शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST

लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून रेल्वेगाड्या तसेच बससेवा बंद आहे. रेल्वेत कुरकुरे, गोळ्या, बिस्किटे, खेळणी विकून पोट भरणाऱ्या अंध व्यक्तींना आता ...

लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून रेल्वेगाड्या तसेच बससेवा बंद आहे. रेल्वेत कुरकुरे, गोळ्या, बिस्किटे, खेळणी विकून पोट भरणाऱ्या अंध व्यक्तींना आता दुसरा कोणताही मार्ग उरला नाही. कोणी मदत करण्यासही आता पुढे येत नाहीत. अशावेळी शासनाची मदतही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अंध व्यक्तींना जगण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

आधारही एकमेकांचाच

चौकट-१. लॉकडाऊन काळात बाहेर पडता येत नाही. घर चालविणे अवघड झाले आहे. सुरुवातीला काहीजणांनी मदत केली होती. मात्र, आता कोणी मदतही करण्यास तयार नाही. जेवढे जमविले होते, त्यावरच आतापर्यंत घर चालविले आहे. यापुढे जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. - सोनुले हदगावकर, जयभीमनगर, नांदेड.

२. वर्षभरापासून दिव्यांगांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मी पदवीधर असतानाही शासन मला कंत्राटीस्तरावर नोकरी देण्यास टाळाटाळ करत आहे. दोन वेळेस उपोषण केले. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आता तर कोरोनामुळे बाहेर पडता येत नाही. कुटुंबाला कसे जगवायचे हा प्रश्न आहे. - गणेश वर्षेवार, भोकर.

३. लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद आहेत. त्यामुळे आमच्यासारख्यांचे जगणे अवघड झाले आहे. कोरोनाचे संकट आणखी किती दिवस राहणार हेसुद्धा माहीत नाही. त्यामुळे कसे जागावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. - बाबाराव हंबर्डे, नांदेड.

चौकट- कोरोना काळात शासनाने दिव्यांगांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे आवश्यक होते. मात्र, दिव्यांगांसाठी योग्य नियोजन केले नाही. निराधारांचा पगार एक महिना अगोदर देऊन त्यालाच १ हजारांची मदत घोषित केली. शासनाने याव्यतिरिक्त अर्थसाहाय करणे आवश्यक आहे. - राहुल साळवे, अध्यक्ष, बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती, नांदेड.