शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

वृक्ष लागवडप्रकरणी चौकशीचे आयुक्तांनी दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST

सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या हेडखाली ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून २०१८ मध्ये ही ...

सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या हेडखाली ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून २०१८ मध्ये ही वृक्षारोपण केल्याचे कागदोपत्री दाखवून करोडो रुपयांचा अपहार करण्यात आला आहे, अशी तक्रार अविनाश इटकापल्ले यांनी विभागीय आयुक्तांकडे २०१९ मध्ये केली होती. या प्रकरणी अनेक वेळा चौकशाही करण्यात आल्या. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातून पुढे अहवाल सरकला नाही. त्यामुळे सदरील प्रकरण थंड बस्त्यातच राहिले आहे. नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर औद्योगिक वसाहत यासह नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या १६ तालुक्यातील वनविभागाच्या जमिनीवर वृक्षारोपण दाखविण्यात आले आहे. शासन नियमानुसार तीन फूट उंचीची रोप लावणे आवश्यक आहे. अशी रोपे जिवंत राहण्याचे प्रमाण अधिक असते. परंतु सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या रोपांपैकी ८० टक्के रोपे ही मरण पावली आहेत. तरी देखील ९० ते ९२ टक्के रोपे जिवंत असल्याचा अहवाल मुख्य वनरक्षकांना सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर रोपांची निर्मिती करत असताना पिशव्या जुन्या वापरण्यात आल्या आहेत. खोदकाम मजुराऐवजी मशीनच्या साहाय्याने करण्यात आले आहे. त्याचबरोबर वेळेवर पाणी न दिल्यामुळे आहे ती रोपे ही वाळून गेली आहेत. या संदर्भातील छायाचित्रीकरण तसेच छायाचित्र संंबंधित विभागाच्या वरिष्ठांना पाठवूनदेखील कार्यवाही न झाल्याने इटकापल्ले यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. दरम्यान, ५ मे २०२१ रोजी विभागीय आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

चौकट .........

चौकशी समितीचा अहवालही गुलदस्त्यात

शासनाच्या वतीने नांदेड जिल्ह्यात २०१८ मध्ये वनपरिक्षेत्र बिलोली अंतर्गत १३ कोटींची वृक्ष लागवड करण्यात आली होती. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातही कोट्यवधी रुपयांची वृक्ष लागवड केली. परंतु त्यात अपहार झाल्याने सदर वृक्ष लागवडीची महसूल प्रशासनामार्फत चौकशी करण्याच्या अनुषंगाने गठित केलेल्या समितीने अद्यापपर्यंत अहवाल सादर केला नाही. त्यामुळे या प्रकरणात बड्या अधिकाऱ्यांचेही हात असल्याचे दिसून येत आहे.