शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

महिलांना बचत गटाच्या कर्जफेडीची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST

मागील वर्षापासून विविध खासगी फायनान्स हे महिलांना कर्ज वाटप करीत आहेत. बचत गटांमार्फत तालुक्यातील प्रत्येक गावांत गरजू महिलांना १५ ...

मागील वर्षापासून विविध खासगी फायनान्स हे महिलांना कर्ज वाटप करीत आहेत. बचत गटांमार्फत तालुक्यातील प्रत्येक गावांत गरजू महिलांना १५ ते २५ हजारांपर्यंत कर्ज दिले गेले आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी महिलांचा सर्व व्यवहार सुरळीत सुरू होता. ठरवून दिलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर जात हाेते. मात्र कोरोनामुळे महिलांच्या हाताला व कुटुंबातील पुरुषांना काम मिळणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे घरचा खर्च भागविणे अवघड झाले आहे. त्यामुळे हप्ते कसे भरायचे, याची चिंता लागली आहे. काही फायनान्स कंपन्यांकडून हप्ते मागविले जात नसले तरी व्याजाची रक्कम वाढत आहे. काही प्रतिनिधी हे हप्ते घेण्यासाठी घरी येत आहेत. महिलांकडे पैसे नसल्यामुळे वाद होत आहे. बिकट परिस्थिती बनलेल्या अनेक महिलांना पैशाअभावी संसाराचा गाडा हाकताना कर्जाची परतफेड कशी करायची याची चिंता वाटत आहे.

चौकट- जिल्ह्यातील ७ हजार २१० बचत गटांपैकी केवळ १२० बचत गटांनाच बँकांनी १ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. मागील वर्षी ६ हजार ९२० गटांपैकी २ हजार ८८८ गटांना ५१ कोटी ४५ लाख ७७ हजार रुपयांचे कर्जाचे वाटप केले होते. जिल्ह्यातील २ हजार ६१६ गटांनी कर्जासाठी बँकेकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र अनेकांची खातेच उघडण्यात आले नाही. बचत गटांना कर्ज पुरवठा होत नसल्याने या बचत गटातील महिलांना खासगी फायनान्सकडून कर्ज घ्यावे लागत आहे.