शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राला साकडे, पीकविमापोटी ८०० कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST

नांदेड जिल्ह्यातील नऊ लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता. २०२० खरीपमध्ये व बहुतेक शेतकर्‍यांनी सोयाबीन, ज्वारी, ...

नांदेड जिल्ह्यातील नऊ लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता. २०२० खरीपमध्ये व बहुतेक शेतकर्‍यांनी सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर या पिकांना संरक्षण घेतले होते. परंतु खरीप २०२० मध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत व काढणीपश्चात पाऊस पडल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे, त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सामुदायिक पंचनामे करण्याची मागणी शेतकर्‍यांच्या वतीने केली गेली होती. तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व विमा कंपनीकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग व तांत्रिक कर्मचारी यामुळे ही रास्त मागणी शेतकर्‍यांनी केली होती, परंतु जिल्हा प्रशासनाने ती नाकारली व वैयक्तिक पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यामुळे एक प्रकारे विमा कंपनीचे अपुरे कर्मचारी ही बाब शेतकर्‍यांच्या आर्थिक शोषणाला करणीभूत ठरली. तसेच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केला गेला नाही, त्यामुळे शेतकर्‍यांचे शोषण झाले आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये काढणीपश्चात पडलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांना २५ टक्के नुकसानभरपाई देणे बंधनकारक आहे. परंतु ती नाकारली गेली आहे व अशाप्रकारे दुसर्‍यांदा आर्थिक शोषण झाले आहे. पीकविम्यात शेतकरी नऊ लाखांवर सहभागी झाले आहेत व खासगी विमा कंपनीला केंद्र सरकार राज्य सरकार व लाभार्थी शेतकरी यांनी मिळून ६२५ कोटींच्या वर नांदेड जिल्ह्यातला हप्ता भरला आहे. तर नुकसानभरपाई फक्त १३४ कोटी मिळालेली आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ८०० कोटी रुपयांची न्याय नुकसानभरपाई मिळायला हवी होती, परंतु ती न देऊन शेतकर्‍यांचे आर्थिक शोषण केले गेले आहे.