शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायम करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST

राज्यातील आरोग्य विभागात आजघडीला ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही संवर्गाची भरती ...

राज्यातील आरोग्य विभागात आजघडीला ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही संवर्गाची भरती करण्यात आली नाही. त्यामुळे कोरोनासारख्या जागतिक महामारीत आरोग्य विभागाची सर्व यंत्रणा ढासळली. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर रुग्णालय आणि कोविड सेंटरची संख्या वाढवावी लागली. मात्र, त्या तुलनेत आरोग्य कर्मचारी कमी असल्यामुळे कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सेवक यासह इतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यात २० कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले होते. त्यासाठी सातशेहून अधिक जणांची नियुक्ती करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात बाहेर निघायलाही कुणी धजावत नसताना या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या आणि कुटुंबाच्या जिवाची काळजी न करता रुग्णांना जेवण देणे, औषध देणे, आंघोळ घालणे, त्यांचे बेडशीट धुणे यासह इतर कामे केली आहेत. यातील अनेकांना कोरोना झाला होता. कोरोनाची रुग्णसंख्या सप्टेंबरनंतर कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना कमी करण्यास सुरुवात करण्यात आली होती. आजघडीला मोजकेच कर्मचारी कर्तव्यावर आहेत.

समविचारी मंचचे राज्यभर आंदोलन

आरोग्य विभागातील जवळपास साडेआठ हजार रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. कोरोना काळात जोखीम पत्करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना या भरतीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र समविचारी मंचने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येत आहे.