शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

शेतमालाचे भाव जैसे थे; उत्पादन खर्चात ३० टक्क्यांपर्यंत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:13 IST

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे अशी सामाजिक भावना असली तरी, त्यादृष्टीने केंद्र अथवा राज्य सरकार प्रयत्न करीत नसल्याचे ...

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे अशी सामाजिक भावना असली तरी, त्यादृष्टीने केंद्र अथवा राज्य सरकार प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षभरात शेतमजुरी, खते-बी-बियाणांचे वाढलेले दर आणि उत्पादन काढण्यासाठी एकंदरीत वर्षभरात येणारा खर्च पाहता, खर्च आणि त्या शेतमालाला मिळणारा भाव याचे गणित जुळवाजुळव केले, तर कोणीही शेती करणार नाही, अशीच परिस्थिती आहे.

किमान आधारभूत किंमत केंद्र सरकारतर्फे वेळोवेळी निर्धारित करण्यात येत असलेली पिकांची/धान्यांची अथवा शेती उत्पादनांची किंमत असते. त्यानुसार सरकार हे शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करते. हा निर्णय भारत सरकारचे केंद्रीय मंत्रिमंडळ घेत असते. कृषी उत्पादन खर्च व मूल्य आयोग अशा वाढीबाबत आपली शिफारस केंद्र सरकारला सादर करीत असते. त्या शिफारसीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळ आपला निर्णय जाहीर करते. यासंबंधीची तरतूद त्या-त्या वर्षाच्या अर्थसंकल्पात पूर्वीच करण्यात आलेली असते. किमान आधारभूत किंमत ही भारतातल्या केंद्र सरकारतर्फे वेळोवेळी निर्धारित करण्यात येत असलेली पिकांची/धान्यांची अथवा शेती उत्पादनांची किंमत असते. त्यानुसार सरकार हे शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करते. हा निर्णय भारत सरकारचे केंद्रीय मंत्रिमंडळ घेत असते. परंतु, मागील वर्षभरात शेतमालाचे झालेले मोल आणि उत्पादन काढण्यासाठी येणारा खर्च यामध्ये मोठी तफावत आहे.

शेतीमालाला कवडीमोल भाव...!

मोठ्या अडचणीतून अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करत शेतकरी जगाला अन्नधान्य पुरविण्याचे काम करतो. जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला मात्र बाजारात कवडीमोल किंमत मिळत असल्याने तो कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. दरवर्षी उत्पादन खर्चात भरमसाट वाढ होत असताना बाजारपेठेत शेतीमालाला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.

इंधन दर वाढल्याने मशागतीचा खर्चही वाढला..!

वर्षभरात डिझेल, पेट्रोलच्या दरवाढीचा भडका उडाला. लिटरमागे तब्बल २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. ७० रुपयांवरचे डिझेल चक्क ९५ रुपयांपर्यंत गेले आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. ट्रॅक्टरद्वारे करण्यात येणाऱ्या नांगरटी, मोगडा, रूटर, बेड व पेरणी यासारख्या कामासाठी तब्बल २५ ते ३० टक्क्याने वाढ झाली आहे.

बियाणे आणि खतांच्या किमतीही वाढल्या..!

मागील वर्षापेक्षा यंदा खताच्या किमतीही क्विंटलमागे शंभर ते तीनशे रुपयांनी वाढल्या आहेत. कापसाच्या बियाणाच्या एका पाकिटामागे ३० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीनचे बियाणे तर किलोमागे २५ रुपयांनी वाढल्याने एका बॅगची किंमत ५०० रुपयांपर्यंत वाढली आहे.

३० टक्के वाढीच्या तुलनेत एक ते पाच टक्केच वाढ कशी?

उत्पादन खर्चात जवळपास २५ टक्के वाढ झालेली असताना केंद्र सरकारने मात्र शेतमालाची आधारभूत किंमत केवळ दोन ते पाच टक्क्यापर्यंत वाढवली आहे. एकीकडे उत्पादन २५ टक्क्याने वाढले असताना शेतमालाची आधारभूत किंमत फक्त एक ते पाच टक्के वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. सरकारी आकड्यांतील आणि शेतकऱ्यांच्या वास्तवात झालेल्या उत्पादन खर्चाचे गणित कधीच जुळत नसते. कृषी मूल्य आयोगही खर्चात २५ टक्के वाढ झाली असताना, आधारभूत किमतीत मात्र पाच टक्केची वाढ करण्यासाठी कसे सुचविते? हाही संशोधनाचा विषय म्हणावा लागेल. एकप्रकारे अशी वाढ म्हणजे शेतकऱ्यांची एकप्रकारे थट्टाच वाटते, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.