबी मोसमातील पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. संबंधिताचे यांच्यावर नियंत्रण नसल्याची खंत या भागातील जनतेने व्यक्त केली आहे. शासनाने लक्ष घालून सदर कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी चेअरमन प्रकाश पाटील हिवराळे, शिवराज पोलीस पाटील, गणपती मालीपाटील, माधव हिवराळे, पाटील पहिलवान, सुरेश हिवराळे, व्यंकटराव जाधव, माधव नरवाडे, सखाराम गुरुजी नरवाडे, मधुकर हिवराळे, गोविंद शिंदे, गजानन दावरशेटीवार आदींसह या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. धुळीमुळे प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने रस्त्यावर सकाळ व सायंकाळ पाणी शिंपडण्याची मागणी होत आहे.