शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीला खीळ

By admin | Updated: May 11, 2014 00:25 IST

सुनील चौरे , हदगाव तालुक्यातील २८२ अंगणवाड्या व ८२ मिनी अंगणवाड्यांपैकी १६ अंगणवाड्यांची निवड आयएसओ मानांकनासाठी करण्यात आली.

सुनील चौरे , हदगाव तालुक्यातील २८२ अंगणवाड्या व ८२ मिनी अंगणवाड्यांपैकी १६ अंगणवाड्यांची निवड आयएसओ मानांकनासाठी करण्यात आली, मात्र लोकसहभाग मिळत नाही. शासन स्तरावरुन निधी नाही, अधिकारी, कर्मचारी यासाठी झटत नाहीत, त्यामुळे या कामाला खीळ बसल्याचे चित्र तालुक्यात आहे. जिल्ह्यात कुपोषणमुक्तीचा खूप गाजावाजा झाला, राज्यात नांदेडचे तोंडभरुन कौतुक झाले. त्यामुळे या विभागाला मूठभर मांस आलं आणि बळही मिळालं. त्याचं पुढचं पाऊल म्हणून अंगणवाडी हायटेक करण्यासाठी तालुक्यात १६ अंगणवाड्यांची प्राथमिक स्वरुपात आयएओ मानांकनासाठी निवड झाली, काम जोरात सुरु असतानाच अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांनी मानधनाच्या मागणीसाठी अंगणवाडीला ताळे ठोकले. त्यानंतर अधिकारी, कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले. यामुळे या कामाला खीळ बसल्याचे सांगण्यात येते. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. या अंगणवाड्या हायटेक करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी, दानशूर मंडळींनी मोकळ्या हाताने मदत करायची आहे, मात्र ही मदत होत नाही. ज्या अंगणवाड्यामध्ळे आपल्याच गावातील, समाजातील मुल शिकतात, शालेय शिक्षणापूर्वीचे धडे घेतात, त्यांची काय दशा आहे. त्यांना पोषक आहार मिळतो काय? प्रगत समाजाप्रमाणे त्याला शुद्ध पाणी, इंग्रजीचे ज्ञान,संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळींनी लक्ष देणे आवश्यक आहे. लोक उदासीन आहे. चित्राच्या माध्यमातून विद्यार्थी भाषा शिकतो, त्यामुळे अंगणवाडीला रंगरंगोटी, किचनओटा, प्रसन्न वातावरण, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता या बाबी महत्त्वाच्या ठरतात, यासाठी गावातून लोकसहभाग मिळवून या अंगणवाड्या आयएओसाठी तयार करायच्या आहेत. मात्र १६ पैकी ८ अंगणवाड्यांची ५० ट्के तयारी झाल्याची माहिती मिळाली. एका अंगणवाडीसाठी १ ते दीड लाख रुपये खर्च लागतो, मात्र एवढा निधी गावातून उभा राहत नाही, त्यामुळे कर्मचारी हताश झाले आहेत. १६ अंगणवाड्यांमध्ये अंबाळा, बाभळी, तामसा, केदारनाथ, दिग्रस, पाथरडतांडा, निवघा बाजार, काळेश्वर, महातळा, तळणी, हडसणी, ल्याहरी, बामणी, पळसा, खैरगाव, चाभरा तांडा यांचा समावेश आहे. निधी उभा करण्यासाठी गावातील सामाजिक भान असणार्‍यांची मदत मिळते, मात्र त्यासाठी ग्रामस्थ व अधिकारी किंवा कर्मचारी यांचा समन्वय अतिआवश्यक आहे. कागदी घोडे नाचविण्यात पटाईत असणारे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात तर विकासाच्या गप्पा करणारे लोकप्रतिनिधींना छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. लक्ष देणे आवश्यक अंगणवाड्या हायटेक करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी, दानशूर मंडळींनी मोकळ्या हाताने मदत करायची आहे, मात्र ही मदत होत नाही. ज्या अंगणवाड्यामध्ये आपल्याच गावातील, समाजातील मुल शिकतात, शालेय शिक्षणापूर्वीचे धडे घेतात, त्यांची काय दशा आहे. त्यांना पोषक आहार मिळतो काय?प्रगत समाजाप्रमाणे त्याला शुद्ध पाणी, इंग्रजीचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळींनी लक्ष देणे आवश्यक आहे.