शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

काँग्रेसची दमदार कामगिरी तरीही,कासराळी ग्रामपंचायत ठक्करवाडांनी राखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:20 IST

बिलोली तालुक्यातील कासराळी हे येथील माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचे जन्मगाव असल्याने, गेल्या २५ वर्षापासून सातत्याने ही ग्रामपंचायत त्यांच्या ...

बिलोली तालुक्यातील कासराळी हे येथील माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचे जन्मगाव असल्याने, गेल्या २५ वर्षापासून सातत्याने ही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात राहिली आहे. पुढे याची सर्व सूत्रे त्यांचे चिरंजीव जि.प. सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांनी हाती घेतली. यंदाच्या निवडणुकीत नेहमी ठक्करवाड यांच्या विरोधात असणारे यावेळी अडगळीला पडल्याने ठक्करवाडांसमोर यंदा काँग्रेस अल्पसंख्यकचे जिल्हा उपाध्यक्ष माजीद शेख यांनी स्वतंत्र पॅनल उभे करून आव्हान दिले होते. दोघांनीही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. दोघांनीही केवळ मतदारांच्या दारी भेटी दिल्या. सभा, काॕॅर्नर बैठकासुद्धा येथे झाल्या नाहीत. ठक्करवाड विरोधकांना गुप्तपणे मिळणारा प्रतिसाद पाहून प्रचंड आत्मविश्वास वाढला होता. त्या आधारावर विजयाचे दावे केले जात होते. मात्र प्रत्यक्ष निवडणूक निकाल हा वेगळाच लागला. वाॅर्ड क्र. १,२,३ मध्ये माजीद शेख गटाचे तर, ३,४ ठक्करवाड गटास मिळाले आहेत. सत्तेत बसण्यासाठी संख्याबळ अवघ्या एका सदस्याअभावी कमी पडले. अपेक्षित यश मात्र मिळाले नाही.

सोमवारी बिलोली तहसील प्रांगणात लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात काँग्रेसच्या माजीद शेख यांच्या गटाचे स्वत: माजीद शेख, शिवशंकर पिराजी कासराळीकर, पूजा शिवाजी शिंदे, मारुती गंगाधर भुरे, जयश्री शेषराव गजलोड हे विजयी झाले तर, ठक्करवाड गटाचे द्वारका ओमप्रकाश गंगुलवार, बासिद कुरेशी, साईप्रसाद गंगुलवार, सविता टोम्पे, कल्पना दंतापल्ले, शिवलीला बसवंत कासराळीकर, शेषराव लंके विजयी झाले. ठक्करवाडांची एकहाती असलेल्या येथील ग्रामपंचायतीत काँग्रेसच्या सदस्यांचा इतक्या मोठ्या संख्येने २५ वर्षात पहिल्यांदाच झालेला प्रवेश येथील सत्ताधाऱ्यांवर आता अंकुश ठेवणारा असेल.