शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

सोयाबीन बियाणांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST

नांदेड : गतवर्षी सोयाबीन बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यानंतर जिल्ह्यात जवळपास १८ कंपन्यांवर ...

नांदेड : गतवर्षी सोयाबीन बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यानंतर जिल्ह्यात जवळपास १८ कंपन्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले हाेते. त्यामुळे यंदा सोयाबीन बियाणे खरेदीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून, बियाणांची उगवणक्षमता तपासूनच बियाणांची विक्री करावी, असे आवाहन संघटनेने केले आहे. नांदेड जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गतवर्षी बाजारात अनेक कंपन्यांसह व्यापाऱ्यांनी बियाणांची वाढती मागणी लक्षात घेऊन बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे काम केले. त्यातून लाखो शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नसल्याने दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यात केवळ महाबीजकडून नुकसानभरपाई म्हणून बियाणांची किमतीची रक्कम शेतकऱ्यांना परत करण्यात आली. परंतु इतर कंपन्यांनी हात वर करत न्यायालयात विवाद करणे सोयीचे मानले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. परिणामी यंदा महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड‌्स सीड‌्स डिलर्स असोसिएशनच्या वतीने सर्व व्यापाऱ्यांना पत्र पाठवून आवाहन केले आहे. सर्व व्यापाऱ्यांनी बियाणांची उगवणक्षमता तपासूनच बियाणांची विक्री करावी, असे पत्रात नमूद केले आहे.

विक्रेत्यांनी ही घ्यावी काळजी

सोयाबीन बियाणांच्या प्रत्येक लॉटमधील बियाणांमधून १०० ते १५० बिया घेऊन उगवणक्षमतेची विहित पद्धतीने पडताळणी करावी. तसेच ज्या लॉटमध्ये बियाणांची उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असेल अशा लॉटमधील बियाणे शेतकऱ्यांना विक्री करू नये. ज्या बियाणांची क्षमता ७० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तेच बियाणे विक्री करावे.

शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे

उगवणक्षमता तपासणी केलेले बियाणेच खरेदी करावे, सोयाबीन बियाणांचे बाह्यकवच नाजूक असल्याने सदर बियाणांची धूळ पेरणी करू नये, बियाणे नाजूक असल्याने बियाणांच्या पिशव्यांची वाहतूक करताना तसेच साठवणूक करताना विशेष खबरदारी घ्यावी तसेच बियाणे खरेदी करताना बिलावरील बियाणे कंपनीचे नाव, लॉट नंबर बॅगवरील तपासणी करून घ्यावे, सोयाबीनची पेरणी साधारण १०० ते १२५ मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी.