शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

अंगणवाडीला खीळ

By admin | Updated: May 11, 2014 00:25 IST

सुनील चौरे , हदगाव तालुक्यातील २८२ अंगणवाड्या व ८२ मिनी अंगणवाड्यांपैकी १६ अंगणवाड्यांची निवड आयएसओ मानांकनासाठी करण्यात आली.

सुनील चौरे , हदगाव तालुक्यातील २८२ अंगणवाड्या व ८२ मिनी अंगणवाड्यांपैकी १६ अंगणवाड्यांची निवड आयएसओ मानांकनासाठी करण्यात आली, मात्र लोकसहभाग मिळत नाही. शासन स्तरावरुन निधी नाही, अधिकारी, कर्मचारी यासाठी झटत नाहीत, त्यामुळे या कामाला खीळ बसल्याचे चित्र तालुक्यात आहे. जिल्ह्यात कुपोषणमुक्तीचा खूप गाजावाजा झाला, राज्यात नांदेडचे तोंडभरुन कौतुक झाले. त्यामुळे या विभागाला मूठभर मांस आलं आणि बळही मिळालं. त्याचं पुढचं पाऊल म्हणून अंगणवाडी हायटेक करण्यासाठी तालुक्यात १६ अंगणवाड्यांची प्राथमिक स्वरुपात आयएओ मानांकनासाठी निवड झाली, काम जोरात सुरु असतानाच अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांनी मानधनाच्या मागणीसाठी अंगणवाडीला ताळे ठोकले. त्यानंतर अधिकारी, कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले. यामुळे या कामाला खीळ बसल्याचे सांगण्यात येते. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. या अंगणवाड्या हायटेक करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी, दानशूर मंडळींनी मोकळ्या हाताने मदत करायची आहे, मात्र ही मदत होत नाही. ज्या अंगणवाड्यामध्ळे आपल्याच गावातील, समाजातील मुल शिकतात, शालेय शिक्षणापूर्वीचे धडे घेतात, त्यांची काय दशा आहे. त्यांना पोषक आहार मिळतो काय? प्रगत समाजाप्रमाणे त्याला शुद्ध पाणी, इंग्रजीचे ज्ञान,संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळींनी लक्ष देणे आवश्यक आहे. लोक उदासीन आहे. चित्राच्या माध्यमातून विद्यार्थी भाषा शिकतो, त्यामुळे अंगणवाडीला रंगरंगोटी, किचनओटा, प्रसन्न वातावरण, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता या बाबी महत्त्वाच्या ठरतात, यासाठी गावातून लोकसहभाग मिळवून या अंगणवाड्या आयएओसाठी तयार करायच्या आहेत. मात्र १६ पैकी ८ अंगणवाड्यांची ५० ट्के तयारी झाल्याची माहिती मिळाली. एका अंगणवाडीसाठी १ ते दीड लाख रुपये खर्च लागतो, मात्र एवढा निधी गावातून उभा राहत नाही, त्यामुळे कर्मचारी हताश झाले आहेत. १६ अंगणवाड्यांमध्ये अंबाळा, बाभळी, तामसा, केदारनाथ, दिग्रस, पाथरडतांडा, निवघा बाजार, काळेश्वर, महातळा, तळणी, हडसणी, ल्याहरी, बामणी, पळसा, खैरगाव, चाभरा तांडा यांचा समावेश आहे. निधी उभा करण्यासाठी गावातील सामाजिक भान असणार्‍यांची मदत मिळते, मात्र त्यासाठी ग्रामस्थ व अधिकारी किंवा कर्मचारी यांचा समन्वय अतिआवश्यक आहे. कागदी घोडे नाचविण्यात पटाईत असणारे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात तर विकासाच्या गप्पा करणारे लोकप्रतिनिधींना छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. लक्ष देणे आवश्यक अंगणवाड्या हायटेक करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी, दानशूर मंडळींनी मोकळ्या हाताने मदत करायची आहे, मात्र ही मदत होत नाही. ज्या अंगणवाड्यामध्ये आपल्याच गावातील, समाजातील मुल शिकतात, शालेय शिक्षणापूर्वीचे धडे घेतात, त्यांची काय दशा आहे. त्यांना पोषक आहार मिळतो काय?प्रगत समाजाप्रमाणे त्याला शुद्ध पाणी, इंग्रजीचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळींनी लक्ष देणे आवश्यक आहे.