शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST

लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून रेल्वेगाड्या तसेच बससेवा बंद आहे. रेल्वेत कुरकुरे, गोळ्या, बिस्किटे, खेळणी विकून पोट भरणाऱ्या अंध व्यक्तींना आता ...

लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून रेल्वेगाड्या तसेच बससेवा बंद आहे. रेल्वेत कुरकुरे, गोळ्या, बिस्किटे, खेळणी विकून पोट भरणाऱ्या अंध व्यक्तींना आता दुसरा कोणताही मार्ग उरला नाही. कोणी मदत करण्यासही आता पुढे येत नाहीत. अशावेळी शासनाची मदतही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अंध व्यक्तींना जगण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

आधारही एकमेकांचाच

चौकट-१. लॉकडाऊन काळात बाहेर पडता येत नाही. घर चालविणे अवघड झाले आहे. सुरुवातीला काहीजणांनी मदत केली होती. मात्र, आता कोणी मदतही करण्यास तयार नाही. जेवढे जमविले होते, त्यावरच आतापर्यंत घर चालविले आहे. यापुढे जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. - सोनुले हदगावकर, जयभीमनगर, नांदेड.

२. वर्षभरापासून दिव्यांगांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मी पदवीधर असतानाही शासन मला कंत्राटीस्तरावर नोकरी देण्यास टाळाटाळ करत आहे. दोन वेळेस उपोषण केले. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आता तर कोरोनामुळे बाहेर पडता येत नाही. कुटुंबाला कसे जगवायचे हा प्रश्न आहे. - गणेश वर्षेवार, भोकर.

३. लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद आहेत. त्यामुळे आमच्यासारख्यांचे जगणे अवघड झाले आहे. कोरोनाचे संकट आणखी किती दिवस राहणार हेसुद्धा माहीत नाही. त्यामुळे कसे जागावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. - बाबाराव हंबर्डे, नांदेड.

चौकट- कोरोना काळात शासनाने दिव्यांगांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे आवश्यक होते. मात्र, दिव्यांगांसाठी योग्य नियोजन केले नाही. निराधारांचा पगार एक महिना अगोदर देऊन त्यालाच १ हजारांची मदत घोषित केली. शासनाने याव्यतिरिक्त अर्थसाहाय करणे आवश्यक आहे. - राहुल साळवे, अध्यक्ष, बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती, नांदेड.