शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

गाव विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा - वर्षा ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST

नांदेड- गावस्‍तरावर विविध अभियान व उपक्रम राबविले जातात. परंतु गावांचा खऱ्या अर्थाने विकास करण्‍यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करणे ...

नांदेड- गावस्‍तरावर विविध अभियान व उपक्रम राबविले जातात. परंतु गावांचा खऱ्या अर्थाने विकास करण्‍यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करणे आवश्‍यक असल्‍याचे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

जिल्‍हा परिषद व यशदा पुणे यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ‘माझा गाव सुंदर गाव’ व ‘आमचा गाव आमचा विकास’ उपक्रमातंर्गत ३ फेब्रुवारी रोजी नांदेड येथील हॉटेल अतिथी येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, सहाय्यक गट विकास अधिकारी अशोक पावडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी दीप प्रज्‍ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली. त्‍यानंतर उपस्थित मान्‍यवरांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी केले.

वर्षा ठाकूर म्‍हणाल्‍या, राष्‍ट्रीय ग्राम स्‍वराज्‍य अभियान उपक्रमातंर्गत सन २०२१-२२ वर्षाचा ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करावयाचा आहे. आराखडा तयार करतांना गावातील शेतकरी, महिला, युवक-युवती, किशोरवयीन मुली, महिला बचतगट, शालेय विद्यार्थी, स्‍वयंसेवी संस्‍था, लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्‍थ, स्‍वयंसेवक आदी घटकांशी विविध स्‍तरावर विचारविनिमय करुन सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. तसेच गावची सांस्‍कृतिक परंपरा, भौगोलिक परिस्थितीचा देखील आराखडा तयार करतांना विचार केला पाहिजे. ग्राम विकासासाठी विस्‍तार अधिकारी हे पद महत्‍वाचे असून त्‍यांनी हिवरेबाजार, पाटोदा व राळेगणसिध्‍दी सारखे गावे निर्माण करण्‍यासाठी पुढाकार घेऊन गावस्‍तरावर नावीन्‍यपूर्ण उपक्रम राबवून नांदेड जिल्‍ह्याचा नावलौकिक करावा असेही वर्षा ठाकूर म्‍हणाल्‍या.

प्रशिक्षण कार्यशाळेत जीपीडीपी प्रक्रिया, ग्रामपंचायतीची संसाधने, परिस्थितीचे विश्‍लेषण लोकसहभागावर आधारित नियोजन प्रक्रिया, मानव शाश्‍वत विकास मूल्‍यावर आधारित जीपीडीपी आराखडा व कलम ४५ सूचीचा वापर, प्रकल्‍प अहवाल व तांत्रिक मान्‍यता, विस्‍तार अधिकाऱ्यांची जबाबदारी, आदर्श गाव संकल्‍पना राबविणे आदी विषयावर प्रशिक्षक अमरसिंह आईलवार, कैलास यसगे, बालाजी गवलवाड, कान्‍हा शिरसाठ यांनी प्रशिक्षण दिले.

या कार्यक्रमाला जिल्‍ह्यातील ग्रामपंचायत विभाग, शिक्षण, कृषी, महिला बालकल्‍याण, सांख्‍यिकी व आरोग्‍य विभागाचे विस्‍तार अधिकारी यांची उपस्थिती होती.