शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडप्रकरणी चौकशीचे आयुक्तांनी दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST

सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या हेडखाली ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून २०१८ मध्ये ही ...

सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या हेडखाली ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून २०१८ मध्ये ही वृक्षारोपण केल्याचे कागदोपत्री दाखवून करोडो रुपयांचा अपहार करण्यात आला आहे, अशी तक्रार अविनाश इटकापल्ले यांनी विभागीय आयुक्तांकडे २०१९ मध्ये केली होती. या प्रकरणी अनेक वेळा चौकशाही करण्यात आल्या. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातून पुढे अहवाल सरकला नाही. त्यामुळे सदरील प्रकरण थंड बस्त्यातच राहिले आहे. नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर औद्योगिक वसाहत यासह नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या १६ तालुक्यातील वनविभागाच्या जमिनीवर वृक्षारोपण दाखविण्यात आले आहे. शासन नियमानुसार तीन फूट उंचीची रोप लावणे आवश्यक आहे. अशी रोपे जिवंत राहण्याचे प्रमाण अधिक असते. परंतु सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या रोपांपैकी ८० टक्के रोपे ही मरण पावली आहेत. तरी देखील ९० ते ९२ टक्के रोपे जिवंत असल्याचा अहवाल मुख्य वनरक्षकांना सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर रोपांची निर्मिती करत असताना पिशव्या जुन्या वापरण्यात आल्या आहेत. खोदकाम मजुराऐवजी मशीनच्या साहाय्याने करण्यात आले आहे. त्याचबरोबर वेळेवर पाणी न दिल्यामुळे आहे ती रोपे ही वाळून गेली आहेत. या संदर्भातील छायाचित्रीकरण तसेच छायाचित्र संंबंधित विभागाच्या वरिष्ठांना पाठवूनदेखील कार्यवाही न झाल्याने इटकापल्ले यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. दरम्यान, ५ मे २०२१ रोजी विभागीय आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

चौकट .........

चौकशी समितीचा अहवालही गुलदस्त्यात

शासनाच्या वतीने नांदेड जिल्ह्यात २०१८ मध्ये वनपरिक्षेत्र बिलोली अंतर्गत १३ कोटींची वृक्ष लागवड करण्यात आली होती. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातही कोट्यवधी रुपयांची वृक्ष लागवड केली. परंतु त्यात अपहार झाल्याने सदर वृक्ष लागवडीची महसूल प्रशासनामार्फत चौकशी करण्याच्या अनुषंगाने गठित केलेल्या समितीने अद्यापपर्यंत अहवाल सादर केला नाही. त्यामुळे या प्रकरणात बड्या अधिकाऱ्यांचेही हात असल्याचे दिसून येत आहे.