शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

२०२० मध्ये शेतकऱ्यांसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

पार्डी : अर्धापूर तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत समजली जाते. मात्र निसर्गाने साथ सोडली आणि कोरोनाने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आणि बोगस ...

पार्डी : अर्धापूर तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत समजली जाते. मात्र निसर्गाने साथ सोडली आणि कोरोनाने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आणि बोगस बियाणे शिरकाव केला. यामुळे कृषी अर्थव्यवस्था पार कोलमडली त्यात भरीस भर गुलाबी बोंडअळीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच बिघडले यामध्ये शेतकऱ्याचे हिरवे स्वप्न उध्वस्त झाले.

अर्धापूर तालुक्यात निसर्गप्रकोप आणि मानवनिर्मित संकटामुळे सरत्या वर्षात निसर्ग प्रकोपासह बोगस बियांनामुळे शेतकऱ्याची वाट लागली या परिस्थितीतून सावरण्यासाठी रब्बी हंगामातील पिकांवर अवलंबून आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे याही पिकांवर परिणाम झालेला दिसत आहे. सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. काही ठिकाणी सोयाबीन काढणीचे कामही पडले नाही. सोयाबीन पेरणीसाठी केलेला खर्चही निघाला नाही. सोयाबीन पेरले पोत्याने आणि घरी आणले मुठीत अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मानवनिर्मित संकटाने हाहाकार अर्धापुर तालुक्याची अर्थव्यवस्था मोडून काढली आहे. अर्धापूर शहरातून दररोज कोटीच्या जवळपास आर्थिक व्यवहार होत असतो. मात्र कोरोनामुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाली होती. तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था केळीच्या पिकावर अवलंबून आहे. येथील केळी देशासह परदेशात निर्यात केली जाते. केळीमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध आहे. लाखो मजुरदार केळीच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. मजुरदाराचे उपजीविकेचे साधन केळीच पीक आहे आणि अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्याचे प्रमुख पीक केळी आहे. मात्र केळी काढणीच्या वेळीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी राज्याने आणि देशात लॉकडाऊन करावे लागले यामुळे संपूर्ण दळणवळण व्यवस्था ठप्प झाली. केळीची निर्यात थांबल्याने केळीला कवडीमोल दर मिळाला अनेक शेतकऱ्याची केळी बनात राहिली केळीची नासाडी झाली होती.

अनेक शहरे लॉकडाऊन झाल्याने केळीला कवडीमोल दर मिळाला होता. लाखो रुपये खर्च करून केळी उत्पादक शेतकऱ्याच्या पदरात काही पडले नाही. केळीसाठी लाखो रुपये खर्च केला. मात्र तोही निघाला नाही यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस बरोबर तुरीच्या उत्पादनही घटले आहे. यातून उभारण्यासाठी रब्बी हंगामाची तयारी केली मात्र सततचे ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवरही परिणाम झाला आहे. रब्बीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. एकंदरीत २०२० वर्ष शेतकऱ्यांसाठी लाभदायक राहिला नाही.