यात सलाम मुंबई फाउंडेशनचे सचिन वानखेडे यांनी तंबाखुमुक्त शाळा करताना या पूर्वी ११ निकष यांची पूर्तता करायची होती. परंतु यात आता बदल झाला असून ते नऊ निकषच राहिले आहेत यांची व तंबाखु फ्री स्कुल ॲप यांमध्ये निकष कसे अपलोड करायचे याबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना गटशिक्षणाधिकारी डी.के. तोटरे यांनी सांगितले की येणाऱ्या नवीन वर्षात तालुक्यातील सर्व शाळा तंबाखु मुक्त होतील असे नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले व सर्व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना आवाहन सुध्दा केले ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी जयेश माळी, केंद्रप्रमुख माधव लोलमवाड यांनी विशेष प्रयत्न केले. सूत्रसंचनलन संस्था प्रतिनिधी रवी ढगे तर आभार विषयतज्ञ प्रल्हाद ढाकणे यांनी मानले.
बिलोली तालुक्यातील सर्व शाळा तंबाखु मुक्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST