शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायम करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST

राज्यातील आरोग्य विभागात आजघडीला ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही संवर्गाची भरती ...

राज्यातील आरोग्य विभागात आजघडीला ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही संवर्गाची भरती करण्यात आली नाही. त्यामुळे कोरोनासारख्या जागतिक महामारीत आरोग्य विभागाची सर्व यंत्रणा ढासळली. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर रुग्णालय आणि कोविड सेंटरची संख्या वाढवावी लागली. मात्र, त्या तुलनेत आरोग्य कर्मचारी कमी असल्यामुळे कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सेवक यासह इतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यात २० कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले होते. त्यासाठी सातशेहून अधिक जणांची नियुक्ती करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात बाहेर निघायलाही कुणी धजावत नसताना या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या आणि कुटुंबाच्या जिवाची काळजी न करता रुग्णांना जेवण देणे, औषध देणे, आंघोळ घालणे, त्यांचे बेडशीट धुणे यासह इतर कामे केली आहेत. यातील अनेकांना कोरोना झाला होता. कोरोनाची रुग्णसंख्या सप्टेंबरनंतर कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना कमी करण्यास सुरुवात करण्यात आली होती. आजघडीला मोजकेच कर्मचारी कर्तव्यावर आहेत.

समविचारी मंचचे राज्यभर आंदोलन

आरोग्य विभागातील जवळपास साडेआठ हजार रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. कोरोना काळात जोखीम पत्करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना या भरतीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र समविचारी मंचने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येत आहे.