शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलांचे हल्ले वाढले, किनवट तालुक्यात शेतकरी, सालगडी भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST

किनवट - किनवट तालुक्यात मागील पाच दिवसांत चार शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ले करून जखमी केल्याच्या घटना घडल्या असून, शेतात ...

किनवट - किनवट तालुक्यात मागील पाच दिवसांत चार शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ले करून जखमी केल्याच्या घटना घडल्या असून, शेतात जागलीला राहणारे शेतकरी, सालगडी भयभीत झाले आहेत.

३० च्या मध्यरात्री घोटी येथील एका तरुण शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला करून जखमी केले. सुुदैैवाने जीवित हानीची कोणतीही घटना घडली नाही. २६ जानेवारी रोजी एकाच दिवशी पिंपळगाव येथील काशीराम सलाम (६०)व गोविंद सलाम (५५) या दोघा शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला करून तर ३० जानेवारी रोजी दुपारी एक वाजता दहेली येथील व्यंकटी सामसेनवार (४५) यांचेवर हल्ला करून जखमी केले. त्याच मध्यरात्री घोटी येथील निखिल सुरवशे (२४) या तरुण शेतकऱ्यावर झोपेत असताना हल्ला करून किरकोळ जखमी केले होते.

घोटी येथील घटना तर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या शेतात घडल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येऊ लागल्याचे चित्र आहे. वन विभागाने जंगलात पाणवठे तयार करावेत व त्यांना खाण्यासाठी व्यवस्था करावी, म्हणजे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येणार नाहीत. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या चार महिन्यांतच अस्वले गावाच्या दिशेने येतात. कारण या काळात बोरीचा सिझन असतो. बोरे खाण्यासाठी अस्वल येतात, तसेच याच काळात ते पिलांना जन्म देतात. पिले सुरक्षित राहावीत म्हणून कापूस पिकाच्या आडोशाला शेतात येतात, तसेच त्यांना डिवचले तर ते मानवावर अटॅक करतात, असे मांडवीचे वनक्षेत्रपाल योगेश शेरेकार यांनी सांगितले. जर आरडाओरड केली नाही तर ते निमूटपणे निघून जातात, असा अनुभव शेरेकार यांनी बोलून दाखविला. रात्री मी गस्तीवर असताना रात्रभर जंगली जनावरे शेतात येऊ नये म्हणून ओरडणारे शेतकरी पाहिले व पीक नुकसानीची प्रकरणे घेऊन आले तेंव्हा मी वरिष्ठांना सांगून हाच आवाज रेकॉर्ड करून मोठा साऊंड व स्पीकर देण्याचा प्रयत्न आहे. त्याअनुषंगाने शामा प्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत चार कमिट्या मंजूर करून घेतल्या, प्रायोगिक तत्त्वावर उनकदेव, बोथ टिटवी, परशुराम नाईक तांडा व उमरी येथील समित्यांना आवाज रेकॉर्ड करून आवाज स्पीकर ब्लुटूथवर वाजवण्यासाठी देण्याचे विचाराधीन असल्याचेही शेरेकार यांनी सांगितले.