शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

केंद्राला साकडे, पीकविमापोटी ८०० कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST

नांदेड जिल्ह्यातील नऊ लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता. २०२० खरीपमध्ये व बहुतेक शेतकर्‍यांनी सोयाबीन, ज्वारी, ...

नांदेड जिल्ह्यातील नऊ लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता. २०२० खरीपमध्ये व बहुतेक शेतकर्‍यांनी सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर या पिकांना संरक्षण घेतले होते. परंतु खरीप २०२० मध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत व काढणीपश्चात पाऊस पडल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे, त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सामुदायिक पंचनामे करण्याची मागणी शेतकर्‍यांच्या वतीने केली गेली होती. तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व विमा कंपनीकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग व तांत्रिक कर्मचारी यामुळे ही रास्त मागणी शेतकर्‍यांनी केली होती, परंतु जिल्हा प्रशासनाने ती नाकारली व वैयक्तिक पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यामुळे एक प्रकारे विमा कंपनीचे अपुरे कर्मचारी ही बाब शेतकर्‍यांच्या आर्थिक शोषणाला करणीभूत ठरली. तसेच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केला गेला नाही, त्यामुळे शेतकर्‍यांचे शोषण झाले आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये काढणीपश्चात पडलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांना २५ टक्के नुकसानभरपाई देणे बंधनकारक आहे. परंतु ती नाकारली गेली आहे व अशाप्रकारे दुसर्‍यांदा आर्थिक शोषण झाले आहे. पीकविम्यात शेतकरी नऊ लाखांवर सहभागी झाले आहेत व खासगी विमा कंपनीला केंद्र सरकार राज्य सरकार व लाभार्थी शेतकरी यांनी मिळून ६२५ कोटींच्या वर नांदेड जिल्ह्यातला हप्ता भरला आहे. तर नुकसानभरपाई फक्त १३४ कोटी मिळालेली आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ८०० कोटी रुपयांची न्याय नुकसानभरपाई मिळायला हवी होती, परंतु ती न देऊन शेतकर्‍यांचे आर्थिक शोषण केले गेले आहे.