शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

लसीकरणाच्या गोंधळालाही केंद्र शासनच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:17 IST

नांदेड - इंग्लंडने एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे लसीकरण उरकले. अमेरिकेतही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मास्क काढून टाकला आहे. म्हणजेच ...

नांदेड - इंग्लंडने एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे लसीकरण उरकले. अमेरिकेतही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मास्क काढून टाकला आहे. म्हणजेच लसीकरणावर विश्वास दाखविला आहे. आपल्याकडे मात्र सगळी गोंधळाची स्थिती आहे. याला सर्वस्वी केंद्र सरकारचे नियोजन जबाबदार असल्याचा आरोप करीत महाराष्ट्राने यापूर्वीही लसीकरणासारख्या मोहिमा यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्राला केवळ डोस द्यावेत. लसीकरणाचे पूर्ण नियोजन करून ही मोहीम आम्ही यशस्वी करू, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. ते मंगळवारी ‘लोकमत’शी बोलत होते.

४५ वर्षांच्या पुढच्या नागरिकांना लस देण्याचे नियोजन केंद्र शासनाने केले. पहिला आणि दुसरा डोस कुणाला आणि कधी द्यायचा? याचे अधिकारही केंद्रालाच आहेत. त्यांच्या निर्देशानुसारच महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. मात्र ही मोहीम राबविताना केंद्र सरकार अद्यापही गंभीर नसल्याचे? दिसते. सध्याच्या संकटावर मात करायची असेल तर जितक्या लवकर लसीकरण पूर्ण होईल तितके चांगले आहे. मात्र आज मागणीनुसार लस उपलब्ध होत नाही. या मोहिमेमध्ये अनेक त्रुटी आहेत. लसीकरणासाठी केंद्राने ॲप तयार केला आहे. या ॲपमध्ये कुणी कुठूनही नाव नोंदवू शकतो. माझ्या जिल्ह्यातील घुलेवाडी गावात ४०० डोस आले होते. लसीकरणासाठी ४०० जणांनी नोंदणीही केली. यातील तब्बल १८० लोक हे बाहेर जिल्ह्यातील होते. शेजारच्या नाशिक, पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी नोंदणी केली असेल, हे एकवेळेस समजू शकतो. मात्र पार परभणीपासून हैदराबादपर्यंतचे नागरिक नोंदणी करून लसीकरणासाठी घुलेवाडीत येत असतील तर सिस्टीम म्हणून हे योग्य आहे का? असा प्रश्नही थोरात यांनी उपस्थित केला. असे अनेक मुद्दे आहेत. मात्र केंद्र सरकार ते गांभीर्याने घ्यायला तयार नाही. लसीकरणासाठी महाराष्ट्राचे सर्व्हे करू द्या, अशी मागणी दोनवेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे केली आहे. मात्र अद्यापही केंद्राकडून त्यास प्रतिसाद दिला नसल्याचे? थोरात यांनी सांगितले.

चौकट----------------

दोन भावाच्या भांडणात पाहुण्याला आणू नका

मागील अनेक वर्षांपासून नांदेड, लातूर विभागीय महसूल कार्यालयाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता अशा वादाच्या विषयावर बसून चर्चा करावी लागेल. नांदेड आणि लातूर हे दोन जिल्हे एकमेकांचे भाऊ आहेत. या दोन भावांच्या वादात मला पाहुण्याला का आणता? अशी मिश्कील टिप्पणी करीत थोरात यांनी या विषयावर स्पष्टपणे भाष्य करण्याचे टाळले.

चौकट-----------------

महाराष्ट्रात कुठेही आकड्यांची लपवालपवी नाही

पहिल्या लाटेचा यशस्वी मुकाबला केल्यानंतरही राज्य शासन गांभीर्याने कोरोनाला सामोरे जात होते. मात्र नागरिकच कुठे तरी थोडे बिनधास्त झाले होते. त्यामुळेच दुसरी लाट आल्याचे सांगत, या लाटेचाही महाराष्ट्र शासन गंभीरपणे सामना करीत आहे. आम्ही आकड्यांच्या बाबतीत कुठेही लपवालपवी केली नाही. महाराष्ट्रावर टीका करणाऱ्यांनी आज भाजपशासित राज्यात मृत्यूचे कसे तांडव सुरू आहे याकडेही पाहावे असे थोरात म्हणाले.

फोटो फाईल नेम - १८एनपीएचएमएवाय१४.जेपीजी