शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

अस्वलांचे हल्ले वाढले, किनवट तालुक्यात शेतकरी, सालगडी भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST

किनवट - किनवट तालुक्यात मागील पाच दिवसांत चार शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ले करून जखमी केल्याच्या घटना घडल्या असून, शेतात ...

किनवट - किनवट तालुक्यात मागील पाच दिवसांत चार शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ले करून जखमी केल्याच्या घटना घडल्या असून, शेतात जागलीला राहणारे शेतकरी, सालगडी भयभीत झाले आहेत.

३० च्या मध्यरात्री घोटी येथील एका तरुण शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला करून जखमी केले. सुुदैैवाने जीवित हानीची कोणतीही घटना घडली नाही. २६ जानेवारी रोजी एकाच दिवशी पिंपळगाव येथील काशीराम सलाम (६०)व गोविंद सलाम (५५) या दोघा शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला करून तर ३० जानेवारी रोजी दुपारी एक वाजता दहेली येथील व्यंकटी सामसेनवार (४५) यांचेवर हल्ला करून जखमी केले. त्याच मध्यरात्री घोटी येथील निखिल सुरवशे (२४) या तरुण शेतकऱ्यावर झोपेत असताना हल्ला करून किरकोळ जखमी केले होते.

घोटी येथील घटना तर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या शेतात घडल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येऊ लागल्याचे चित्र आहे. वन विभागाने जंगलात पाणवठे तयार करावेत व त्यांना खाण्यासाठी व्यवस्था करावी, म्हणजे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येणार नाहीत. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या चार महिन्यांतच अस्वले गावाच्या दिशेने येतात. कारण या काळात बोरीचा सिझन असतो. बोरे खाण्यासाठी अस्वल येतात, तसेच याच काळात ते पिलांना जन्म देतात. पिले सुरक्षित राहावीत म्हणून कापूस पिकाच्या आडोशाला शेतात येतात, तसेच त्यांना डिवचले तर ते मानवावर अटॅक करतात, असे मांडवीचे वनक्षेत्रपाल योगेश शेरेकार यांनी सांगितले. जर आरडाओरड केली नाही तर ते निमूटपणे निघून जातात, असा अनुभव शेरेकार यांनी बोलून दाखविला. रात्री मी गस्तीवर असताना रात्रभर जंगली जनावरे शेतात येऊ नये म्हणून ओरडणारे शेतकरी पाहिले व पीक नुकसानीची प्रकरणे घेऊन आले तेंव्हा मी वरिष्ठांना सांगून हाच आवाज रेकॉर्ड करून मोठा साऊंड व स्पीकर देण्याचा प्रयत्न आहे. त्याअनुषंगाने शामा प्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत चार कमिट्या मंजूर करून घेतल्या, प्रायोगिक तत्त्वावर उनकदेव, बोथ टिटवी, परशुराम नाईक तांडा व उमरी येथील समित्यांना आवाज रेकॉर्ड करून आवाज स्पीकर ब्लुटूथवर वाजवण्यासाठी देण्याचे विचाराधीन असल्याचेही शेरेकार यांनी सांगितले.