शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

२०२० मध्ये शेतकऱ्यांसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST

पार्डी : अर्धापूर तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत समजली जाते. मात्र निसर्गाने साथ सोडली आणि कोरोनाने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आणि बोगस ...

पार्डी : अर्धापूर तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत समजली जाते. मात्र निसर्गाने साथ सोडली आणि कोरोनाने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आणि बोगस बियाणे शिरकाव केला. यामुळे कृषी अर्थव्यवस्था पार कोलमडली त्यात भरीस भर गुलाबी बोंडअळीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच बिघडले यामध्ये शेतकऱ्याचे हिरवे स्वप्न उध्वस्त झाले.

अर्धापूर तालुक्यात निसर्गप्रकोप आणि मानवनिर्मित संकटामुळे सरत्या वर्षात निसर्ग प्रकोपासह बोगस बियांनामुळे शेतकऱ्याची वाट लागली या परिस्थितीतून सावरण्यासाठी रब्बी हंगामातील पिकांवर अवलंबून आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे याही पिकांवर परिणाम झालेला दिसत आहे. सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. काही ठिकाणी सोयाबीन काढणीचे कामही पडले नाही. सोयाबीन पेरणीसाठी केलेला खर्चही निघाला नाही. सोयाबीन पेरले पोत्याने आणि घरी आणले मुठीत अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मानवनिर्मित संकटाने हाहाकार अर्धापुर तालुक्याची अर्थव्यवस्था मोडून काढली आहे. अर्धापूर शहरातून दररोज कोटीच्या जवळपास आर्थिक व्यवहार होत असतो. मात्र कोरोनामुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाली होती. तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था केळीच्या पिकावर अवलंबून आहे. येथील केळी देशासह परदेशात निर्यात केली जाते. केळीमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध आहे. लाखो मजुरदार केळीच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. मजुरदाराचे उपजीविकेचे साधन केळीच पीक आहे आणि अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्याचे प्रमुख पीक केळी आहे. मात्र केळी काढणीच्या वेळीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी राज्याने आणि देशात लॉकडाऊन करावे लागले यामुळे संपूर्ण दळणवळण व्यवस्था ठप्प झाली. केळीची निर्यात थांबल्याने केळीला कवडीमोल दर मिळाला अनेक शेतकऱ्याची केळी बनात राहिली केळीची नासाडी झाली होती.

अनेक शहरे लॉकडाऊन झाल्याने केळीला कवडीमोल दर मिळाला होता. लाखो रुपये खर्च करून केळी उत्पादक शेतकऱ्याच्या पदरात काही पडले नाही. केळीसाठी लाखो रुपये खर्च केला. मात्र तोही निघाला नाही यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस बरोबर तुरीच्या उत्पादनही घटले आहे. यातून उभारण्यासाठी रब्बी हंगामाची तयारी केली मात्र सततचे ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवरही परिणाम झाला आहे. रब्बीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. एकंदरीत २०२० वर्ष शेतकऱ्यांसाठी लाभदायक राहिला नाही.