काही ठिकाणी नुसतेच खोदकाम करून ठेवल्याने अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत. महामार्गावरील सर्व कामे संथ गतीने सुरू असल्याने टाकलेल्या खडकाच्या धुरोड्या ने प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. अर्धवट कामाने अनेक घटना घडत असून धुळीने डोळ्याच्या आजारात वाढ झाली असल्याने चष्मा लागण्याचे प्रमाणात वाढ झाली असल्याचे रुग्णालयात डोळे तपासण्यासाठी रुग्णसंख्या वाढली असल्याची माहिती नेत्र तज्ञांकडून मिळाली आहे महामार्गाचे अर्धवट कामाने त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.
तसेच अनेक ठिकाणी मोठमोठी खड्डे पडल्याने तसेच खोदून ठेवलेल्या नाली कामाने अनेक समस्या निर्माण झाले आहेत. तर काही ठिकाणी नाली वर चढ उतार करुन ठेवल्याने उसाचा ट्रॅक्टरला जाण्यासाठी अनेक समस्या अडचणी उद्भवत आहेत. केलेल्या नाली कामाच्या साईटचे काम प्रलंबित असल्याने त्या ठिकाणी मोठ मोठे खड्डे अस्तित्व असल्याने ते बुजवण्याची गरज आहे. त्यामध्ये अनेक अपघाती घटना घडत आहेत. येणारे जाणारे खड्यात पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असून महामार्गावरील संथ गतीने चालणार्या कामाला गती देण्याची गरज आहे.