शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सोयाबीन बियाणांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST

नांदेड : गतवर्षी सोयाबीन बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यानंतर जिल्ह्यात जवळपास १८ कंपन्यांवर ...

नांदेड : गतवर्षी सोयाबीन बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यानंतर जिल्ह्यात जवळपास १८ कंपन्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले हाेते. त्यामुळे यंदा सोयाबीन बियाणे खरेदीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून, बियाणांची उगवणक्षमता तपासूनच बियाणांची विक्री करावी, असे आवाहन संघटनेने केले आहे. नांदेड जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गतवर्षी बाजारात अनेक कंपन्यांसह व्यापाऱ्यांनी बियाणांची वाढती मागणी लक्षात घेऊन बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे काम केले. त्यातून लाखो शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नसल्याने दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यात केवळ महाबीजकडून नुकसानभरपाई म्हणून बियाणांची किमतीची रक्कम शेतकऱ्यांना परत करण्यात आली. परंतु इतर कंपन्यांनी हात वर करत न्यायालयात विवाद करणे सोयीचे मानले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. परिणामी यंदा महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड‌्स सीड‌्स डिलर्स असोसिएशनच्या वतीने सर्व व्यापाऱ्यांना पत्र पाठवून आवाहन केले आहे. सर्व व्यापाऱ्यांनी बियाणांची उगवणक्षमता तपासूनच बियाणांची विक्री करावी, असे पत्रात नमूद केले आहे.

विक्रेत्यांनी ही घ्यावी काळजी

सोयाबीन बियाणांच्या प्रत्येक लॉटमधील बियाणांमधून १०० ते १५० बिया घेऊन उगवणक्षमतेची विहित पद्धतीने पडताळणी करावी. तसेच ज्या लॉटमध्ये बियाणांची उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असेल अशा लॉटमधील बियाणे शेतकऱ्यांना विक्री करू नये. ज्या बियाणांची क्षमता ७० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तेच बियाणे विक्री करावे.

शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे

उगवणक्षमता तपासणी केलेले बियाणेच खरेदी करावे, सोयाबीन बियाणांचे बाह्यकवच नाजूक असल्याने सदर बियाणांची धूळ पेरणी करू नये, बियाणे नाजूक असल्याने बियाणांच्या पिशव्यांची वाहतूक करताना तसेच साठवणूक करताना विशेष खबरदारी घ्यावी तसेच बियाणे खरेदी करताना बिलावरील बियाणे कंपनीचे नाव, लॉट नंबर बॅगवरील तपासणी करून घ्यावे, सोयाबीनची पेरणी साधारण १०० ते १२५ मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी.