शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

चोहोबाजूने बळीराजाच्या पदरी निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST

नांदेड जिल्ह्यात खरीप ७ लाख ४२ हजार आणि रब्बीचे १.७६ लाख असे मिळून जवळपास सव्वा नऊ लाख हेक्टर क्षेत्र ...

नांदेड जिल्ह्यात खरीप ७ लाख ४२ हजार आणि रब्बीचे १.७६ लाख असे मिळून जवळपास सव्वा नऊ लाख हेक्टर क्षेत्र आहे. यंदाच्या वर्षात पर्जन्यमान चांगले झाल्याने जवळपास सर्वच लघु, मध्यम व मोठे प्रकल्प तुडुंब भरले होते. परिणामी रब्बीला आवश्यक तेवढ्या पाणी पाळ्या मिळणार या उद्देशाने शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी केली. परंतु खरिपामधील पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. यामध्ये कपाशीसह सोयाबीन, उडीद आणि इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जवळपास सातशे गावांना बसला. त्यापैकी ६८५ गावे बाधित होऊन एक लाख ५९ हजार २८९ हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन काढणीला आलेल्या काळात अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटले. त्यामुळे सोयाबीन शेताबाहेर काढणेही कठीण झाले तसेच कपाशीला देखील फटका बसला. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक काढून हरभरा, उन्हाळी ज्वारी आणि गहू घेण्याचा विचार करून त्या पद्धतीचे नियोजनही केले. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे यांना रब्बीतील पिकांनाही फटका बसत आहे. तुरीच्या उत्पादनात विक्रमी घट झाली असून बहुतांश शेतकऱ्यांच्या तुरी उधळल्याने कापून जनावरांना चारा म्हणून टाकली.

बोगस बियाणे प्रकरण थंड बस्त्यात

नांदेड जिल्ह्यापासून सुरु झालेल्या बोगस बियाण्यांच्या तक्रारी सबंध मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात दाखल झाल्या. परंतु प्रशासनाकडून अद्यापही बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांवर, व्यापाऱ्यांवर कारवाई केलेली नाही. नांदेड जिल्ह्यात जवळपास २३ हजार ५७९ शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्यापपर्यंत केवळ चारशे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळालेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार आणि प्रशासन करीत आहे. बोगस बियाणे प्रकरणात दाखल असलेल्या १७७ गुन्ह्यांमध्ये पुढे काहीही झाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सदर प्रकरणी आयुक्तालय स्तरावर सुनावणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

पेरणी काळात खताचा तुटवडा

वर्षभराच्या कालावधीत शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा सामना करावा लागला. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली, या पेरणी काळात खताचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि पुन्हा ऐन पीक काढणी काळात अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यातही अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ आणि दिरंगाई झाल्याने अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागले.

लॉकडाऊन काळात मोठे नुकसान

लॉकडाऊन काळामध्ये पोलिसांच्या भीतीने शेतकऱ्यांना आपला माल शहरांमध्ये नेता आला नाही आणि आता अतिवृष्टीमुळे शेतात पिकलेला माल शेतातच सडत आहे. त्यामुळे हे वर्ष शेतकऱ्यांसाठी निराशा देणारे ठरले आहे. भाजीपाला लागवडीसाठी केलेला खर्चही निघाला नाही. शेतकऱ्यांनी टरबूज, खरबूज जनावरांना टाकले तर कापूस, तूर अशा उभ्या पिकात जनावरे सोडली. त्यात सध्या केळीला भाव नसल्याने शेतकरी केळीच्या बागा कापून काढत आहेत.